शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
3
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
4
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
5
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
6
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
7
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
9
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
10
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
11
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
12
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
13
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
14
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
15
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
16
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
17
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
18
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
19
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
20
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  

जिल्ह्यातील ६००० रिक्षाचालकांच्या रोटीचा प्रश्न मिटला; ज्यांना रिक्षा नाही त्यांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:18 IST

लातूर : जिल्ह्यात सहा ते सात हजार परवानाधारक रिक्षाचालकांची संख्या असून, बहुतांश रिक्षाचालकांनी शासनाने केलेल्या मदतीच्या घोषणेचे स्वागत ...

लातूर : जिल्ह्यात सहा ते सात हजार परवानाधारक रिक्षाचालकांची संख्या असून, बहुतांश रिक्षाचालकांनी शासनाने केलेल्या मदतीच्या घोषणेचे स्वागत केले आहे. भाड्याने रिक्षा चालविणाऱ्या चालकांनाही या मदतीचा लाभ द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने १४ एप्रिल रोजी रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे रिक्षाची प्रवासी वाहतूक बंद राहणार आहे. शासनाकडून फक्त परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. परंतु, भाड्याने रिक्षा चालविणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ज्यांची रिक्षा नाही, परंतु रिक्षा चालवितात त्यांचे काय, असा प्रश्न काही चालकांनी उपस्थित केला आहे. दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा सरकारने लाॅकडाऊनच्या काळात पाच हजार रुपयांची मदत देऊ केली. त्या धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही पाच हजारांची मदत द्यायला हवी होती, अशी अपेक्षाही काही रिक्षाचालकांनी व्यक्त केली. रिक्षा चालविण्याचा परवाना आहे; बॅज आहे, परंतु, रिक्षा नाही, अशा चालकांनाही दीड हजाराच्या मदतीत घ्यावे, अशी मागणी आहे. परंतु, याबाबतचा काय निर्णय आहे, ते शासन आदेशानंतरच कळणार असले तरी घोषणेचे चालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

परवानाधारक अनेक रिक्षाचालक भाड्याने रिक्षा देतात. अशा रिक्षाचालकांनाही या योजनेत मदत द्यायला हवी. जाहीर झालेली मदत कमी आहे. दिल्ली, कर्नाटक आणि तेलंगणा सरकारांच्या धर्तीवर पाच हजार रुपये मदत द्यायला हवी होती. अनेकांनी कर्जावर रिक्षा घेतलेल्या आहेत. त्यांचे हप्ते फेडणे मुश्किल आहे.

- त्रिंबक स्वामी

शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांना जाहीर केलेली मदत समाधानकारक आहे. पूर्वी रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी योजना जाहीर केली होती. परंतु, त्याबाबत कोणतीच मदत किंवा सरकारी योजनांचा लाभ रिक्षाचालकांना मिळाला नाही. आता जाहीर केलेल्या मदतीचे पैसे सुलभ पद्धतीने मिळावेत.

- मच्छिंद्र कांबळे