शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

महाबीजचे २० हजार क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध असताना साठेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST

जिल्ह्यात यंदा वेळेवर पेरणी होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यासाठी खत, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. ...

जिल्ह्यात यंदा वेळेवर पेरणी होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यासाठी खत, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, महाबीजचे सोयाबीन बियाणे उपलब्ध नसल्याचे फलक विक्रेत्यांनी दुकानासमोर लावले आहेत. साठेबाजी करून जादा दराने सदर बियाणे विकण्याचे षडयंत्र आहे. मोठ्या प्रमाणात बियाणे उपलब्ध असताना बियाणे नसल्याचे फलक दुकानदार लावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. यावर्षी शासनाने महाडीबीटी पोर्टलवर महाबीज बियाणे आरक्षित करून ठेवले आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी नोंदनी न केल्याने खुल्या बाजारातही महाबीज सोयाबीन बियाणांना मोठी मागणी आहे. महाबीजने लातूर जिल्ह्यात ४८ हजार क्विंटलची मागणी केली असताना सध्या २० हजार क्विंटल बियाणांतही कृषी वितरक काळाबाजार करीत आहेत. अनेक कृषी वितरकांकडून लातूर जिल्ह्यासाठी आलेले बियाणे आंध्र, कर्नाटकच्या शेतकऱ्यांना ज्यादा दराने विकले जात आहे. वितरक डमी शेतकरी दाखवून बनावट सातबारा तसेच इतर कागदपत्रांचे बनावट रेकॉर्ड तयार करून बियाणांची विक्री करत आहेत आणि नियमानुसार बियाण्यांची विक्री करत असल्याचे भासवत आहेत, तर काही वितरक बोगस बियाण्यांची विक्री करत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच जुने खत नव्या दराने विकणे, नवे खत चढ्या दराने विक्री करून लिंकिंग करण्याचे प्रकार घडत आहेत. कृषी विभागाने बियाणे वितरकांची नियमित तपासणी करून साठेबाजी, काळाबाजार आणि लिंकिंग थांबवावी अन्यथा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. कृषी विभाग, महाबीज यांनी पूर्ण नियंत्रण ठेवल्यास असे प्रकार घडणार नाहीत. मात्र, यात कृषी विभागच सहभागी असल्याने कुंपणच शेत खात असल्याची स्थिती आहे. कोणाकडे दाद मागावी, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. दरवर्षी शेतकरी भरडला जात आहे. या गंभीर बाबीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करीत आहे, निवेदनही दिले आहे; परंतु आंदोलनाची भाषा अधिकाऱ्यांना समजत नसल्याने आता तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा मनसेने दिला आहे. निवेदनावर संतोष नागरगोजे, डॉ. नरसिंह भिकाणे, भागवतराव शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.