शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

जीर्ण जलकुंभ पाडा; रेणापूर तालुक्यातील हरवाडीकरांचे जलकुंभावर चढून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 17:30 IST

हरवाडी येथील पाणीपुरवठ्याचे जलकुंभ जीर्ण झाले आहे़ ते कधीही कोसळण्याची भिती आहे़

रेणापूर (जि. लातूर) : तालुक्यातील हरवाडी येथील पाणीपुरवठ्याचे जलकुंभ जीर्ण झाले आहे़ ते कधीही कोसळण्याची भिती आहे़ त्यामुळे हे जलकुंभ पाडण्यात यावे, अशी वारंवार मागणी करण्यात आली असतानाही त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे, असा आरोप करीत गावक-यांनी मंगळवारी जलकुंभावर चढून आज आंदोलन केले़.

रेणापूर तालुक्यातील हरवाडी गावास पाणीपुरवठ्यासाठी ५० वर्षांपूर्वी जलकुंभ बांधण्यात आला़ सध्या हा जलकुंभ जीर्ण अवस्थेत आहे़ काही दिवसांपूर्वी जलकुंभाचा काही भाग ढासळून एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता़ जीर्ण अवस्थेमुळे या जलकुंभाचा वापर बंद करण्यात आला आहे़ दरम्यान, हे जलकुंभ जमीनदोस्त करण्यात यावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनास निवेदने दिली होती़ परंतु, ग्रामपंचायत आणि पंचायत समितीकडून त्याची दखल घेण्यात आली नाही़ दरम्यान, २२ नोव्हेंबर रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना निवेदन देण्यात येऊन या जलकुंभामुळे परिसरातील नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे़ त्यामुळे ते पाडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली़ 

प्रशासनाकडून त्याची कुठलीही दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेले नागरिक मंगळवारी सकाळी १०़३० वा़ च्या सुमारास जलकुंभावर चढून उपोषण, आंदोलन सुरु केले आहे़ दरम्यान, दुपारी ३़३० वा़ जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गोडभरले यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन कार्यवाही करण्यासंदर्भात पाठपुरावा केला जाईल, असे सांगितल्याने गावकºयांनी आपले आंदोलन मागे घेतले़

प्रशासनाच्या कारभारावर संतापगावातील जीर्ण जलकुंभ पाडावे, अशी वारंवार मागणी केली जात आहे़ परंतु, त्यास प्रशासनाकडून दाद देण्यात येत नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आणि संताप व्यक्त केला़ या आंदोलनात उपसरपंच हणमंत कातपूरे, गोविंद ढोरमारे, अशोक गंगथडे, सतीश चोथवे, गणेश गंगथडे, सतीश माने, शिवाजी भंडे, दीपक चोथवे, नानासाहेब माने, मच्छिंद्र माने, दादाराव शिवणकर, चंद्रकांत माने आदी सहभागी झाले होते़ दरम्यान, जि़प़ सदस्य सुरेंद्र गोडभरले यांनी मध्यस्थी केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले़

गावकरी पाच तास जलकुंभावऱ़मंगळवारी सकाळी १०़३० वा़पासून गावकºयांनी आंदोलन सुरु केले होते़ ते दुपारी ३़३० वा़ मागे घेण्यात आले़ दरम्यान, या आंदोलनास ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी, भारतीय जनता पार्टी, संभाजी सेना, यशवंत सेना, महाराष्ट्र विकास आघाडी, एस.आर.ग्रुप खरोळा आदींनी पाठिंबा दर्शविला़

टॅग्स :agitationआंदोलनlaturलातूरWaterपाणी