शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

'ज्यांच्या हातून ४० आमदार निसटले, त्यांच्या हाती नेतृत्व दिल्याची चूक राष्ट्रवादीला उमगली'

By हणमंत गायकवाड | Updated: May 10, 2023 17:28 IST

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची लातुरात टीका

लातूर : महाराष्ट्र विकास आघाडीची वज्रमूठ सैल होत आहे. आघाडीचे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, त्यांना त्यांच्या पक्षाचे नेतृत्व करता आले नाही. त्यांच्या हातून ४० आमदार निसटले, अशा माणसाच्या हाती महाराष्ट्राचे नेतृत्व दिले ही चूक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या लक्षात आली आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. 

माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बावनकुळे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याअगोदरच आमदारांच्या पात्र-अपात्रतेबाबत जाहीर भाष्य केले जात आहे, ते न्यायालयाचा अवमान केल्यासारखे आहे. निकाल केव्हाही लागू शकतो, त्याअगोदर भाष्य करणे चुकीचे आहे. ज्यांनी भाष्य केले त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. आगामी काळामध्ये भाजप-शिवसेना (शिंदे गट) पुढच्या सर्व निवडणुका एकत्र लढणार आहे. केंद्र व राज्य शासनाने अनेक निर्णय घेतले आहेत. ते निर्णय शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपाचे घर चलो अभियान चालू आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात घर चलो अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून एक कोटी कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे. आपण स्वत: डिसेंबर २०२३ अखेर राज्यातील २८८ मतदारसंघात जाणार असल्याचे ते म्हणाले. 

पत्रपरिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. सुधाकर शृंगारे, माजी आ. गोविंद केंद्रे, गणेश हाके, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर आदींची उपस्थिती होती.

लोकसभेच्या ४८ अन् विधानसभेच्या २०० च्या वर जिंकूमहाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या दोनशेच्यावर जागा जिंकण्याचा आमचा निर्धार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय जाहीर करून राबविले आहेत. या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपने घर चलो अभियान सुरू केले आहे. त्यामुळे आम्हाला यश मिळेल, असेही बावनकुळे म्हणाले.

आगामी मंत्रिमंडळ विस्तारात लातूरला स्थानकृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पक्षावर लढल्या जात नाहीत, लातूर जिल्ह्यामध्ये कसलीही गटबाजी नाही. येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये लातूरला निश्चित स्थान मिळेल, असेही बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाlaturलातूर