शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

फाजिल आत्मविश्वासाने माझा पराभव : शिवराज पाटील चाकूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 14:23 IST

सलग ३५ वर्ष राजकारणात स्वच्छ प्रतिमा जपत कार्य केले तरी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. 

चाकूर ( लातूर ) : नगरपालिकेपासून विविध अकरा निवडणुका मी जिंकल्या. मात्र २००४ ची लोकसभा निवडणूक अगदी सोपी आहे असा फाजिल आत्मविश्वास कार्यकर्त्यानी दाखविला. यामुळे माझा पराभव झाला असा उलगडा माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी आज येथे केला. 

रोटरी क्लबच्यावतीने चाकूर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा स्वागत समारंभ कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयात घेण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा जेष्ठ कॉंग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या दरम्यान अॅड्. युवराज पाटील यांनी चाकूरकर यांना सलग ३५ वर्ष राजकारणात स्वच्छ प्रतिमा जपत कार्य केले तरी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला असा प्रश्न विचारला. 

यावर उत्तर देतांना तब्बल १४ वर्षांनी चाकूरकर यांनी पराभवाच्या कारणाचा उलगडा केला. ते म्हणाले, नगरपालिकेपासून विविध अकरा निवडणुका मी जिंकल्या. मात्र लोकसभा निवडणूक अगदी सोपी आहे असा फाजिल आत्मविश्वास कार्यकर्त्यानी दाखविला. यामुळे माझा त्या निवडणुकीत अगदी नवख्या उमेदवारांकडून पराभव झाला. राजकारणात आलेल्या नव्या नेतृत्वाने गाफील राहू नये असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला.

२००४ ला होते प्रधानमंत्री पदाचे दावेदार राजकीय कारकिर्दीत सातत्याने यश मिळत असतांना सन २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपाच्या नवख्या उमेदवार रुपाताई पाटील निलंगेकर यांनी चाकूरकर यांचा पराभव केला होता. नगराध्यक्ष ते लोकसभा सभापती असा दांडगा अनुभव असलेले चाकूरकर या निवडणूकीत विजयी झाले असते तर ते पंतप्रधानपदाचे दावेदार ठरले असते असे अनेक राजकीय विश्लेषकांचे आजही मत आहे. 

चढा आलेख असणारी राजकीय कारकीर्द चाकूरसारख्या छोटय़ा गावात जन्मलेल्या शिवराज पाटलांनी आपले नाव देशपातळीवर केले. लातूरच्या नगराध्यक्षापासून केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत त्यांची राजकीय कारकीर्द चढत्या क्रमाने गाजली. दयानंद विधी महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी करीत व लातूरच्या न्यायालयात वकिली व्यवसाय करून जीवन व्यतीत करण्याचा त्यांचा मानस होता. पण मित्रांच्या आग्रहाखातर त्यांनी लातूर नगरपालिकेची निवडणूक लढवली व जिंकली.  त्यानंतर विविध निवडणुका जिंकत राजकीय कारकिर्दीतील यशाने त्यांची संगत धरली. नगराध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती या चढत्या क्रमानंतर खासदार, केंद्रीय राज्यमंत्री, केंद्रीय कॅबिनेट मंत्री त्यानंतर लोकसभेचे सभापती, केंद्रीय गृहमंत्री, पंजाबचे राज्यपाल अशी त्यांची कारकीर्द राहिली आहे.

टॅग्स :Shivraj Patil Chakurkarशिवराज पाटील चाकूरकरlaturलातूरcongressकाँग्रेसPoliticsराजकारणlok sabhaलोकसभा