शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

पानगावचे बसस्थानक गावाबाहेर; प्रवाशांची गैरसाेय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:25 IST

पानगाव : रेणापूर तालुक्यातील बाजारपेठेच्या दृष्टीने महत्त्वाचे गाव म्हणून पानगावची ओळख आहे. या भागातील प्रवाशाची गैरसोय लक्षात घेऊन पानगाव ...

पानगाव : रेणापूर तालुक्यातील बाजारपेठेच्या दृष्टीने महत्त्वाचे गाव म्हणून पानगावची ओळख आहे. या भागातील प्रवाशाची गैरसोय लक्षात घेऊन पानगाव येथे १३ लाख रुपये खर्च करून १५ वर्षांपूर्वी सुसज्ज बसस्थानक उभारण्यात आले; परंतु ते गावाबाहेर असल्याने एकही प्रवासी बसस्थानकाकडे फिरकत नाही. परिणामी, उभारण्यात आलेल्या बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे.

रेणापूर तालुक्यातील पानगाव हे गाव बीड व लातूर सीमेवर वसलेले आहे. गावची लोकसंख्या २० ते २५ हजार असून, येथे शनिवारी आठवडी बाजारासह रोजच्या खरेदी विक्रीसाठी परिसरातील ३० ते ४० गावांतील नागरिक येतात. यादृष्टीने प्रवाशाची गैरसोय लक्षात घेऊन १३ लाख रुपये खर्चून १५ वर्षांपूर्वी रेल्वे स्थानकालगत पानगाव बसस्थानकाची उभारणी केली. परंतु, ते गावाच्या बाहेर असल्याने प्रवाशांना व नागरिकांना जावे लागते. त्यामुळे गावातील मुख्य रस्त्यावरील असलेल्या थांब्यावर अनेक प्रवासी थांबतात. तेथूनच गाडी पकडतात. शिवाय अवैध प्रवासी वाहतूक करण्याचे थांबे गावातच आहेत. त्यामुळे प्रवासी बसस्थानकावर न जाता गावातील थांब्यावरूनच चढतात व उतरतात. त्यामुळे बसस्थानकात कोणी फिरकत नसल्यामुळे बसस्थानक प्रवाशांअभावी व वाहतूक नियंत्रकाअभावी ओस पडले आहे.

बसस्थानकाची दुरवस्था...

पानगाव येथील बसस्थानकाला संरक्षक भिंत नसल्याने मोकाट पशुधनाचा वावर वाढला आहे, तसेच वीज, पाण्याची सुविधा नसल्याने गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. प्रवाशांची ये-जा नसल्याने परिसरात स्वच्छता नाही. परिणामी, झाडे-झुडपे वाढले असून, याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.