शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

लातूरमध्ये रस्ते अपघातात वर्षभरात  २९० जणांचा झाला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 20:13 IST

लातूर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा दंडाच्या उद्दीष्ट पूर्तीची अधिक काळजी असल्याची चर्चा आहे़ 

ठळक मुद्देमयतात २१ ते ३० वर्षे वयोगटातील तरूण अधिक अपघाती मृत्यूत दुचाकीचालकांचे प्रमाण अधिक

- आशपाक पठाण 

लातूर : रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे़  २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये अपघात वाढले असून, एकूण ६४१ अपघातात २९० जणांचा मृत्यू झाला आहे़ लातूर जिल्ह्यात सर्वाधिक अपघात अहमदपूर पोलीस ठाणे हद्दीत झाले असून, मृतांमध्ये २१ ते ३० वर्षे वयोगटातील तरूणांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे़ 

लातूर जिल्ह्यात सर्वाधिक वाहतूक लातूर-नांदेड, लातूर-बार्शी, लातूर - अंबाजोगाई, लातूर-तुळजापूर या मार्गावर असून, रस्ते अपघाताचे प्रमाणही याच मार्गावर जास्त असल्याचे आढळून आले आहे़ २०१८ मध्ये जिल्ह्यात एकूण २३३ अपघात झाले होते़ त्यात २४६ जणांचा मृत्यू झाला होता़ दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतुकीची साधणे, चांगले रस्ते होत असले तरी अपघाताची संख्या मात्र तुलनेने घटण्यापेक्षा वाढली आहे़ २०१९ मध्ये वर्षभरात ६४१ अपघात झाले आहेत़ यात २९० जणांचा मृत्यू झाला आहे़ अहमदपूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या प्रमुख मार्गांवर अपघात व मृतांचीही संख्या अधिक आहे़ अहमदपूर ते चाकूर, माळेगाव, किनगाव तसेच शहरानजिक अपघात वाढले आहेत़ 

लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याहद्दीत वर्षभरात २६, रेणापूर हद्दीत २६ व औसा पोलीस ठाणे हद्दीत २२ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे़ शहरातील रिंगरोडवर अपघाताचे प्रमाण वाढत आहे़ दरम्यान, मागील दोन वर्षात रस्ते अपघातात तब्बल ५३६ जणांचा मृत्यू झाला आहे़ वाहतूक नियमांकडे होत असलेले दुर्लक्ष, मद्यपान करून वाहन चालविणे, वेग नियंत्रणात नसणे यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याची माहिती, प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांनी दिली़ 

उद्दीष्ट पूर्तीसाठी वाहतूक शाखेची धडपड वाहतूक सुरळीत करण्याचे काम करणाऱ्या वाहतूक पोलिसांची नजर ही वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा ‘दंड’ आकारण्यातच अधिक असल्याने जिल्ह्यात वाहतूक शिस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे़ लातूर शहरातही वाहतूक शाखेचे पोलीस वर्दळीच्या ठिकाणी उभे असतात़ मात्र वाहतूक कोंडी झाल्यावर ती सुरळीत करण्यापेक्षा दुचाकी किंवा तीनचाकी वाहने लक्ष करीत रस्त्यात मध्यभागी धावत येऊन गर्दीतून वाहने बाजुला काढतात़ यात एखाद्याकडे सर्वच कागदपत्रे आढळून आली तरी शेवटी पीयूसी किंवा कागदपत्रांची सत्य प्रत सोबत नसल्याचे कारण पुढे करीत अडवणूक केली जाते़ अनेकदा वाहतूक पोलीस पुढे येत असल्याचे पाहून दुचाकीचालक भरधाव जातात़ यातून अपघाताच्या घटनाही होतात़ शिवाय, महामार्ग पोलीसही दररोज औसा रोडवर एकाच ठिकाणी वाहन तपासणीत गुंतलेले असतात़ दरम्यान, लातूर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा दंडाच्या उद्दीष्ट पूर्तीची अधिक काळजी असल्याची चर्चा आहे़ 

अपघाती मृत्यूत दुचाकीचालकांचे प्रमाण अधिक२०१९ मध्ये वर्षभरात झालेल्या एकूण अपघातात २९० जणांचा मृत्यू झाला असून, यात दुचाकीवर १८३, पादचारी ५७, चारचाकी ६१, ट्रक ५१, बसेस २२, ट्रॅक्टर १८ व इतर वाहनांच्या अपघातात १९ जणांचा मृत्यू आहे़

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूlaturलातूर