शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

दुष्काळ निधीत ६ कोटींवर लातूर जिल्ह्याची बोळवण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 18:43 IST

खरीप हंगामाध्ये पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून पिके गेली. रबीचा पेराही झाला नाही.

- हणमंत गायकवाड

लातूर : लातूर जिल्ह्याची अंतिम आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असताना १० पैकी केवळ एकाच तालुक्याला ६ कोटी ६३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ३ कोटी ३१ लाख रुपये पहिल्या हप्त्यात मिळणार आहेत. उर्वरित नऊ तालुके दुष्काळनिधीच्या प्रतीक्षेत आहेत . सद्य:स्थितीत ६ कोटींवरच बोळवण केल्याची भावना शेतकऱ्यांची झाली आहे. 

लातूर जिल्ह्यात ५३ महसूल मंडळे आहेत. या सर्वच महसूल मंडळांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीप आणि रबी हंगामही शेतकऱ्यांच्या हाती लागला नाही. सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली. रबीचा पेरा तर १०० टक्केही होऊ शकला नाही. शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या १५१ तालुक्यांमध्ये लातूर जिल्ह्यातील एकमेव शिरूर अनंतपाळ तालुक्याचा समावेश आहे. लातूर, निलंगा, औसा, अहमदपूर, उदगीर, देवणी, जळकोट, रेणापूर, चाकूर या नऊ तालुक्यांना वाऱ्यावर सोडले आहे.

पीकविमा व दुष्काळ जाहीर करावा म्हणून चाकूर तहसील कार्यालयात अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील आ. विनायकराव पाटील यांनी उपोषण केले. जिल्हास्तरावरही पाठपुरावा केला; मात्र अद्याप काहीच उपाययोजना नाहीत. जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलात ३३.५० टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर, टंचाई जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या उपाययोजना केवळ कागदावरच दिसत आहेत. गायी-म्हशी विकत घेणे, शेळीपालन, कुक्कुट पालन, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, मिनी डाळ मिल, मिनी आॅईल मिल, पॅकिंग व ग्रेडिंग सेंटर, ट्रॅक्टर व औजारे, पॉवर टिलर या योजनेचाही लाभ दुष्काळी योजना म्हणून केला जात नसल्याने शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. 

ही तर शेतकऱ्यांची चेष्टाच...खरीप हंगामाध्ये पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून पिके गेली. रबीचा पेराही झाला नाही. शासनाने सरसकट एकरी ५० हजार रुपये दुष्काळ भरपाई देणे गरजेचे असताना केवळ एका तालुक्यालाच निधी जाहीर केला आहे, ही शेतकऱ्यांची चेष्टा असल्याची भावना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :droughtदुष्काळfundsनिधीState Governmentराज्य सरकार