शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

किल्लारी सहकारी कारखान्यासाठी रास्तारोको; १५ दिवसांत निर्णय घेण्याची आंदोलकांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 20:00 IST

किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी शासनाने येत्या १५ दिवसांत निर्णय घ्यावा, या प्रमुख मागणीसाठी आंदोलकांनी केली.

किल्लारी (लातूर ) : किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी शासनाने येत्या १५ दिवसांत निर्णय घ्यावा, या प्रमुख मागणीसाठी आज लातूर- उमरगा मार्गावरील किल्लारी कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर रास्तारोको आंदोलन कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आले़

किल्लारी साखर कारखाना हा सभासद, ऊस उत्पादक, कारखाना कर्मचारी आणि व्यापाऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सध्या हा कारखाना अवसायकाच्या ताब्यात आहे़ कारखान्यावर साडेतीन कोटींचे कर्ज आहे़ परंतु, तो सुरु करण्यासाठी वेळेत टेंडर काढले जात नाही़ तीन तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या या कारखान्याचे एकुण २० हजार सभासद आहेत़ पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि उमरग्याचे आ़ ज्ञानेश्वर चौगुले हे सत्ताधारी पक्षाचे आहेत़ सध्या या भागात ६ लाख एकरवर ऊसाची लागवड झाली असून हा ऊस कुठे पाठवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे़ मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांनी कारखाना सुरु करण्याचे जाहीर केले होते़ परंतु, अद्याप कुठलीही प्रक्रिया सुरु झाली नाही़ कारखाना सुरु करण्यासाठी आताच टेंडर काढावे लागते़ कारण जुलैमध्ये मशीनरीची दुरुस्ती करुन साधारणत: आॅक्टोबरमध्ये कारखाना सुरु होतो़ 

दरम्यान, कारखाना कृती समितीने मुख्यमंत्री, सहकारमंत्री, पालकमंत्र्यांची वारंवार भेट घेऊन निवेदने दिली़ परंतु, आश्वासनाशिवाय कुठलीही प्रक्रिया झाली नाही़ कारखाना सुरु करण्यासंदर्भात कुठल्याही हलचाली सुरु नाही़ येत्या हंगामात हा कारखाना सुरु करण्यात यावा, या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले़  यावेळी गुंडाप्पा बिराजदार, विजयकुमार सोनवणे, नानाराव भोसले, किल्लारीचे उपसरपंच अशोक पोतदार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, सचिन पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे, गुलाब शिंदे, बापूराव कुन्हाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, दिलीप लोहार, माजी पंचायत समिती सदस्य जयपाल भोसले,  राजाराम इंगळे, रमेश हेळंबे, निवृत्ती भोसले, रुक्मानंद पवार आदी उपस्थित होते़ पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक गणेश कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता़

राज्यमार्गावरील वाहतूक तासभर ठप्प़यावेळी गुंडाप्पा बिराजदार, विजयकुमार सोनवणे, नानाराव भोसले, किल्लारीचे उपसरपंच अशोक पोतदार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, सचिन पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी मनोगत व्यक्त केले. सभासदांनी नायब तहसीलदार शिवाजी कदम यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले़ यावेळी संपत माने, मंडळाधिकारी जी.आर. खुर्दे, तलाठी व्यंकट पवार होते. हे आंदोलन तासभर करण्यात आले़ त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़ शेतकरी आत्महत्या केल्यानंतर मदत करण्यापेक्षा कारखाना सुरु करुन मदत करावी, अशी मागणी कारखाना बचाव कृती समितीने केली़ येत्या १५ दिवसांत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला़

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र