शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी येईल शेतकऱ्यांच्या दारी, सिंचन वाढीसाठी लातूरात खोदल्या जाणार १२ हजार विहिरी!

By हरी मोकाशे | Updated: October 18, 2023 19:13 IST

गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी मगांराग्रारोहयो अंतर्गत कुटुंब समृद्धी मोहीम

लातूर : शेतीचे सिंचन क्षेत्र वाढीबरोबरच ग्रामीण भागातील शेतकरी, मजुरांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या वतीने मगांराग्रारोहयोअंतर्गत कुटुंब समृद्ध मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात किमान ११ हजार ७९० सिंचन विहिरी खोदण्याचे उद्दिष्ट आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. दरम्यान, आता मी समृद्ध, तर गाव समृद्ध, गाव समृद्ध, तर माझा महाराष्ट्र समृद्ध करण्याचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या सर्वांगीण विकासासाठी मगांराग्रारोहयोअंतर्गत कुटुंब समृद्ध मोहीम राबविण्यात येणार आहे. या योजनेतून मजुरांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न येत आहे. दरम्यान, शासनाच्या वतीने ‘हर खेत को पानी’ ही संकल्पना राबविण्यात येणार असून, त्याअंतर्गत सिंचन विहिरी खोदण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. एका सिंचन विहिरीसाठी चार लाख उपलब्ध होणार आहेत.

नोव्हेंबरमध्ये कार्यारंभ आदेश...मगांराग्रारोहयोअंतर्गत मागेल त्याला विहीर देण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामरोजगार सेवकांची बैठक व लाभार्थी निवड केली जाणार आहे. त्यानंतर प्रस्ताव पंचायत समितीस दाखल करणे, छाननी, तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता ही ऑक्टोबरअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. १ नोव्हेंबर रोजी कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहेत.

निलंगा तालुक्यास सर्वाधिक उद्दिष्ट...तालुका - ग्रामपंचायती - उद्दिष्टअहमदपूर - ९७ - १४५५औसा - १०९ - १६३५चाकूर - ७१ - १०६५देवणी - ४५ - ६७५जळकोट - ४३ - ६४५लातूर - १११ - १६६५निलंगा - ११६ - १७४०रेणापूर - ६५ - ९७५शिरूर अनं. - ४२ - ६३०उदगीर - ८७ - १३०५एकूण - ७८६ - ११७९०

मागेल त्याला सिंचन विहीर मिळणार...महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना सिंचन विहिरीचा लाभ देऊन कुटुंब समृद्ध करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करून लाभ घ्यावा. या योजनेच्या माध्यमातून शेतीचे सिंचन क्षेत्र वाढविण्याबरोबरच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा...एका सिंचन विहिरीसाठी चार लाख रुपयांचा खर्च होणार आहे. त्यातून मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्याबरोबरच सिंचन क्षेत्र वाढणार आहे. त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होणार आहे. अल्पभूूधारक शेतकऱ्यांनी विहिरीसाठी ग्रामंचायतीकडे तत्काळ प्रस्ताव दाखल करावेत.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रlaturलातूर