शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
3
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
4
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
5
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
6
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
7
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
8
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
9
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
10
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
11
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
12
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
14
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
15
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
16
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
17
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
18
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
19
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
20
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक विचारातून नकारार्थी भाव कमी होण्यास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:14 IST

लातूर : मानसिक आजारामुळे शारीरिक कार्यक्षमतेवर परिणाम होतो. मानसिक आरोग्य निकोप होण्यासाठी विवेकी विचारांची जोपासना केली पाहिजे. सकारात्मक विचार ...

लातूर : मानसिक आजारामुळे शारीरिक कार्यक्षमतेवर परिणाम होतो. मानसिक आरोग्य निकोप होण्यासाठी विवेकी विचारांची जोपासना केली पाहिजे. सकारात्मक विचार वाढवून नकारार्थी भाव कमी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मनोविकार तज्ज्ञ डॉ. वैशाली पाटील यांनी येथे व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मानसिक आरोग्य व्यवस्थापन व विविध उपक्रम विभागांतर्गत ‘मन उधाण वाऱ्याचे’ या विषयावर त्या बोलत होत्या. डॉ. पाटील म्हणाल्या, मनोविकारांबद्दल समाजात खूप अंधश्रद्धा आहेत. योग्य व वेळेत उपचार घेतल्यास तीव्र मनोविकार आटोक्यात आणणे शक्य आहे. मानसिक आरोग्य बिघडल्यास शरिराला त्रास होतो. मानसिक आरोग्य बिघडण्यास सामाजिक आणि जैविक कारणे आहेत. त्यामुळे जसे शारीरिक आरोग्य आपण जपतो, तसे मानसिक आरोग्यही आपण जपले पाहिजे. दररोज शरिराच्या स्वच्छतेबरोबर मनाची स्वच्छता नियमित केली पाहिजे. सकारात्मक विचार वाढवून नकारार्थी भाव कमी केले पाहिजेत. शारीरिक आरोग्याला आहार, व्यायाम आवश्यक आहे. तसे मानसिक आरोग्याला वाचन, निरीक्षण, अनुभव, चिंतन, मनन हे महत्त्वाचे आहे. मानसिक आजारातून व्यसनाधिनता वाढू शकते. त्यासाठी योग्य समुपदेशन व उपचार केल्यास व्यसनाधिनता नाहीशी करता येऊ शकते. कोरोना काळात मानसिक आरोग्य सुदृढ ठेवले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

‘अंनिस’चे प्रधान सचिव माधव बावगे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविक अतुल सवाखंडे यांनी केले. सूत्रसंचालन धर्मराज चवरे यांनी केले तर अजय भालकर यांनी आभार मानले.