शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
2
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
3
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
4
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
5
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
6
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
7
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
8
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
9
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
10
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
11
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
12
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
13
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
14
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
15
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
16
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
17
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
18
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
19
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
20
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

रिमझिम पावसामुळे खरीप पिकांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST

अहमदपूर : तालुक्यात मान्सूनपूर्व व मृगाचा पाऊस झाल्याने आतापर्यंत ९७.३२ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या. दरम्यान, पावसाने दडी मारल्याने शेतकरी ...

अहमदपूर : तालुक्यात मान्सूनपूर्व व मृगाचा पाऊस झाल्याने आतापर्यंत ९७.३२ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या. दरम्यान, पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस हाेत असल्याने कोमेजून जाणाऱ्या कोवळ्या पिकांना आधार मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

मृगाच्या प्रारंभीच्या पावसावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ४१ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा केला. तसेच ४ हजार ६२१ हेक्टरवर कापसाची लागवड केली. पिकेही चांगली उगवली. मात्र, १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. वाढत्या उन्हामुळे कोवळी पिके करपण्याच्या मार्गावर होती. महागामोलाचे बी-बियाणे, खताचा खर्च निष्फळ ठरून दुबार पेरणी करावी लागणार की काय, अशी भीती व्यक्त होत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून होती. दोन दिवसांपासून तालुक्यात रिमझिम व मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे पिकांना आधार मिळाला असून, समाधान व्यक्त होत आहे.

११ हजार ७६८ हेक्टरवर तूर...

तालुक्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा होतो. त्यापाठोपाठ तुरीचा होतो. यंदा तुरीचा ११ हजार ७६८ हेक्टरवर पेरा झाला असून, मूग ७७४ हेक्टर, उडीद ४५४ हेक्टरवर पेरा झाला आहे. तालुक्यात एकूण ६९ हजार ७३७ हेक्टरवर पिकांची लागवड झाली आहे. मध्यंतरीच्या काळात पावसाने उघडीप दिल्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, ते तुषार सिंचनाद्वारे पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत होते.

पिकांना तात्पुरता आधार मिळाला...

यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. सध्या रिमझिम पाऊस होत असल्याने पिकांना तात्पुरता आधार मिळाला आहे.

- पिंटु मुंढे, शेतकरी.

शेतीमालास योग्य भाव हवा...

दिवसेंदिवस शेती परवडत नाही. त्यात निसर्गही साथ देत नाही. एखाद्या वर्षी निसर्गाने साथ दिली तर शेतीमालाला भाव मिळत नाही. सरकारने शेतपिकांना योग्य भाव द्यावा. तसेच सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

- प्रवीण लांजे, शेतकरी.

गेल्या वर्षीही फटका...

मागील वर्षी काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने पिकांना फटका बसला. त्यामुळे हातची पिके गेली. यंदा महागामोलाची बी-बियाणे, खते खरेदी करून पेरणी केली आहे.

- कालिदास कदम, शेतकरी.

चिंता कमी झाली...

जूनच्या पहिल्या आठवड्यात खरिपाची पेरणी केली. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, रिमझिम पावसामुळे सध्या चिंता कमी झाली आहे.

- वसंत पवार, शेतकरी.