शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

बळीराजाचा अडचणींचा फेरा सुटेना; बँकांकडून ४४ टक्केच पतपुरवठा!

By हरी मोकाशे | Updated: June 29, 2024 20:57 IST

खरीप हंगाम : सव्वालाख शेतकऱ्यांना १ हजार ७६ कोटी कर्ज वितरण

हरी मोकाशे, लातूर : गेल्या वर्षी साेयाबीनच्या उत्पादनात घट झाल्याने आणि बाजारपेठेत दर घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे खरीपासाठी कर्जाकडे लक्ष लागून आहे. परंतु, बँकांनी आखडता हात घेतल्याचे पहावयास मिळत आहे. आतापर्यंत केवळ ४४.८६ टक्के पतपुरवठा करण्यात आला आहे. परिणामी, बळीराजाचा आर्थिक अडचणीचा फेरा सुटत नसल्याचे पहावयास मिळत आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा असून त्यावरच संपूर्ण वर्षभराची भिस्त असते. जिल्ह्यात सोयाबीनचे पीक हुकमी मानले जाते. त्यामुळे सर्वाधिक पेरा होतो. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला उच्चांकी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा ओढा आणखीन वाढला. मात्र, त्यानंतर सतत दरात घसरण होत गेली. सध्या तर ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटलच्या जवळपास दर आहे. परिणामी, उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खरिपासाठी आर्थिक अडचण जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धावाधाव सुरु आहे.

सोयाबीनचे सव्वाचार लाख हेक्टर क्षेत्र...

जिल्ह्यात खरिपाचा ५ लाख ९७ हजार हेक्टरवर पेरा हाेईल, असा अंदाज होता. यंदा वेळेवर मृग बरसल्याने आतापर्यंत जवळपास ८३ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात सोयाबीनचा सर्वाधिक ४ लाख ७ हजार हेक्टरवर पेरा झाला आहे.

आर्थिक चणचण दूर करण्यासाठी मदत...

शेतकऱ्यांचे वार्षिक अर्थचक्र खरिपावर अवलंबून असते. त्यामुळे खरीपात बी- बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसाठी बळीराजास आर्थिक अडचण भासू नये म्हणून बँकांच्या वतीने पतपुरवठा करण्यात येतो. त्यातून शेतकऱ्यांची नड भागल्याने खासगी कर्जाची गरज भासत नाही. मात्र, आतापर्यंत ४४.८६ टक्के कर्ज वितरण झाले आहे.

सर्वाधिक कर्ज जिल्हा बँकेकडून...बँक - कर्ज वितरण (टक्के)जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक - ७६.२६व्यापारी व इतर बँका - २३.६५ग्रामीण बँक - ४७.१५एकूण - ४४.८६

जिल्ह्यातील सव्वालाख शेतकऱ्यांना कर्ज...

खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील २२ बँकांना २ हजार ३९९ कोटी ९९ लाखांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी जिल्हा बँकेेने ८४ हजार ५२१ शेतकऱ्यांना ६५० कोटी ७५ लाख ९१ हजार, ग्रामीण बँकेने १० हजार ९७२ शेतकऱ्यांना १२० कोटी ७० लाख तर राष्ट्रीयकृत व इतर बँकांनी २८ हजार १७ शेतकऱ्यांना ३०५ कोटी १९ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. आतापर्यंत एकूण १ लाख २३ हजार ५१० शेतकऱ्यांना १ हजार ७६ कोटी ६४ लाख ९१ हजारांचे कर्जपुरवठा करण्यात आला आहे.

कर्ज वितरणाच्या सूचना...

शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागविण्यासाठी जिल्हा बँकेने अधिक कर्ज वितरण केेले आहे. इतर बँकांनीही लवकर पतपुरवठा करावा म्हणून सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक आठवड्यास शासन स्तरावरून आढावा घेण्यात येत आहे. - संगमेश्वर बदनाळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था).

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रbankबँकFarmerशेतकरीfarmingशेती