शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

पावसामुळे दिलासा; रेणा प्रकल्पात ३१ टक्के पाणीसाठा !

By संदीप शिंदे | Updated: July 22, 2024 17:27 IST

प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा

रेणापूर : तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पाच्या परिसरात मागील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्याने ३१.१५ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. रेणापूर तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पाची एकूण क्षमता २१.८० दलघमी असून, सोमवारपर्यंत प्रकल्पामध्ये ३१.१५ टक्के जलसाठा झाला आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यास रेणापूर तालुक्यातील सिंचनासह पाणीपुरवठा योजनेला फायदा होणार आहे. मध्यम प्रकल्प हा तालुक्यातील अर्ध्या गावांची सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची तहान भागवतो. या प्रकल्पावर शेतकरी व नागरिक अवलंबून आहे. त्यामुळे रेणा मध्यम प्रकल्प हा सर्वांच्या दृष्टिकोनाने अत्यंत महत्त्वाचा आहे.

रेणा मध्यम प्रकल्पात ७ जुनपर्यंत फक्त १.५ टक्का जलसाठा होता. गतवर्षी तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पाऊस झाला. तसेच दरवर्षी परतीच्या पावसामध्ये मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतो. याच काळात जास्त प्रमाणात जलसाठा झाल्यास पाण्याची क्षमता पाहून रेणा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येते. मात्र, गतवर्षी पावसाळा आणि परतीचा पाऊस न झाल्याने प्रकल्पातील साठा जेमतेम राहिला होता. परिणामी, जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित केला होता. त्याचबरोबर तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला होता. उन्हाच्या तीव्रतेमुळे व पाणीपुरवठा योजनेसाठी उपसा केल्याने या मध्यम प्रकल्पात केवळ १.५ टक्के जलसाठा होता. तालुक्यात प्रामुख्याने धरण क्षेत्रात आठ जूनपासून सुरू झालेल्या पाऊसाने प्रकल्पात पाण्याची २१ टक्क्याने वाढला होता. त्यानंतर अधून-मधून पाऊस पडत गेल्याने जलसाठ्यातही वाढ होत गेली. सद्यस्थिती ३१.१५ टक्के साठा असून, ९ ते १० महिने हा साठा पाणीपूरवठा योजनांसाठी चालू शकतो. मात्र, सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याची आवश्यकता असून, शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

प्रकल्पात असा झाला जलसाठा...रेणा मध्यम प्रकल्पात १० जुनला २ टक्के वाढून पाण्याची टक्केवारी ३.४० टकके, ११ जुनला १६ टक्के, १२ जुन रोजी पाण्याची टक्केवारी २१ वर पोहचली होती. १० जुलैला २३.१५ व २१ जुलैला २४.४७ टक्के जलसाठा झाला होता. दोन-तीन दिवसांतील पावसामुळे प्रकल्पात पाण्याचा वेग वाढल्याने सोमवारी ३१.१५ टक्के एकूण प्रकल्पात जलसाठा झाला आहे. गेल्या आठवड्याभरात प्रकल्प क्षेत्रामध्ये कमी जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने सोमवारपर्यंत ३१ टक्के साठा असून, मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

रेणापूर मध्यम प्रकल्प सद्यस्थिती...रेणा मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा ६.४०० दलघमी असून, मृत पाणीसाठा १.१३ दलघमी आहे. एकूण पाणीसाठा ७.५३० दलघमी असून, पाण्याची टक्केवारी ३१.१५ टक्के आहे. या प्रकल्पावर तालुक्यातील शेतीचे गणित अवलंबून असून, अनेक गावांना प्रकल्पाचा आधार आहे. जुनच्या तुलनेत जुलै महिन्यात चांगला पाऊस पडत असल्याने लवकरच प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यासाठी माेठ्या पावसाची गरज असून, अद्याप काही नद्यांचे पात्र कोरडेच आहे.

टॅग्स :laturलातूरRainपाऊसWaterपाणीAgriculture Sectorशेती क्षेत्र