शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

निवडणुक निकालानंतरच महाविकास आघाडीचे चित्र होणार स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:16 IST

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियोजन करण्यात आले आहे. निवडणूक निकालानंतर कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्रित येतील. त्यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिऱ्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी ...

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियोजन करण्यात आले आहे. निवडणूक निकालानंतर कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्रित येतील. त्यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिऱ्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. सर्वाधिक ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीलाच यश मिळेल.

- श्रीशैल उटगे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून ज्या-ज्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन लढत देण्याचा प्रयत्न केला. हे प्रयत्न यशस्वी झाले. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त ग्रामपंचायतींत हा प्रयत्न केला आहे. साधारणपणे सर्वाधिक जागांवर महाविकास आघाडीचा विजय होईल. यासंदर्भातील खरे चित्र निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.

- आ. बाबासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. सरकार चांगले काम करीत आहे. गावस्तरावरही महाविकास आघाडीचा प्रभाव दिसून येत आहे. अनेक गावांत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्रित येऊन महाविकास आघाडीला सर्वाधिक यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील.

- संतोष सोमवंशी, जिल्हाध्यक्ष, शिवसेना

३८३ ग्रां.प.साठी मतदान...

निवडणूक विभागाच्या वतीने ४०८ ग्रामपंचायतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र, २५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ३८३ ग्रा.पं.साठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. जवळपास सहा लाख ७२ हजार मतदार आपला हक्क बजावणार आहेत. १ हजार ४५९ मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे.

निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष...

राज्यात महाविकास आघाडीच्या वतीने विधान परिषद निवडणुका एकत्रितपणे लढविण्यात आल्या. त्यामध्ये बहूतांश प्रमाणात यश आले. तोच फॉर्म्युला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राबविला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना पक्षांचे उमेदवार वेगवेगळ्या पॅनेलकडून लढत असले तरी निकालानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.