शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

समृद्धी येईल शेतकऱ्यांच्या दारी, सिंचन वाढीसाठी लातूरात खोदल्या जाणार १२ हजार विहिरी!

By हरी मोकाशे | Updated: October 18, 2023 19:13 IST

गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी मगांराग्रारोहयो अंतर्गत कुटुंब समृद्धी मोहीम

लातूर : शेतीचे सिंचन क्षेत्र वाढीबरोबरच ग्रामीण भागातील शेतकरी, मजुरांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या वतीने मगांराग्रारोहयोअंतर्गत कुटुंब समृद्ध मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात किमान ११ हजार ७९० सिंचन विहिरी खोदण्याचे उद्दिष्ट आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. दरम्यान, आता मी समृद्ध, तर गाव समृद्ध, गाव समृद्ध, तर माझा महाराष्ट्र समृद्ध करण्याचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या सर्वांगीण विकासासाठी मगांराग्रारोहयोअंतर्गत कुटुंब समृद्ध मोहीम राबविण्यात येणार आहे. या योजनेतून मजुरांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न येत आहे. दरम्यान, शासनाच्या वतीने ‘हर खेत को पानी’ ही संकल्पना राबविण्यात येणार असून, त्याअंतर्गत सिंचन विहिरी खोदण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. एका सिंचन विहिरीसाठी चार लाख उपलब्ध होणार आहेत.

नोव्हेंबरमध्ये कार्यारंभ आदेश...मगांराग्रारोहयोअंतर्गत मागेल त्याला विहीर देण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामरोजगार सेवकांची बैठक व लाभार्थी निवड केली जाणार आहे. त्यानंतर प्रस्ताव पंचायत समितीस दाखल करणे, छाननी, तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता ही ऑक्टोबरअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. १ नोव्हेंबर रोजी कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहेत.

निलंगा तालुक्यास सर्वाधिक उद्दिष्ट...तालुका - ग्रामपंचायती - उद्दिष्टअहमदपूर - ९७ - १४५५औसा - १०९ - १६३५चाकूर - ७१ - १०६५देवणी - ४५ - ६७५जळकोट - ४३ - ६४५लातूर - १११ - १६६५निलंगा - ११६ - १७४०रेणापूर - ६५ - ९७५शिरूर अनं. - ४२ - ६३०उदगीर - ८७ - १३०५एकूण - ७८६ - ११७९०

मागेल त्याला सिंचन विहीर मिळणार...महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना सिंचन विहिरीचा लाभ देऊन कुटुंब समृद्ध करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करून लाभ घ्यावा. या योजनेच्या माध्यमातून शेतीचे सिंचन क्षेत्र वाढविण्याबरोबरच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा...एका सिंचन विहिरीसाठी चार लाख रुपयांचा खर्च होणार आहे. त्यातून मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्याबरोबरच सिंचन क्षेत्र वाढणार आहे. त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होणार आहे. अल्पभूूधारक शेतकऱ्यांनी विहिरीसाठी ग्रामंचायतीकडे तत्काळ प्रस्ताव दाखल करावेत.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रlaturलातूर