शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

सीमावर्ती भागातून लातुरात नवीन बाजरीची आवक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 12:08 IST

बाजारगप्पा : खरिपातील बाजरीची लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत अल्प प्रमाणात आवक सुरू झाली आहे़

- हरी मोकाशे (लातूर)

खरिपातील बाजरीची लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत अल्प प्रमाणात आवक सुरू झाली आहे़ सर्वसाधारण दर १७०० रुपये मिळत आहे़ दरम्यान, खरेदीदारांकडून अडत्यांना वेळेवर पैसे मिळत नसल्याने शनिवारी अडत्यांनी सोयाबीनचा सौदा पुकारण्यावर बहिष्कार टाकला होता़ त्यामुळे एक दिवस सौदा निघू शकला नाही़ यंदाच्या पावसाळ्यातील अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेती उत्पादनात जवळपास ७० टक्क्यांनी घट झाली आहे़

परिणामी, आॅक्टोबरपासूनच लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक निम्म्याने होत आहे़ दरवर्षी डिसेंबरमध्ये होणाऱ्या आवकच्या तुलनेत सध्याची आवक ही निम्म्यापेक्षा कमी झाली आहे़ सध्या खरीप हंगामातील बाजरीची जिल्ह्याबरोबरच सीमावर्ती भागातून आवक सुरूझाली असून, त्यास कमाल दर १८०३, किमान दर १६०२ तर सर्वसाधारण भाव १७०० रुपये मिळत आहे़

गत आठवड्याच्या तुलनेत सध्या तुरीची आवक स्थिर असून ती ६६२ क्विं़ आहे़ कमाल दरात ३४ रुपयांनी वाढ झाली आहे़ मात्र, सर्वसाधारण दरात २१० रुपयांनी वाढ झाली आहे़ खरिपातील तुरीचा खराटा झाल्याने आगामी काळात आणखीन तुरीच्या दरात वाढ होईल, असे बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे़ त्याचबरोबर पिवळी रबी ज्वारीची आवक २५० क्विं़ होत असून, कमाल दर ४६७१ रुपयांपर्यंत पोहोचला आहे़ सर्वसाधारण भाव ४३०० रुपये मिळत असून किमान भाव ४ हजार रुपये राहिला आहे़ 

महिनाभरापासून सोयाबीनची आवक स्थिर राहण्याबरोबर दरही स्थिर आहे़ खरेदीदारांकडून अडत्यांना वेळेवर पैसे दिले जात नाहीत़ त्यामुळे आम्ही सोयाबीनच्या सौद्यात सहभागी होणार नाही, असा पावित्रा घेत खरेदीदारांनी शनिवारी सोयाबीनच्या सौद्यावर बहिष्कार टाकला होता़ त्यामुळे दिवसभर सौदा निघाला नाही़ अखेर अडते आणि खरेदीदारांत तडजोड होऊन सोमवारी सोयाबीनचा सौदा पूर्ववत झाला़ कमाल दर ३४४१ रुपये प्रतिक्विंटल मिळाला आहे़ गत आठवड्याच्या तुलनेत गव्हाची आवक निम्म्यावर आली असून २५३ क्विंटल होत आहे़ कमाल दरात ३०० रुपयांनी वाढ झाली असून सर्वसाधारण दर २५०० असा स्थिर राहिला आहे़

सध्या लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण शेतमालाची १८ हजार ८५६ क्विंटल होत आहे़ हायब्रीड ज्वारी- १३५०, रबी ज्वारी- २६००, पिवळी ज्वारी- ४३००, मका- १४५०, हरभरा- ४३२०, मूग- ५१००, करडई- ४१५०, तीळ- ११५००, गुळ- २६९०, धने- ४५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे़ 

नाफेडच्या खरेदी केंद्रावर केवळ २६९ शेतकऱ्यांचा ९८५१ क्विंटल मूग खरेदी झाला आहे़ तसेच उडिदासाठी २६८६ शेतकऱ्यांची नोंदणी असून, २३४ शेतकऱ्यांची ११४४ क्विंटल खरेदी झाली आहे़ सोयाबीन विक्रीसाठी ७७१५ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असली तरी प्रत्यक्षात १२ शेतकऱ्यांची ११३ क्विंटल खरेदी झाली आहे़ खुल्या बाजारात जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी तिकडे वळत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी