शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

तीन दिवसावर बहिणीचे लग्न; विजेच्या धक्क्याने भावाचा मृत्यू

By राजकुमार जोंधळे | Updated: June 26, 2024 23:18 IST

निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील घटना.

राजकुमार जाेंधळे, औराद शहाजानी (जि. लातूर) : अवघ्या तीन दिवसांवर बहिणीची लग्न आहे. घरात लगीनघाई सुरू असताना भावाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना तगरखेडा (ता. निलंगा) येथे बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. सूरज गाेविंदराव माेरे (वय १८) असे मृत मुलाचे नाव आहे.

पाेलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील शेतकरी गोविंदराव मोरे यांचा मुलगा सूरज हा बुधवारी सायंकाळी घरातील गोठ्यात जनावरांना चारा टाकण्यासाठी गेला हाेता. दरम्यान, गोठ्यातील पत्र्यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला जोराचा धक्का बसला. कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी औराद शहाजानी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृतदेहाचे विच्छेदन केल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने माेरे कुटुंबीयांवर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे. याबाबत औराद शहाजानी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस हेडकाॅन्स्टेबल लतिफ सौदागर करत आहेत.

सूरज माेरे हा बारावीत हाेता...

औराद शहाजानी येथील महाराष्ट्र विद्यालयात सूरज हा बारावीमध्ये शिक्षण घेत हाेता. बुधवारी सायंकाळी विद्यालयातून घरी नेहमीप्रमाणे आला हाेता. घरातील जनावरांना चारा टाकण्यासाठी गाेठ्यात गेला असता विजेचा धक्का बसला आणि त्यातच मृत्यू झाला.

बहिणीचा विवाह साेहळा येत्या रविवारी...

रविवार, ३० जून राेजी बहिणीचा विवाह साेहळा हाेता. घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण हाेते. अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या लग्नसाेहळ्यापूर्वीच भावाचा असा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे.

टॅग्स :Accidentअपघात