शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

थांबे ५५, ऑटोरिक्षा ८ हजारांवर; लातूरातील वाहतूक अडथळ्याचे कारण समोर

By हणमंत गायकवाड | Updated: October 11, 2023 13:59 IST

रिक्षांच्या प्रमाणात थांबे कमी असल्याने वाहतुकीला अडथळा; रिक्षांची संख्या वाढली पण थांब्यांची का नाही?

लातूर : शहरामध्ये ऑटोरिक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत थांब्यांची संख्या वाढविली जात नाही. त्यामुळे ऑटोरिक्षाचालक कुठेही थांबून प्रवासी घेतात. परिणामी, वाहतूक कोंडी अथवा रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी थांबे वाढविण्याची गरज असल्याचे ऑटोरिक्षा चालक संघटनांचे म्हणणे आहे.

शहरात सद्यस्थितीत ५५ थांबे आहेत. सरासरी एका थांब्यावर दहा ते पंधरा ऑटोरिक्षा थांबण्याची क्षमता आहे. त्यानुसार थांब्यावर ६०० च्या आसपास ऑटोरिक्षा असतात. तर याचवेळी रस्त्यांवर धावणाऱ्या ऑटोंची संख्या हजार ते दीड हजारांच्या आसपास असू शकते.उर्वरित ४ हजार ऑटोंनी थांबायचे कुठे, असा प्रश्न ऑटो चालकांना सतावत आहे. त्यामुळे ऑटो चालकांच्या काही संघटनांनी ‘होऊ द्या चर्चा’ असा प्रश्न घेऊन १२ ऑक्टोबरला आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक, हनुमान चौक, गांधी चौक, पाच नंबर चौक, जुना रेणापूर नाका, नवीन रेणापूर नाका, अहिल्यादेवी होळकर चौक, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.औसा रोड रेमंड शोरुम नजीक, राजीव गांधी चौक, राजीव गांधी चौक-२, बसवेश्वर चौक-२, गूळ मार्केट, गंजगोलाई, छत्रपती शाहू महाराज चौक.विवेकानंद चौक, गरुड चौक, मिनी मार्केट चौक, लोकमान्य टिळक चौक, बाभळगाव चौक, म्हाडा कॉलनी प्रवेशद्वार, आरटीओ ऑफिस आदी ठिकाणी अधिकृत थांबे आहेत.

किमान १५० थांबे असावेतशहरामध्ये किमान १५० थांबे करण्यात यावेत, अशी मागणी रिक्षाचालक सेनेचे अध्यक्ष त्र्यंबक स्वामी तसेच परवानाधारक ऑटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळे यांनी केली आहे. थांबे वाढविल्यानंतर वाटेतच ऑटो थांबवून प्रवासी घेण्याचे प्रमाण कमी होऊन रहदारीला अडथळा होणार नाही. ऑटो थांबण्याची क्षमता वाढविल्यानंतर जागोजागी ऑटो थांबणार नाहीत. यामुळे ऑटो चालकांवर खटले दाखल होण्याचे प्रमाणही कमी होईल. 

थांबे वाढविण्याबरोबरच या आहेत मागण्या...ऑटोरिक्षा परमिट बंद करण्यात यावे, कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करण्यात यावी, रिक्षाचालक कल्याणकारी मंडळासाठी घोषित केलेले ५ कोटी रुपये देऊन अंमलबजावणी करावी, रिक्षाचालकांच्या वारसांना आर्थिक मदत करावी, लातूर शहरातील सिटी बसमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी घेतले जातात. ते नियमानुसार घेण्यात यावेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीlaturलातूर