शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

भाजपाकडून धार्मिक द्वेषाचे राजकारण; मौलाना सज्जाद नोमानींच परखड मत

By आशपाक पठाण | Updated: December 3, 2023 14:47 IST

विज्ञानाला अध्यात्माची जोड दिल्यास हमखास यश

लातूर : केवळ धार्मिक शिक्षणातून आपला विकास होणार नाही. जोपर्यंत धार्मिक, अध्यात्मिक शिक्षणाला विज्ञानाची जोड दिली जाणार नाही, तोपर्यंत आपण कोणत्याही क्षेत्रात प्रगतीपथावर जाणार नाही. देशात  सर्वसामान्यांच्या प्रश्नांना बगल देऊन धार्मिक अजेंडा रेटला जात आहे. यातून केवळ भांडवलदार मोठे होतील, सामान्य माणसाची प्रगती होणे कदापी शक्य नाही, असा दावा मौलाना खलीलुर्रहमान सज्जाद नोमानी यांनी केला.

लातूर येथे रविवारी माध्यमांशी संवाद साधताना मौलाना म्हणाले, देशात धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण केले जात आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. देशाची खरी शक्ती संविधान आहे, यावर देश चालतो. परंतू काही मनुवादी विचासरणीचे लोक संविधानाला बगल देण्याचे काम करीत आहेत. सरकारला विरोध केला की देशद्रोह ठरविण्याचे काम केले जात आहे. केवळ मुस्लिमांना विरोध करून संपूर्ण देशाचे नुकसान करू नका. आपला देश सामाजिक एकतेवर टिकून आहे. येथील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, दलित, ओबीसी, भटके, आदिवासी सर्वजण गुण्यागोविंदाने नांदत असताना काही नतदृष्ट लोक दरी निर्माण करण्याचे काम करीत आहेत. त्यांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. 

अध्यात्म, संशोधनाची शक्ती...अध्यात्म, संशोधन ज्यांच्याकडे ते कधीही यशस्वी होतात. त्यांना जगाची कुठलीच शक्ती अडथळा निर्माण करू शकत नाही. ही क्षमता आपल्याकडे आहे. पाश्चिमात्य देशाची शक्ती भारताला कमजोर करण्याचे षडयंत्र करीत आहेत. मात्र, अध्यात्म, संशोधनाचे शिक्षण घेऊन तयार होणारी पिढी देशाच्या विकासात अमूल्य योगदान देईल, त्यांना कोणीही रोखू शकणार नाही, असेही मौलाना सज्जाद नोमानी यांनी सांगितले.

एकता ही हमारी पहेचान...भारताची एकता हीच जगात खरी ओळख आहे. कितीही ध्रुवीकरण केले तरी ते जास्त काळ टिकणार नाही. सरकार भांडवलदार लोकांच्या हिताचे आहे. शासकीय कंपन्या विकून भांडवलदार मोठे केले जात आहेत. यावर कोणी विरोध करू नये, यासाठी हिंदू-मुस्लिम, मंदिर-मस्जिद हा विषय आणला जातो. देश उद्योगपतींच्या घशात घालण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. परंतू इथला सुजाण नागरिक जागा झाला की त्यांची सर्व मनसुबे धुळीस मिळतील.

भारत जगावर राज्य करेल...

जाती,धर्माच्या नावाला ध्रुवीकरण करून शिक्षण, रोजगार, आरोग्य आदी मुद्यांवरील लक्ष विचलित केले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एनआरसी, सीएएची भाषा केली जात आहे. विशिष्ट वर्गाची मते एकगठ्ठा मिळाली पाहिजेत, यासाठी भाजपा, आरएसएसचा हा अजेंडा आहे. सामान्य माणूस आता जागा झाला आहे. धार्मिक राजकारणाला बगल देऊन आपण एकसंघ झालो तर जगावर राज्य करू शकतो. आपल्यापुढे कुणाचीही दादागिरी चालणार नाही, असेही मौलाना सज्जाद नोमानी यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाlaturलातूरspiritualअध्यात्मिकEducationशिक्षण