शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश द्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:13 IST

शासकीय कार्यालयात पाच दिवसांचा आठवडा झाला असून, सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ पर्यंतची कार्यालयीन वेळ आहे. मात्र कोणीही वेळेवर ...

शासकीय कार्यालयात पाच दिवसांचा आठवडा झाला असून, सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ पर्यंतची कार्यालयीन वेळ आहे. मात्र कोणीही वेळेवर येत नसल्याचे चित्र आहे. अनेकजण चाकूर शहर व तालुक्यात नोकरी करतात. मुक्कामी ३० ते ३५ कि. मी. दूर असलेले लातूर, अहमदपूर, उदगीर आदी ठिकाणी जातात. वास्तविकपणे जे घरभाडे उचलतात, त्यांनी मुख्यालयी असले पाहिजेत. असे न होता शासकीय, अधिकारी, कर्मचारी हे दररोज अप-डाऊन करतात. माध्यमिक शाळा सुरू झाल्या असून, प्राध्यापक, शिक्षक लातूर, अहमदपूर आदी ठिकाणांवरुन दररोज चाकूर व तालुक्यात ये-जा करतात. त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. शासनाकडून मुख्यालयी राहण्याचे घरभाडे उचलून मुख्यालयी न राहता अप-डाऊन करणा-यांविरुध्द गुन्हे दाखल करावेत. आतापर्यंत उचललेले घरभाडे वसूल करून शासनाच्या तिजोरीत जमा करावे. यापुढे कोणी मुख्यालयी राहत नसेल, तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी. शिक्षकांना नोकरीच्या गावी मुख्यालयी राहण्याचे आदेश द्यावेत, असेही निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर सुधाकरराव लोहारे, नारायण बेजगमवार, शिवलिंग गादगे, सागर होळदांडगे, अनिल महालिंगे, अजय धनेश्वर, अजित घंटेवाड, विश्वनाथ कांबळे, शिवकुमार सोनटक्के, दत्ता झांबरे आदींची नावे आहेत.