शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

'पहिलं पाऊलं- एक बीज लावून' शाळांमध्ये अनोख्या उपक्रमाने होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

By हरी मोकाशे | Updated: June 14, 2023 16:05 IST

स्व. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान या मोहिमेस लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त व्हावे, लोकसहभागाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही सहभाग राहण्यासाठी विशेष उपक्रम

लातूर : शासनाच्या हर घर नर्सरी मोहिमेस बळकटी देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने पहिलं पाऊलं- एक बीज लावून हा विशेष उपक्रम शाळेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी जिल्ह्यातील प्रत्येक गावांत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे बालकांच्या मनावर वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे महत्त्व बिंबवण्यास मोठी मदत होणार आहे.

स्व. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियानअंतर्गत जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येते. दरम्यान, या मोहिमेस लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त व्हावे. लोकसहभागाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही सहभाग राहण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात पहिलं पाऊलं- एक बीज लावून हा विशेष उपक्रम गुरुवारी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शासनाच्या हर घर नर्सरीला बळकटी मिळणार आहे.

अनोख्या पध्दतीने हाेणार स्वागत...जिल्ह्यातील सर्व गावांत शाळेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी दोन बिया व बिया रुजविण्याच्या पिशवीत माती टाकून देण्यात येऊन प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्या पिशवीत बिया रुजविण्यापासून ते पुढील वर्षाच्या पावसाळ्यापर्यंत पूर्ण देखभाल त्या विद्यार्थ्याने करावयाची आहे. बी संगोपनापासून ते रोप तयार होईपर्यंतच्या संगोपनाबाबतची सर्व निरीक्षणे विद्यार्थ्यांनी विशेष नोंदवहीत नोंदवावी लागणार आहेत.

मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी वृक्ष लागवड...मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी बियांपासून तयार केलेल्या रोपांची लागवड १७ सप्टेंबर रोजी योग्य त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्याच्या देखभालीची जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांवर राहणार आहे.

अडीच लाख रोपांची निर्मिती...या उपक्रमातून जिल्ह्यातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांमार्फत अडीच लाख रोपांची निर्मिती होणार आहे. यासंदर्भात शाळा व ग्रामपंचायतींना सूचना करण्यात आल्या आहेत. बिया आणि पिशव्यांची जबाबदारी ग्रामपंचायती, नगर पंचायतींवर सोपविण्यात आली आहे.

वनक्षेत्र वाढीस हातभार...पहिलं पाऊलं- एक बीज लावून या विशेष उपक्रमामुळे बालकांमध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाविषयी जिव्हाळा निर्माण होईल. त्यामुळे बालकांना वृक्षांचे महत्त्वही समजेल. या मोहिमेतून जिल्ह्यातील वन क्षेत्र वाढीस हातभार लागणार आहे.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

टॅग्स :laturलातूरSchoolशाळाEducationशिक्षण