शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दुष्काळ निधीत ६ कोटींवर लातूर जिल्ह्याची बोळवण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 18:43 IST

खरीप हंगामाध्ये पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून पिके गेली. रबीचा पेराही झाला नाही.

- हणमंत गायकवाड

लातूर : लातूर जिल्ह्याची अंतिम आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असताना १० पैकी केवळ एकाच तालुक्याला ६ कोटी ६३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ३ कोटी ३१ लाख रुपये पहिल्या हप्त्यात मिळणार आहेत. उर्वरित नऊ तालुके दुष्काळनिधीच्या प्रतीक्षेत आहेत . सद्य:स्थितीत ६ कोटींवरच बोळवण केल्याची भावना शेतकऱ्यांची झाली आहे. 

लातूर जिल्ह्यात ५३ महसूल मंडळे आहेत. या सर्वच महसूल मंडळांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीप आणि रबी हंगामही शेतकऱ्यांच्या हाती लागला नाही. सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली. रबीचा पेरा तर १०० टक्केही होऊ शकला नाही. शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या १५१ तालुक्यांमध्ये लातूर जिल्ह्यातील एकमेव शिरूर अनंतपाळ तालुक्याचा समावेश आहे. लातूर, निलंगा, औसा, अहमदपूर, उदगीर, देवणी, जळकोट, रेणापूर, चाकूर या नऊ तालुक्यांना वाऱ्यावर सोडले आहे.

पीकविमा व दुष्काळ जाहीर करावा म्हणून चाकूर तहसील कार्यालयात अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील आ. विनायकराव पाटील यांनी उपोषण केले. जिल्हास्तरावरही पाठपुरावा केला; मात्र अद्याप काहीच उपाययोजना नाहीत. जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलात ३३.५० टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर, टंचाई जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या उपाययोजना केवळ कागदावरच दिसत आहेत. गायी-म्हशी विकत घेणे, शेळीपालन, कुक्कुट पालन, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, मिनी डाळ मिल, मिनी आॅईल मिल, पॅकिंग व ग्रेडिंग सेंटर, ट्रॅक्टर व औजारे, पॉवर टिलर या योजनेचाही लाभ दुष्काळी योजना म्हणून केला जात नसल्याने शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. 

ही तर शेतकऱ्यांची चेष्टाच...खरीप हंगामाध्ये पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून पिके गेली. रबीचा पेराही झाला नाही. शासनाने सरसकट एकरी ५० हजार रुपये दुष्काळ भरपाई देणे गरजेचे असताना केवळ एका तालुक्यालाच निधी जाहीर केला आहे, ही शेतकऱ्यांची चेष्टा असल्याची भावना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :droughtदुष्काळfundsनिधीState Governmentराज्य सरकार