शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे प्रवासातील सवलत सुरू करा; ज्येष्ठ नागरिकांच्या अधिवेशनात ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 19:41 IST

महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक लाभाच्या योजना वयाच्या ६५ नंतर सुरू होतात. त्या ६० नंतर चालू कराव्यात

लातूर : ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे प्रवासामध्ये सवलत होती. मात्र, ती सवलत कोरोना काळात बंद करण्यात आली. ही सवलत पुन्हा देण्यात यावी. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, असा ठराव ज्येष्ठ नागरिकांच्या लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात करण्यात आला.

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप रविवारी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी दहा ठराव करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक लाभाच्या योजना वयाच्या ६५ नंतर सुरू होतात. त्या ६० नंतर चालू कराव्यात, दारिद्र्यरेषेची व्याख्या, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २१ हजारांच्या आत असले पाहिजे, हा निकष बदलण्यात यावा, ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ५ हजार रुपये पेन्शन चालू करावी, महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व ज्येष्ठांना सुरू करावी, ज्येष्ठ नागरिक संघाने स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या जागेत स्वत:च्या उत्पन्नातून विरंगुळा केंद्र निर्माण करून द्यावीत, आई-वडील व ज्येष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याण कायदा २००७ व नियम २०१० प्रमाणे कारवाईसाठी आदेश द्यावेत, पोलिस अधीक्षकांकडे आलेल्या केसेस त्वरित कारवाईसाठी आदेशित कराव्यात, न्यूक्लिअर फॅमिलीमुळे आता वृद्धाश्रम काळाची गरज निर्माण झाली आहे. शासकीय व खासगी वृद्धाश्रमात शासकीय अनुदान वाढवावे, ज्येष्ठ नागरिकांना महामंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात किमान ५० टक्के ज्येष्ठांना प्रतिनिधित्व देण्यात यावे, हे ठराव पारित करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे, उपाध्यक्ष अशोकराव तेरकर, अरुण रोडे, चंद्रकांत महामुनी, डॉ. निर्मलाताई कोरे, डॉ. बी.आर. पाटील, जगदीश जाजू, आर.जी. जोशी, प्रकाश घादगिने आदींची उपस्थिती होती.

आजी-आजोबांमुळे मुलांवर संस्कार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटीलज्येष्ठ नागरिकांच्या अधिवेशन समारोपप्रसंगी बोलताना सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, पूर्वी घरामध्ये आजी-आजोबा होते. त्यामुळे मुला-मुलींवर योग्य संस्कार होत असत. आता घरामध्ये आजी-आजोबा जड झाले आहेत. त्यामुळे मुले वाईट गोष्टीकडे वळत आहेत, ही बाब तरुण पिढीने लक्षात घेणे गरजेचे आहे. घरात ज्येष्ठांना योग्य तो सन्मान दिला गेला पाहिजे. ज्येष्ठ नागरिक आपल्या घरातील अडगळ न ठरता त्यांना वृद्धाश्रमात पाठविणे अत्यंत चुकीचे आहे, असेही ते म्हणाले. अध्यक्षीय समारोप डॉ. अण्णासाहेब टेकाळे यांनी केला.

टॅग्स :railwayरेल्वेlaturलातूर