शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

सीमावर्ती भागातून लातुरात नवीन बाजरीची आवक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 12:08 IST

बाजारगप्पा : खरिपातील बाजरीची लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत अल्प प्रमाणात आवक सुरू झाली आहे़

- हरी मोकाशे (लातूर)

खरिपातील बाजरीची लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत अल्प प्रमाणात आवक सुरू झाली आहे़ सर्वसाधारण दर १७०० रुपये मिळत आहे़ दरम्यान, खरेदीदारांकडून अडत्यांना वेळेवर पैसे मिळत नसल्याने शनिवारी अडत्यांनी सोयाबीनचा सौदा पुकारण्यावर बहिष्कार टाकला होता़ त्यामुळे एक दिवस सौदा निघू शकला नाही़ यंदाच्या पावसाळ्यातील अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेती उत्पादनात जवळपास ७० टक्क्यांनी घट झाली आहे़

परिणामी, आॅक्टोबरपासूनच लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक निम्म्याने होत आहे़ दरवर्षी डिसेंबरमध्ये होणाऱ्या आवकच्या तुलनेत सध्याची आवक ही निम्म्यापेक्षा कमी झाली आहे़ सध्या खरीप हंगामातील बाजरीची जिल्ह्याबरोबरच सीमावर्ती भागातून आवक सुरूझाली असून, त्यास कमाल दर १८०३, किमान दर १६०२ तर सर्वसाधारण भाव १७०० रुपये मिळत आहे़

गत आठवड्याच्या तुलनेत सध्या तुरीची आवक स्थिर असून ती ६६२ क्विं़ आहे़ कमाल दरात ३४ रुपयांनी वाढ झाली आहे़ मात्र, सर्वसाधारण दरात २१० रुपयांनी वाढ झाली आहे़ खरिपातील तुरीचा खराटा झाल्याने आगामी काळात आणखीन तुरीच्या दरात वाढ होईल, असे बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे़ त्याचबरोबर पिवळी रबी ज्वारीची आवक २५० क्विं़ होत असून, कमाल दर ४६७१ रुपयांपर्यंत पोहोचला आहे़ सर्वसाधारण भाव ४३०० रुपये मिळत असून किमान भाव ४ हजार रुपये राहिला आहे़ 

महिनाभरापासून सोयाबीनची आवक स्थिर राहण्याबरोबर दरही स्थिर आहे़ खरेदीदारांकडून अडत्यांना वेळेवर पैसे दिले जात नाहीत़ त्यामुळे आम्ही सोयाबीनच्या सौद्यात सहभागी होणार नाही, असा पावित्रा घेत खरेदीदारांनी शनिवारी सोयाबीनच्या सौद्यावर बहिष्कार टाकला होता़ त्यामुळे दिवसभर सौदा निघाला नाही़ अखेर अडते आणि खरेदीदारांत तडजोड होऊन सोमवारी सोयाबीनचा सौदा पूर्ववत झाला़ कमाल दर ३४४१ रुपये प्रतिक्विंटल मिळाला आहे़ गत आठवड्याच्या तुलनेत गव्हाची आवक निम्म्यावर आली असून २५३ क्विंटल होत आहे़ कमाल दरात ३०० रुपयांनी वाढ झाली असून सर्वसाधारण दर २५०० असा स्थिर राहिला आहे़

सध्या लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण शेतमालाची १८ हजार ८५६ क्विंटल होत आहे़ हायब्रीड ज्वारी- १३५०, रबी ज्वारी- २६००, पिवळी ज्वारी- ४३००, मका- १४५०, हरभरा- ४३२०, मूग- ५१००, करडई- ४१५०, तीळ- ११५००, गुळ- २६९०, धने- ४५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे़ 

नाफेडच्या खरेदी केंद्रावर केवळ २६९ शेतकऱ्यांचा ९८५१ क्विंटल मूग खरेदी झाला आहे़ तसेच उडिदासाठी २६८६ शेतकऱ्यांची नोंदणी असून, २३४ शेतकऱ्यांची ११४४ क्विंटल खरेदी झाली आहे़ सोयाबीन विक्रीसाठी ७७१५ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असली तरी प्रत्यक्षात १२ शेतकऱ्यांची ११३ क्विंटल खरेदी झाली आहे़ खुल्या बाजारात जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी तिकडे वळत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी