शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जीर्ण जलकुंभ पाडा; रेणापूर तालुक्यातील हरवाडीकरांचे जलकुंभावर चढून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 17:30 IST

हरवाडी येथील पाणीपुरवठ्याचे जलकुंभ जीर्ण झाले आहे़ ते कधीही कोसळण्याची भिती आहे़

रेणापूर (जि. लातूर) : तालुक्यातील हरवाडी येथील पाणीपुरवठ्याचे जलकुंभ जीर्ण झाले आहे़ ते कधीही कोसळण्याची भिती आहे़ त्यामुळे हे जलकुंभ पाडण्यात यावे, अशी वारंवार मागणी करण्यात आली असतानाही त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे, असा आरोप करीत गावक-यांनी मंगळवारी जलकुंभावर चढून आज आंदोलन केले़.

रेणापूर तालुक्यातील हरवाडी गावास पाणीपुरवठ्यासाठी ५० वर्षांपूर्वी जलकुंभ बांधण्यात आला़ सध्या हा जलकुंभ जीर्ण अवस्थेत आहे़ काही दिवसांपूर्वी जलकुंभाचा काही भाग ढासळून एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता़ जीर्ण अवस्थेमुळे या जलकुंभाचा वापर बंद करण्यात आला आहे़ दरम्यान, हे जलकुंभ जमीनदोस्त करण्यात यावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनास निवेदने दिली होती़ परंतु, ग्रामपंचायत आणि पंचायत समितीकडून त्याची दखल घेण्यात आली नाही़ दरम्यान, २२ नोव्हेंबर रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना निवेदन देण्यात येऊन या जलकुंभामुळे परिसरातील नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे़ त्यामुळे ते पाडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली़ 

प्रशासनाकडून त्याची कुठलीही दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेले नागरिक मंगळवारी सकाळी १०़३० वा़ च्या सुमारास जलकुंभावर चढून उपोषण, आंदोलन सुरु केले आहे़ दरम्यान, दुपारी ३़३० वा़ जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गोडभरले यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन कार्यवाही करण्यासंदर्भात पाठपुरावा केला जाईल, असे सांगितल्याने गावकºयांनी आपले आंदोलन मागे घेतले़

प्रशासनाच्या कारभारावर संतापगावातील जीर्ण जलकुंभ पाडावे, अशी वारंवार मागणी केली जात आहे़ परंतु, त्यास प्रशासनाकडून दाद देण्यात येत नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आणि संताप व्यक्त केला़ या आंदोलनात उपसरपंच हणमंत कातपूरे, गोविंद ढोरमारे, अशोक गंगथडे, सतीश चोथवे, गणेश गंगथडे, सतीश माने, शिवाजी भंडे, दीपक चोथवे, नानासाहेब माने, मच्छिंद्र माने, दादाराव शिवणकर, चंद्रकांत माने आदी सहभागी झाले होते़ दरम्यान, जि़प़ सदस्य सुरेंद्र गोडभरले यांनी मध्यस्थी केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले़

गावकरी पाच तास जलकुंभावऱ़मंगळवारी सकाळी १०़३० वा़पासून गावकºयांनी आंदोलन सुरु केले होते़ ते दुपारी ३़३० वा़ मागे घेण्यात आले़ दरम्यान, या आंदोलनास ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी, भारतीय जनता पार्टी, संभाजी सेना, यशवंत सेना, महाराष्ट्र विकास आघाडी, एस.आर.ग्रुप खरोळा आदींनी पाठिंबा दर्शविला़

टॅग्स :agitationआंदोलनlaturलातूरWaterपाणी