शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
2
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
3
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
4
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
5
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
6
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
7
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
8
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
9
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
10
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
11
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
12
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
13
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
14
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
15
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
16
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
17
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
18
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
19
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
20
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ निधीत ६ कोटींवर लातूर जिल्ह्याची बोळवण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 18:43 IST

खरीप हंगामाध्ये पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून पिके गेली. रबीचा पेराही झाला नाही.

- हणमंत गायकवाड

लातूर : लातूर जिल्ह्याची अंतिम आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असताना १० पैकी केवळ एकाच तालुक्याला ६ कोटी ६३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ३ कोटी ३१ लाख रुपये पहिल्या हप्त्यात मिळणार आहेत. उर्वरित नऊ तालुके दुष्काळनिधीच्या प्रतीक्षेत आहेत . सद्य:स्थितीत ६ कोटींवरच बोळवण केल्याची भावना शेतकऱ्यांची झाली आहे. 

लातूर जिल्ह्यात ५३ महसूल मंडळे आहेत. या सर्वच महसूल मंडळांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीप आणि रबी हंगामही शेतकऱ्यांच्या हाती लागला नाही. सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली. रबीचा पेरा तर १०० टक्केही होऊ शकला नाही. शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या १५१ तालुक्यांमध्ये लातूर जिल्ह्यातील एकमेव शिरूर अनंतपाळ तालुक्याचा समावेश आहे. लातूर, निलंगा, औसा, अहमदपूर, उदगीर, देवणी, जळकोट, रेणापूर, चाकूर या नऊ तालुक्यांना वाऱ्यावर सोडले आहे.

पीकविमा व दुष्काळ जाहीर करावा म्हणून चाकूर तहसील कार्यालयात अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील आ. विनायकराव पाटील यांनी उपोषण केले. जिल्हास्तरावरही पाठपुरावा केला; मात्र अद्याप काहीच उपाययोजना नाहीत. जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलात ३३.५० टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर, टंचाई जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या उपाययोजना केवळ कागदावरच दिसत आहेत. गायी-म्हशी विकत घेणे, शेळीपालन, कुक्कुट पालन, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, मिनी डाळ मिल, मिनी आॅईल मिल, पॅकिंग व ग्रेडिंग सेंटर, ट्रॅक्टर व औजारे, पॉवर टिलर या योजनेचाही लाभ दुष्काळी योजना म्हणून केला जात नसल्याने शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. 

ही तर शेतकऱ्यांची चेष्टाच...खरीप हंगामाध्ये पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून पिके गेली. रबीचा पेराही झाला नाही. शासनाने सरसकट एकरी ५० हजार रुपये दुष्काळ भरपाई देणे गरजेचे असताना केवळ एका तालुक्यालाच निधी जाहीर केला आहे, ही शेतकऱ्यांची चेष्टा असल्याची भावना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :droughtदुष्काळfundsनिधीState Governmentराज्य सरकार