शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

बलशाली भारत निर्माण होण्यासाठी निर्व्यसनी समाज हवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 14:13 IST

शतायुषी डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्याशी संवाद

ठळक मुद्देमाझे जीवन लोकांसाठी समर्पित आहेलोकांनी केलेला गौरवच सर्वश्रेष्ठ...

अहमदपूर (लातूर ) : महात्मा बसवेश्वरांनी ‘काय कवे कैलास...’ हा सिद्धांत दिला. माणसाच्या कार्यातच देव आहे, असा या सिद्धांताचा मतितार्थ आहे. या विचारातून प्रेरणा घेऊन कर्मकांडविरहित समाजरचना निर्माण झाली पाहिजे. बलशाली भारत निर्माण करण्यासाठी समाज निर्व्यसनी असला पाहिजे, असा हितोपदेश राष्ट्रसंत शतायुषी डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी दिला. 

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हणतात, भारत हा शेतीप्रधान देश आहे. या देशात शेतकरी सुखी असेल तर राष्ट्र सुखी राहील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासनाने ठोस कार्य करण्याची गरज आहे. काश्मीरचा प्रश्न राजकीय आहे. त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन त्यावर मार्ग काढणे अपेक्षित आहे. तरच भारत एकसंघ राहील. कमी व योग्य आहार तसेच आहार, व्यवहारावर नियंत्रण ठेवल्याने माणूस दीर्घायुषी होऊ शकतो हेच आपल्याही दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे ते म्हणाले. माझे जीवन लोकांसाठी समर्पित आहे. त्यामुळे मी कोणत्याही पुरस्काराला महत्त्वाचे मानत नाही. शिवाय, पुरस्कारासाठी मी काम करीत नाही. लोकांनी केलेला गौरव हा पुरस्कारापेक्षाही श्रेष्ठ आहे. आपले पुढील जीवनही मानवी कल्याणासाठी समर्पित राहील. 

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे बालपण अहमदपूर येथे  गेले. उर्दू माध्यमातून प्राथमिक शिक्षण, त्यानंतर वारद पाठशाळा येथे संस्कृतचे शिक्षण झाले. त्यांचे गुरु मडिवाळ शिवाचार्य यांनी त्यांना ‘तू कोणापुढेही हात पसरू नकोस, तुझे हात देण्यासाठी आहेत, मागण्यासाठी नाहीत, तू सर्वांना देणारा होशील’ असा आशिर्वाद दिला. गुरुंच्या या आशिर्वादामुळे महाराजांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. त्यांनी आजपर्यंत कुठलीही दक्षिणा, वस्तू, हार, सुवर्ण घेतले नाही. भक्तांकडून अपेक्षा केली नाही. मडिवाळ मठाची १६ पिढ्यांची परंपरा असल्याने त्यांनी गुरुंच्या संपर्कात पुराणशास्त्राचा अभ्यास केला. उर्दू, कन्नड, तेलगु, संस्कृत, पंजाबी, मराठी, पारशी अशा विविध भाषांचे ज्ञान त्यांनी अवगत केले. 

स्नातकोत्तर शिक्षण पंजाबमध्ये झाले. तिथे संघाच्या शाखेतून त्यांना शिस्त, आत्मनिर्भरता, चारित्र्यशील जीवन जगण्याचा मार्ग मिळाला.  राष्ट्रनिर्मितीचे धडे संघातच मिळाले. १९४५ ला लाहोर विद्यापीठातून वैद्यकीय पदवी त्यांनी मिळविली. पण वैद्यकीय व्यवसाय त्यांनी केला नाही. जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून त्यांनी लोककल्याणाच्या संप्रदायिक भक्तपरंपरेमध्ये स्वत:ला वाहून घेतले आहे.

प्रवचन, कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन...स्वातंत्र्यलढ्यातही त्यांनी सहभाग घेतला. १९४२ च्या चलेजाव आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. पण भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी स्वातंत्रसेनानी ही बिरुदावली लावून घेतली नाही. कारण त्यांच्यामध्ये मातीची सेवा केली असता पुत्राने तिच्याकडून काही घेणे हे गैर आहे. म्हणूनच त्यांनी स्वातंत्र्य सेनानींना मिळणाऱ्या सवलती नाकारल्या. बलशाली भारत निर्माण करण्यासाठी व्यसनमुक्तीचे कार्य हाती घेतले. प्रवचन, कीर्तनाच्या माध्यामतून प्रबोधन तसेच रक्तदान शिबीर, वृक्ष लागवड व संवर्धन करून माणसाच्या कार्यात देव असल्याची भावना निर्माण केली. 

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवकlaturलातूर