शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

ना शाळा, ना परीक्षा; तरीही साडेपाच लाख विद्यार्थी पास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST

जिल्ह्यात जि.प.च्या १ हजार २८४, माध्यमिक ५७० तर कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या २९८ आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा ...

जिल्ह्यात जि.प.च्या १ हजार २८४, माध्यमिक ५७० तर कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या २९८ आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. मध्यंतरी दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले होते; मात्र रुग्णसंख्या वाढत असल्याने सदरील वर्ग बंद करण्यात आले. सध्या अनलॉक होत असले तरी शाळा सुरु करण्याबाबत निर्णय झालेला नाही. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यातच दहावी आणि बारावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ५ लाख ५० हजार २३४ विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण होत असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.

वर्गनिहाय विद्यार्थी...

पहिली - ४६७७८

दुसरी - ४६७३३

तिसरी - ४६६२१

चौथी - ४७६९९

पाचवी - ४९२१५

सहावी - ४८४८८

सातवी - ४९६३७

आठवी - ४९२९३

नववी - ४८४६५

दहावी - ४७२९४

अकरावी - ३३५९३

बारावी - ३६४१८

जि.प.शाळा - १२८४

माध्यमिक शाळा - ५७०

कनिष्ठ महाविद्यालये - २९८

ऑनलाईन शिक्षण...

फायदे - कोरोनाच्या प्रादुर्भाव काळात विद्यार्थ्यांचे आराेग्यहित लक्षात घेता ऑनलाईन अभ्यासक्रम राबविण्यात आला.

घरच्या घरीच मुलांचा अभ्यास होत आहे. सोबतच शाळांच्या वतीने नियमित तासिकांचे नियोजन करण्यात येत आहे.

शाळेत गेल्यास अनेकांशी विद्यार्थ्यांचा संपर्क येऊ शकतो. त्यामुळे कोरोनाच्या काळात ऑनलाईनचा पर्याय चांगला वाटतो.

तोटे - जिल्ह्यात अनेक बालके मोबाईलची सुविधा नसल्याने ऑनलाईन अभ्यासापासून वंचित आहेत. त्यांच्यापर्यंत अद्यापही शिक्षण पोहोचले नाही.

अनेक गावात नेटवर्कचा अडथळा असल्याने ऑनलाईन अभ्यासात अडथळा येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालकांतून नाराजी आहे.

ऑनलाईन शिक्षणांत विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन होत नाही. त्यामुळे ऑफलाईन शिक्षणच बरे असा पालकांचा आग्रह आहे.

शहरे - शहरात ऑनलाईन अभ्यासक्रमाला गती मिळालेली आहे. विद्यार्थ्यांचा चांगला सहभाग आहे. शाळांच्या वतीनेही अभ्यासावर भर दिला जात आहे.

ऑनलाईनच्या माध्यमातून शंकाचे निरसन होत नसल्याची ओरड आहे. खासगी शाळांच्या वतीने विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करुन घेतली जात आहे.

कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे दिले जात आहेत.

खेडेगाव - कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे पहिली ते चौथी तसेच आठवीपर्यंतची मुले आर्थिक अडचणीमुळे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत.

गावात नेटवर्किंगचा अडथळा तसेच सोयी-सुविधा नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. शाळा सुरु होतील तेव्हाच मुले अभ्यास करायला लागतील अशी पालकांना आशा आहे.