रिक्षाचालकांचे कधी राईट, तर कधी लेफ्ट; पळवापळवीने प्रवाशांचा वैताग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST2021-09-21T04:22:21+5:302021-09-21T04:22:21+5:30
लातूर शहरातील बसस्थानक परिसरात बेशिस्त वाहनथांब्याने प्रवाशांची हेळसांड हाेत आहे. परिणामी, बसस्थानकात बसेस जाण्या-येण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत ...

रिक्षाचालकांचे कधी राईट, तर कधी लेफ्ट; पळवापळवीने प्रवाशांचा वैताग !
लातूर शहरातील बसस्थानक परिसरात बेशिस्त वाहनथांब्याने प्रवाशांची हेळसांड हाेत आहे. परिणामी, बसस्थानकात बसेस जाण्या-येण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. अनेक वाहनधारकांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे समाेर आले आहे. कधी राइट तर कधी लेफ्ट बाजूला ऑटाेरिक्षा थांबत आहेत. म्हणेल तिथे ही वाहने थांबत असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण हाेत आहे. प्रवाशांच्या पळवापळवीसाठी ही स्पर्धा हाेत आहे. तर औसा राेडवर रस्त्यालगत थांबणाऱ्या बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण हाेत आहे. तर आंबाजाेई राेडवरही अशीच स्थिती आहे.
या ठिकाणी रिक्षाचालकांची मनमानी...
बसस्थानक...
शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रिक्षाचालकांची मनमानी पाहायला मिळत आहे. प्रवाशी मिळविण्यासाठी ही स्पर्धा हाेत असल्याचे समाेर आले आहे. मात्र, प्रवाशांना याचा त्रास्त सहन करावा लागत आहे. शिवाय, बसस्थानकांच्या प्रवेशद्वारावरच हे ऑटाे थांबत असल्याने वाहतुकीचा खाेळंबा हाेत आहे.
गांधी चाैक...
लातुरातील गांधी चाैकातही प्रवाशी मिळविण्यासाठी ऑटाेचालकांमध्ये कमालीचे स्पर्धा आहे. यातून अस्ताव्यस्त वाहन थांबविणे, बेशिस्तपणे पार्किंग करण्याचे प्रकार पुढे आले आहेत. परिणामी, गांधी चाैकात वाहतूककाेंडी हाेत आहे. अशीच स्थिती मिनि मार्केट काॅर्नरला आहे.
गुळ मार्केट चाैक...
लातुरातील वर्दळीचा चाैक असलेल्या गूळ मार्केट चाैकात वाहतूककाेंडी कायम आहे. चाैकात असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे समाेर आले आहे. येथेही प्रवाशी मिळविण्यासाठी माेठी स्पर्धा आहे. यातूनच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन हाेत आहे. परिणामी, नागरिक कमालीचे त्रस्त आहेत.
प्रवाशांना त्रास...
बसस्थानक, गूळ मार्केट चाैक, गांधी चाैक, मिनी मार्केट काॅर्नर यांसह शहरातील बहुतांश चाैकांत बेशिस्तपणामुळे वाहतुकीचा खाेळंबा हाेत आहे. याचा प्रवाशांना त्रास हाेत आहे. या बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्याची गरज आहे. - अमृत जावळकर
लातुरातील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर ऑटाेवाल्यांचा दिवसभर थांबा असताे. मात्र, प्रवाशी मिळविण्यासाठी हाेणारी स्पर्धा आणि त्यातून वाहतूक नियमांचे उल्लंघन हाेत आहे. परिणामी, प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय, बसचालकांनाही बसमध्ये आणि बाहेर काढताना कसरत करावी लागत आहे.
- प्रकाश जाधव
मनमानी भाडे...
१ गत मार्च २०२० पासून टप्प्या-टप्प्याने प्रवासी वाहतूक बदलली आहे. एका ऑटाेत दाेघे जण, किंबहुना कुटुंबातील तिघे असा प्रवास आहे.
२ त्यातच पेट्राेल-डिझेलची झालेली दरवाढ ही सामान्य वाहनधारकांच्या आवाक्याबाहेरची आहे. यातूनच प्रवासी भाडेवाढ करावी लागली आहे.
३ ही भाडेवाढ करताना समानतेचा नियम लागू नाही. प्रत्येक जण मनमानी भाडे आकारत असल्याने भाड्याबाबत प्रवाशी संभ्रमात आहेत.
४ ठरावीक अंतराला अमुक भाडे, तमुक भाडे असे ठरले पाहिजे. त्याबाबत जागृती हाेण्याची गरज आहे. मनमानी भाडेवाढीवर नियंत्रण काेणाचे आहे, असा सवाल उपस्थित हाेत आहे.
बेशिस्त ऑटाेचालकांवर खटले
लातूर शहरातील चाैकाचाैकांत ऑटाेचालकांना थांबे ठरवून देण्यात आले आहेत. त्यांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे. मात्र, काही ऑटाेचालकांकडून नियमांचे पालन हाेत नसल्याचे समाेर आले आहे. अशांवर वाहतूक शाखेकडून खटले दाखल केले जात आहेत. शिवाय, दंडही केला जात आहे.
- सुनील बिर्ला, पाेलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, लातूर