शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बळीराजाचा अडचणींचा फेरा सुटेना; बँकांकडून ४४ टक्केच पतपुरवठा!

By हरी मोकाशे | Updated: June 29, 2024 20:57 IST

खरीप हंगाम : सव्वालाख शेतकऱ्यांना १ हजार ७६ कोटी कर्ज वितरण

हरी मोकाशे, लातूर : गेल्या वर्षी साेयाबीनच्या उत्पादनात घट झाल्याने आणि बाजारपेठेत दर घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे खरीपासाठी कर्जाकडे लक्ष लागून आहे. परंतु, बँकांनी आखडता हात घेतल्याचे पहावयास मिळत आहे. आतापर्यंत केवळ ४४.८६ टक्के पतपुरवठा करण्यात आला आहे. परिणामी, बळीराजाचा आर्थिक अडचणीचा फेरा सुटत नसल्याचे पहावयास मिळत आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा असून त्यावरच संपूर्ण वर्षभराची भिस्त असते. जिल्ह्यात सोयाबीनचे पीक हुकमी मानले जाते. त्यामुळे सर्वाधिक पेरा होतो. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला उच्चांकी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा ओढा आणखीन वाढला. मात्र, त्यानंतर सतत दरात घसरण होत गेली. सध्या तर ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटलच्या जवळपास दर आहे. परिणामी, उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खरिपासाठी आर्थिक अडचण जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धावाधाव सुरु आहे.

सोयाबीनचे सव्वाचार लाख हेक्टर क्षेत्र...

जिल्ह्यात खरिपाचा ५ लाख ९७ हजार हेक्टरवर पेरा हाेईल, असा अंदाज होता. यंदा वेळेवर मृग बरसल्याने आतापर्यंत जवळपास ८३ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात सोयाबीनचा सर्वाधिक ४ लाख ७ हजार हेक्टरवर पेरा झाला आहे.

आर्थिक चणचण दूर करण्यासाठी मदत...

शेतकऱ्यांचे वार्षिक अर्थचक्र खरिपावर अवलंबून असते. त्यामुळे खरीपात बी- बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसाठी बळीराजास आर्थिक अडचण भासू नये म्हणून बँकांच्या वतीने पतपुरवठा करण्यात येतो. त्यातून शेतकऱ्यांची नड भागल्याने खासगी कर्जाची गरज भासत नाही. मात्र, आतापर्यंत ४४.८६ टक्के कर्ज वितरण झाले आहे.

सर्वाधिक कर्ज जिल्हा बँकेकडून...बँक - कर्ज वितरण (टक्के)जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक - ७६.२६व्यापारी व इतर बँका - २३.६५ग्रामीण बँक - ४७.१५एकूण - ४४.८६

जिल्ह्यातील सव्वालाख शेतकऱ्यांना कर्ज...

खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील २२ बँकांना २ हजार ३९९ कोटी ९९ लाखांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी जिल्हा बँकेेने ८४ हजार ५२१ शेतकऱ्यांना ६५० कोटी ७५ लाख ९१ हजार, ग्रामीण बँकेने १० हजार ९७२ शेतकऱ्यांना १२० कोटी ७० लाख तर राष्ट्रीयकृत व इतर बँकांनी २८ हजार १७ शेतकऱ्यांना ३०५ कोटी १९ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. आतापर्यंत एकूण १ लाख २३ हजार ५१० शेतकऱ्यांना १ हजार ७६ कोटी ६४ लाख ९१ हजारांचे कर्जपुरवठा करण्यात आला आहे.

कर्ज वितरणाच्या सूचना...

शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागविण्यासाठी जिल्हा बँकेने अधिक कर्ज वितरण केेले आहे. इतर बँकांनीही लवकर पतपुरवठा करावा म्हणून सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक आठवड्यास शासन स्तरावरून आढावा घेण्यात येत आहे. - संगमेश्वर बदनाळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था).

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रbankबँकFarmerशेतकरीfarmingशेती