मुक्तिसंग्राम दिनानिमित्त नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:21 IST2021-09-18T04:21:38+5:302021-09-18T04:21:38+5:30
यावेळी अशोक पाटील-निलंगेकर म्हणाले, येणाऱ्या नगरपरिषद पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका जिंकण्यासाठी आजपासूनच प्रारंभ केला पाहिजे. दिवंगत माजी मुख्यमंत्री ...

मुक्तिसंग्राम दिनानिमित्त नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले
यावेळी अशोक पाटील-निलंगेकर म्हणाले, येणाऱ्या नगरपरिषद पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका जिंकण्यासाठी आजपासूनच प्रारंभ केला पाहिजे. दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या विकासरूपी धोरणाचा विचार अंगीकृत करून सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करावे. पक्ष, संघटना मजबूत करण्यासाठी निलंगा, शिरूर, अनंतपाळ आणि देवणी तालुक्यात विविध कार्यकारिणी कमिटीचे पुनर्वसन करणार आहे. काँग्रेस पक्षाचे सर्वधर्मसमभावाचे विचार आणि पक्षाने केलेल्या विविध विकासकार्यांची जाणीव करून देण्याबाबत मार्गदर्शन केले. महाविकास आघाडीसंबंधी प्रांताध्यक्ष जे आदेश देतील, त्यांचे पालन करणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी उपस्थितांमध्ये जगन्नाथ पाटील, प्रा. दयानंद चोपणे, मोहम्मद खान पठाण, ॲड. जगदीश सूर्यवंशी, महेश चिकराळे, अमोल सोनकांबळे, विलास मुगळे, तानाजी आर्य, अशोक शेटकार, शेषराव कांबळे, ॲड. विक्रांत सूर्यवंशी, देवीदास जाधव, सुग्रीव कांबळे, गोविंद सूर्यवंशी, ओम शिंदे, रोहन सुरवसे, अंजुम शेख, नागनाथ घोलप, भवानी नाईकवाडे, प्रकाश गायकवाड, विठ्ठल बारतोंडे, नवनाथ कुदुंबळे, सोनाजी कदम, प्रकाश पाटील बकलीकर, लक्ष्मण बोधले, सुधीर लखनगावे, तानाजी निडवांचे, जागले, गंगाधर चव्हाण, बर्गे, बालाजी कांबळे, तुषार सोमवंशी, अजित नाईकवाडे, अमित नितनवरे, चांद कुरेशी उपस्थित हाेते.