शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बाजारभावापेक्षा अधिक दर; तरीही नाफेडच्या हातावर 'तुरी'! महिनाभरात रुपयाचीही खरेदी नाही

By हरी मोकाशे | Updated: February 1, 2024 18:24 IST

१० हजारांच्या पुढे भाव, नाफेडच्या केंद्रांना शेतकऱ्यांची प्रतीक्षा

लातूर : शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी राज्य शासनाने नाफेडमार्फत यंदा बाजारभावानुसार तूर खरेदी करण्याचा निर्णय घेऊन सुरुवात केली. परंतु, महिना उलटला तरी अद्यापही एक रुपयाची खरेदी झाली नाही. त्यामुळे सध्या नाफेडच्या हातावर शेतकऱ्यांनी तुरी दिल्याचे पहावयास मिळत आहे. परिणामी, नाफेडच्या केंद्रांना शेतकऱ्यांची प्रतीक्षा लागून आहे.

दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला सर्वोच्च ११ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. त्यामुळे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे ओढा वाढला आहे. तूर पीक हे अधिक कालावधीचे असल्याने एकाच वर्षातील खरीप व रबी हे दोन्ही हंगाम घेता येत नसल्याने शेतकऱ्यांचा तुरीकडे कल कमी झाला आहे. गत खरीपात जिल्ह्यात तुरीचा ६४ हजार ४६३ हेक्टरवर पेरा झाला होता. महिनाभरापासून तुरीच्या काढणीस सुरुवात झाली आहे. सध्या दर चांगला मिळत असल्याने बहुतांश शेतकरी तूर विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. बाजार समितीत दररोज ७ हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे.

तूर विक्रीसाठी ४३ शेतकऱ्यांची नोंदणी...राज्य शासनाने दि महाराष्ट्र स्टेट को- ऑप. मार्केटिंग फेडरेशनमार्फत जिल्ह्यात तूर खरेदीसाठी १२ केंद्र सुरु केले आहेत. या केंद्रावर आतापर्यंत ४३ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. आणखीन नोंदणीची मुदत आहे. विशेष म्हणजे, महिनाभरात एकाही शेतकऱ्याने केंद्रावर तूर विक्री केली नाही. विशेषत: शेतकऱ्यांकडून चौकशीही केली जात नाही.

दोन दिवसांत दर वाढले...दिनांक - बाजारातील दर - नाफेडचा दर२० जाने. - ९७०० - ९७८४२४ जाने. - ९८०० - ९७८४२५ जाने. - १०००० - ९५८९२९ जाने. - १०१५० - ९७८२३० जाने. - १०१०० - ९८१४३१ जाने. - ९९०० - १०१५७१ फेब्रु. - १०००० - १०१६८

हमीभावापेक्षा ३ हजार जास्त...केंद्र शासनाने आधारभूत किंमत योजनेअंतर्गत यंदा तुरीस ७ हजार रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे. दरम्यान, बाजारपेठेत गेल्या दोन वर्षांपासून अधिक दर असल्याने राज्य शासनाने बाजारभावानुसार यंदा प्रथमच तूर खरेदीस सुरुवात केली. सध्या हमीभावापेक्षा ३ हजार रुपये अधिक भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

बाजारात मापतोल झाल्यानंतर पट्टी...नाफेडच्या केंद्रावर नोंदणीची किचकट प्रक्रिया आहे. बहुतांश शेतकऱ्यांना माहिती नाही. खुल्या बाजारात शेतमालाचा मापतोल झाल्यानंतर पट्टी दिली जाते. त्यामुळे शेतकरी नाफेडच्या केंद्राकडे जात नाहीत.- शिवलिंग भेदे, शेतकरी.

शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळेना...बाजारभावानुसार तूर खरेदीसाठी १२ केंद्र सुरु करण्यात आले आहेत. मात्र, महिनाभरापासून शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाही. आतापर्यंत ४३ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली असली तरी खरेदी काहीही नाही.- विलास सोमारे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र