शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

'ज्यांच्या हातून ४० आमदार निसटले, त्यांच्या हाती नेतृत्व दिल्याची चूक राष्ट्रवादीला उमगली'

By हणमंत गायकवाड | Updated: May 10, 2023 17:28 IST

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची लातुरात टीका

लातूर : महाराष्ट्र विकास आघाडीची वज्रमूठ सैल होत आहे. आघाडीचे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, त्यांना त्यांच्या पक्षाचे नेतृत्व करता आले नाही. त्यांच्या हातून ४० आमदार निसटले, अशा माणसाच्या हाती महाराष्ट्राचे नेतृत्व दिले ही चूक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या लक्षात आली आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. 

माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बावनकुळे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याअगोदरच आमदारांच्या पात्र-अपात्रतेबाबत जाहीर भाष्य केले जात आहे, ते न्यायालयाचा अवमान केल्यासारखे आहे. निकाल केव्हाही लागू शकतो, त्याअगोदर भाष्य करणे चुकीचे आहे. ज्यांनी भाष्य केले त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. आगामी काळामध्ये भाजप-शिवसेना (शिंदे गट) पुढच्या सर्व निवडणुका एकत्र लढणार आहे. केंद्र व राज्य शासनाने अनेक निर्णय घेतले आहेत. ते निर्णय शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपाचे घर चलो अभियान चालू आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात घर चलो अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून एक कोटी कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे. आपण स्वत: डिसेंबर २०२३ अखेर राज्यातील २८८ मतदारसंघात जाणार असल्याचे ते म्हणाले. 

पत्रपरिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. सुधाकर शृंगारे, माजी आ. गोविंद केंद्रे, गणेश हाके, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर आदींची उपस्थिती होती.

लोकसभेच्या ४८ अन् विधानसभेच्या २०० च्या वर जिंकूमहाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या दोनशेच्यावर जागा जिंकण्याचा आमचा निर्धार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय जाहीर करून राबविले आहेत. या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपने घर चलो अभियान सुरू केले आहे. त्यामुळे आम्हाला यश मिळेल, असेही बावनकुळे म्हणाले.

आगामी मंत्रिमंडळ विस्तारात लातूरला स्थानकृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पक्षावर लढल्या जात नाहीत, लातूर जिल्ह्यामध्ये कसलीही गटबाजी नाही. येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये लातूरला निश्चित स्थान मिळेल, असेही बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाlaturलातूर