शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सीमावर्ती भागातून लातुरात नवीन बाजरीची आवक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 12:08 IST

बाजारगप्पा : खरिपातील बाजरीची लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत अल्प प्रमाणात आवक सुरू झाली आहे़

- हरी मोकाशे (लातूर)

खरिपातील बाजरीची लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत अल्प प्रमाणात आवक सुरू झाली आहे़ सर्वसाधारण दर १७०० रुपये मिळत आहे़ दरम्यान, खरेदीदारांकडून अडत्यांना वेळेवर पैसे मिळत नसल्याने शनिवारी अडत्यांनी सोयाबीनचा सौदा पुकारण्यावर बहिष्कार टाकला होता़ त्यामुळे एक दिवस सौदा निघू शकला नाही़ यंदाच्या पावसाळ्यातील अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेती उत्पादनात जवळपास ७० टक्क्यांनी घट झाली आहे़

परिणामी, आॅक्टोबरपासूनच लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक निम्म्याने होत आहे़ दरवर्षी डिसेंबरमध्ये होणाऱ्या आवकच्या तुलनेत सध्याची आवक ही निम्म्यापेक्षा कमी झाली आहे़ सध्या खरीप हंगामातील बाजरीची जिल्ह्याबरोबरच सीमावर्ती भागातून आवक सुरूझाली असून, त्यास कमाल दर १८०३, किमान दर १६०२ तर सर्वसाधारण भाव १७०० रुपये मिळत आहे़

गत आठवड्याच्या तुलनेत सध्या तुरीची आवक स्थिर असून ती ६६२ क्विं़ आहे़ कमाल दरात ३४ रुपयांनी वाढ झाली आहे़ मात्र, सर्वसाधारण दरात २१० रुपयांनी वाढ झाली आहे़ खरिपातील तुरीचा खराटा झाल्याने आगामी काळात आणखीन तुरीच्या दरात वाढ होईल, असे बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे़ त्याचबरोबर पिवळी रबी ज्वारीची आवक २५० क्विं़ होत असून, कमाल दर ४६७१ रुपयांपर्यंत पोहोचला आहे़ सर्वसाधारण भाव ४३०० रुपये मिळत असून किमान भाव ४ हजार रुपये राहिला आहे़ 

महिनाभरापासून सोयाबीनची आवक स्थिर राहण्याबरोबर दरही स्थिर आहे़ खरेदीदारांकडून अडत्यांना वेळेवर पैसे दिले जात नाहीत़ त्यामुळे आम्ही सोयाबीनच्या सौद्यात सहभागी होणार नाही, असा पावित्रा घेत खरेदीदारांनी शनिवारी सोयाबीनच्या सौद्यावर बहिष्कार टाकला होता़ त्यामुळे दिवसभर सौदा निघाला नाही़ अखेर अडते आणि खरेदीदारांत तडजोड होऊन सोमवारी सोयाबीनचा सौदा पूर्ववत झाला़ कमाल दर ३४४१ रुपये प्रतिक्विंटल मिळाला आहे़ गत आठवड्याच्या तुलनेत गव्हाची आवक निम्म्यावर आली असून २५३ क्विंटल होत आहे़ कमाल दरात ३०० रुपयांनी वाढ झाली असून सर्वसाधारण दर २५०० असा स्थिर राहिला आहे़

सध्या लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण शेतमालाची १८ हजार ८५६ क्विंटल होत आहे़ हायब्रीड ज्वारी- १३५०, रबी ज्वारी- २६००, पिवळी ज्वारी- ४३००, मका- १४५०, हरभरा- ४३२०, मूग- ५१००, करडई- ४१५०, तीळ- ११५००, गुळ- २६९०, धने- ४५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे़ 

नाफेडच्या खरेदी केंद्रावर केवळ २६९ शेतकऱ्यांचा ९८५१ क्विंटल मूग खरेदी झाला आहे़ तसेच उडिदासाठी २६८६ शेतकऱ्यांची नोंदणी असून, २३४ शेतकऱ्यांची ११४४ क्विंटल खरेदी झाली आहे़ सोयाबीन विक्रीसाठी ७७१५ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असली तरी प्रत्यक्षात १२ शेतकऱ्यांची ११३ क्विंटल खरेदी झाली आहे़ खुल्या बाजारात जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी तिकडे वळत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी