शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने भर उन्हाळ्यात बॅरेज भरले; अतिरिक्त पाणी कर्नाटकात वाहिले

By हरी मोकाशे | Updated: May 5, 2023 18:05 IST

सव्वा महिन्यात २६० मिमी पाऊस; उच्चस्तरीय, कोल्हापुरी बंधारे भरले

औराद शहाजानी : यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळीचा कहर आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या चार दिवसांत एकूण २६० मिमी पाऊस झाला असून आजपर्यंत सर्वाधिक असा नोंदला गेला आहे. मुसळधारेमुळे नाले, ओढे तर वाहिलेच. शिवाय, तेरणा नदी वाहती होऊन नदीवरील कोरडे पडलेले चार उच्चस्तरीय बंधारे व दोन कोल्हापुरी बंधारे पुन्हा भर उन्हाळ्यात भरले आहेत. या बंधाऱ्यातील अतिरिक्त पाणी कर्नाटकात साेडून देण्यात आले आहे.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीच्या तेरणा नदी पट्ट्यात यंदा कधी उन्हाळा तर कधी पावसाळ्याचा प्रत्यय येत आहे. तापमानाचा पारा ४३ अं.से.पर्यंत पोहोचला असताना अवकाळी पावसाचा माराही होत आहे. या उन्हं पावसाच्या खेळात एप्रिलमध्ये कमाल तापमान ४३.५ अं.से. असे नोंदले गेले. तसेच पावसानेही उन्हाळ्यात नवा विक्रम केला. एप्रिलमध्ये १७७ मिमी एवढा पाऊस झाला. मे महिन्याच्या ५ तारखेपर्यंत ९० मिमी पाऊस झाला. दोनदा ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, गुरुवारी तासभरात पुन्हा ५० मिमी पाऊस झाला. त्यामुळे तेरणा नदी पट्ट्यातील ओढे, नाले आणि काही ठिकाणी नदीचे पात्रही वाहते झाले.

उच्चस्तरीय बंधाऱ्याची दारे उघडली...नदीवरील औराद, तगरखेडा, गुंजरगा हे उच्चस्तरीय बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. सोनखेड उच्चस्तरीय बंधारा क्षमतेप्रमाणे भरला आहे. याशिवाय चांदोरी येथील ओढ्यावरील कोल्हापुरी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला असून मांजरा नदीवरील वांजरखेडा बंधाऱ्यातील कमी झालेला जलसाठा पुन्हा वाढला आहे. शुक्रवारी पहाटे या सर्व उच्चस्तरीय बंधाऱ्याची दारे दीड मीटरने उघडून अतिरिक्त पाणी कर्नाटकात साेडून देण्यात आल्याची माहिती जलसिंचनचे अभियंता काेल्हे यांनी दिली.

भाजीपाला, फळबागांना मोठा फटका...एकंदरित, या भागातील कोरडे पडलेले नाले, नद्या पावसाळ्यासारख्या वाहू लागल्या आहेत. अवकाळी पावसात वीज पडून गेल्या आठवड्यात दाेघांचा बळी गेला. तसेच २४ पेक्षा अधिक जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला. पावसामुळे शेकडो हेक्टरवरील फळबागा, भाजीपाला, ज्वारीचे अतोनात नुकसान झाले. हाता- तोंडाशी आलेल्या पिकांची नासाडी झाली. द्राक्ष, शेवग्याच्या बागांना फटका बसला आहे. टोमॅटोचीही नासाडी झाली आहे.

जमिनीची धूप हाेईना...यंदाच्या उन्हाळ्यात सतत अवकाळी पाऊस होत असल्याने जमिनीच्या मशागत अद्याप झाली नाही. नांगरणीसह शेतीतील मेहनतीची कामे झाली नाहीत. जमीन तापली नाही. त्यामुळे जमिनीची धूप हाेणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील वर्षी उत्पादन निघत नाही, असे शेतकरी शिवाजी अंचुळे यांनी सांगितले.

 

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद