शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई; सामाजिक सलोख्याला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 19:57 IST

पोलीस अधीक्षक आर. राजा : सोशल पोलिसिंगवरही भर

विजय मुंडेउस्मानाबाद : समाजात वावरणाऱ्या प्रत्येक घटकाने कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. अवैध धंदे चालविणाºयांसह समाजात धार्मिक तेढ निर्माण करणाºया गावगुंडांवर यापुढे धडक कारवाई केली जाईल. शिवाय, ठाणेस्तरावर सर्वसामान्यांशी संवाद वाढवून शांतता प्रस्थापित करणार असल्याचे उस्मानाबादचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक आऱ राजा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

आर. राजा म्हणाले, गडचिरोली येथील कामकाज आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कामकाजात खूप मोठा फरक आहे़ उस्मानाबादचा पदभार हाती घेतल्यानंतर पोलिसिंगच्या दृष्टीने माहिती घेतली आहे़ यापुढील काळात वेळोवेळी ठाणेस्तरावर बैठका घेऊन सर्वसामान्यांशी संवाद साधणार आहोत. 21 लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात केवळ 1800 पोलीस कर्मचारी आहेत़ त्यामुळे सर्वसामान्यांनीही सत्याच्या मागे खंबिरपणे उभा राहून पोलिसांच्या प्रत्येक कामात आवश्यक ती मदत करणे गरजेचे आहे़ विविध कारणांवरून सतत भांडणे करून धार्मिक तेढ निर्माण करणाºयांवर आमचे विशेष लक्ष राहणार आहे़ यापूर्वीच्या घटनांमध्ये वेळोवेळी सहभाग असलेल्यांच्या याद्या तयार केल्या जात आहेत.पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न समजून घेत ते सोडविण्यावर आपला अधिक भर राहणार आहे. पोलीस ठाणे, वसाहती दुरूस्तीसाठीही आपण पाठपुरावा करणार आहोत. शहरी भागातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. तुळजापूर शहरातील ट्रॉफिकचा प्रश्न सोडविण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत़ विशेषत: यात्रा कालावधीत वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे़ सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्याकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचेही आर. राजा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

गुन्ह्यांच्या निपटाऱ्यासाठी मोहीमठाणेस्तरावर दाखल प्रलंबीत गुन्ह्यांचा वेळेत निपटारा व्हावा, यासाठी वेळोवेळी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. गुन्ह्यांच्या तपासासाठी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.शाळा, महाविद्यालयांना भेटीमहिला, मुलींची छेडछाड रोखण्यासाठी पथक कार्यरत असून, शाळेच्या वेळांमध्ये पेट्रोलिंग वाढविण्यात आली आहे़ लवकरच शाळा-महाविद्यालयात भेटी देऊन, विद्यार्थ्यांशी चर्चा केली जाणार आहे़ मुख्याध्यापक, प्राचार्यांच्या बैठका घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या जाणार आहेत.सोशल मीडियावर विशेष लक्षसोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर, फोटो टाकून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार घडत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आम्ही सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवले आहे़ सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनीही कायद्याचे पालन करावे, असे आवाहनही पोलीस अधीक्षक आ. राजा यांनी केले आहे. 

टॅग्स :laturलातूरLatur S Pपोलीस अधीक्षक, लातूरPoliceपोलिसOsmanabadउस्मानाबाद