शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

आषाढी वारीवर निर्बंध; विश्व हिंदू परिषद करणार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST

आषाढी वारी हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. अगदी निजाम राजवटीतही वारी सुरूच होती. वारीला ...

आषाढी वारी हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. अगदी निजाम राजवटीतही वारी सुरूच होती. वारीला कोणतीही आडकाठी नव्हती. सध्या राज्यात असणाऱ्या तीन पक्षांच्या सरकारने मात्र वारीवर निर्बंध घातले आहेत. हा निर्णय चुकीचा आहे. सरकारच्या या निर्णयाचा विश्व हिंदू परिषद निषेध करीत असल्याचे ते म्हणाले. देशपांडे म्हणाले, कोरोनाविषयक नियम पाळून मर्यादित संख्येत आम्ही पंढरपूरला जाण्याची तयारी दर्शवली होती. वारी २० दिवसांऐवजी १० दिवस करावी. गरज असेल तर केंद्रीय पोलीस बल मागवावे. दिवसा वारीमुळे संसर्गाचा धोका असेल तर रात्रीच्या वेळी जाण्याची परवानगी द्यावी. मुक्काम गावाबाहेर करण्यासह आणखी काही नियमांचे पालन करीत वारीला आम्ही परवानगी मागितली होती; पण सरकार तयार झाले नाही.

संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानदेव महाराज, संत सोपानदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह इतर संतांच्या पालख्याही पंढरपुरात येत असतात. या दिंड्यांसह किमान दोन वारकऱ्यांना जाण्यास परवानगी द्यावी. प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या वारकऱ्यानांच सहभागी होऊ द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली. सरकारने वारीला परवानगी नाकारल्यामुळे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने १६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी भजन आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतरही सरकारने परवानगी दिलीच नाही तर आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येक गावात एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. गाव हेच पंढरपूर आणि झाड हाच पांडुरंग असे समजून झाडाच्या स्वरूपातील विठ्ठलाची पूजा प्रत्येक गावातील वारकरी करतील, असेही यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला महानगराध्यक्ष बालाजीराव गवळी, हभप भरत भिंगोलीकर महाराज, हभप बाबू महाराज शिवलकर, वासुदेवाचार्य कमठाणकर, गौरीशंकर कौळखेरे यांची उपस्थिती होती.