शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

'पहिलं पाऊलं- एक बीज लावून' शाळांमध्ये अनोख्या उपक्रमाने होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

By हरी मोकाशे | Updated: June 14, 2023 16:05 IST

स्व. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान या मोहिमेस लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त व्हावे, लोकसहभागाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही सहभाग राहण्यासाठी विशेष उपक्रम

लातूर : शासनाच्या हर घर नर्सरी मोहिमेस बळकटी देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने पहिलं पाऊलं- एक बीज लावून हा विशेष उपक्रम शाळेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी जिल्ह्यातील प्रत्येक गावांत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे बालकांच्या मनावर वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे महत्त्व बिंबवण्यास मोठी मदत होणार आहे.

स्व. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियानअंतर्गत जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येते. दरम्यान, या मोहिमेस लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त व्हावे. लोकसहभागाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही सहभाग राहण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात पहिलं पाऊलं- एक बीज लावून हा विशेष उपक्रम गुरुवारी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शासनाच्या हर घर नर्सरीला बळकटी मिळणार आहे.

अनोख्या पध्दतीने हाेणार स्वागत...जिल्ह्यातील सर्व गावांत शाळेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी दोन बिया व बिया रुजविण्याच्या पिशवीत माती टाकून देण्यात येऊन प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्या पिशवीत बिया रुजविण्यापासून ते पुढील वर्षाच्या पावसाळ्यापर्यंत पूर्ण देखभाल त्या विद्यार्थ्याने करावयाची आहे. बी संगोपनापासून ते रोप तयार होईपर्यंतच्या संगोपनाबाबतची सर्व निरीक्षणे विद्यार्थ्यांनी विशेष नोंदवहीत नोंदवावी लागणार आहेत.

मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी वृक्ष लागवड...मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी बियांपासून तयार केलेल्या रोपांची लागवड १७ सप्टेंबर रोजी योग्य त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्याच्या देखभालीची जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांवर राहणार आहे.

अडीच लाख रोपांची निर्मिती...या उपक्रमातून जिल्ह्यातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांमार्फत अडीच लाख रोपांची निर्मिती होणार आहे. यासंदर्भात शाळा व ग्रामपंचायतींना सूचना करण्यात आल्या आहेत. बिया आणि पिशव्यांची जबाबदारी ग्रामपंचायती, नगर पंचायतींवर सोपविण्यात आली आहे.

वनक्षेत्र वाढीस हातभार...पहिलं पाऊलं- एक बीज लावून या विशेष उपक्रमामुळे बालकांमध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाविषयी जिव्हाळा निर्माण होईल. त्यामुळे बालकांना वृक्षांचे महत्त्वही समजेल. या मोहिमेतून जिल्ह्यातील वन क्षेत्र वाढीस हातभार लागणार आहे.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

टॅग्स :laturलातूरSchoolशाळाEducationशिक्षण