शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

किल्लारी सहकारी कारखान्यासाठी रास्तारोको; १५ दिवसांत निर्णय घेण्याची आंदोलकांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 20:00 IST

किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी शासनाने येत्या १५ दिवसांत निर्णय घ्यावा, या प्रमुख मागणीसाठी आंदोलकांनी केली.

किल्लारी (लातूर ) : किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी शासनाने येत्या १५ दिवसांत निर्णय घ्यावा, या प्रमुख मागणीसाठी आज लातूर- उमरगा मार्गावरील किल्लारी कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर रास्तारोको आंदोलन कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आले़

किल्लारी साखर कारखाना हा सभासद, ऊस उत्पादक, कारखाना कर्मचारी आणि व्यापाऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सध्या हा कारखाना अवसायकाच्या ताब्यात आहे़ कारखान्यावर साडेतीन कोटींचे कर्ज आहे़ परंतु, तो सुरु करण्यासाठी वेळेत टेंडर काढले जात नाही़ तीन तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या या कारखान्याचे एकुण २० हजार सभासद आहेत़ पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि उमरग्याचे आ़ ज्ञानेश्वर चौगुले हे सत्ताधारी पक्षाचे आहेत़ सध्या या भागात ६ लाख एकरवर ऊसाची लागवड झाली असून हा ऊस कुठे पाठवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे़ मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांनी कारखाना सुरु करण्याचे जाहीर केले होते़ परंतु, अद्याप कुठलीही प्रक्रिया सुरु झाली नाही़ कारखाना सुरु करण्यासाठी आताच टेंडर काढावे लागते़ कारण जुलैमध्ये मशीनरीची दुरुस्ती करुन साधारणत: आॅक्टोबरमध्ये कारखाना सुरु होतो़ 

दरम्यान, कारखाना कृती समितीने मुख्यमंत्री, सहकारमंत्री, पालकमंत्र्यांची वारंवार भेट घेऊन निवेदने दिली़ परंतु, आश्वासनाशिवाय कुठलीही प्रक्रिया झाली नाही़ कारखाना सुरु करण्यासंदर्भात कुठल्याही हलचाली सुरु नाही़ येत्या हंगामात हा कारखाना सुरु करण्यात यावा, या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले़  यावेळी गुंडाप्पा बिराजदार, विजयकुमार सोनवणे, नानाराव भोसले, किल्लारीचे उपसरपंच अशोक पोतदार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, सचिन पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे, गुलाब शिंदे, बापूराव कुन्हाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, दिलीप लोहार, माजी पंचायत समिती सदस्य जयपाल भोसले,  राजाराम इंगळे, रमेश हेळंबे, निवृत्ती भोसले, रुक्मानंद पवार आदी उपस्थित होते़ पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक गणेश कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता़

राज्यमार्गावरील वाहतूक तासभर ठप्प़यावेळी गुंडाप्पा बिराजदार, विजयकुमार सोनवणे, नानाराव भोसले, किल्लारीचे उपसरपंच अशोक पोतदार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, सचिन पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी मनोगत व्यक्त केले. सभासदांनी नायब तहसीलदार शिवाजी कदम यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले़ यावेळी संपत माने, मंडळाधिकारी जी.आर. खुर्दे, तलाठी व्यंकट पवार होते. हे आंदोलन तासभर करण्यात आले़ त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़ शेतकरी आत्महत्या केल्यानंतर मदत करण्यापेक्षा कारखाना सुरु करुन मदत करावी, अशी मागणी कारखाना बचाव कृती समितीने केली़ येत्या १५ दिवसांत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला़

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र