शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

मनसेचे चाकूरमध्ये हल्लाबोल आंदोलन ! आंदोलकांनी मुख्याधिकाऱ्यांनासोबत घेत समस्यांचा पंचनामा करून घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 19:13 IST

MNS's Hallabol agitation शहरातील रस्त्याचे निकृष्ट काम, दुषित पाणी पुरवठा, तुंबलेल्या गटारी अशा समस्या आंदोलकांनी आक्रमकतेने मांडल्या.

ठळक मुद्देशहरातील समस्यांबाबत मनसेचे हल्लाबोल आंदोलन दुषित पाणी, निकृष्ट रस्त्याचा मुख्याध्याकाऱ्यांनी केला पंचनामा 

चाकूर : शहरातील तुंबलेल्या गटारी, दूषित पाणी पुरवठा, रस्त्यावरील पेव्हरब्लॉकचे निकृष्ट काम या विरोधात मंगळवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीवर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. प्रभारी मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांना जाब विचारत आंदोलकांनी त्यांना समस्यांचा स्पॉट पंचनामा करण्यास भाग पाडले. यावेळी शहरातील अनेक समस्या त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.

शहरातील रस्त्याचे निकृष्ट काम, दुषित पाणी पुरवठा, तुंबलेल्या गटारी अशा समस्या आंदोलकांनी आक्रमकतेने मांडल्या. आंदोलकांनी प्रभारी मुख्याधिकाऱ्यांसोबत घेऊन समस्यांचा पंचनामा करण्यास भाग पाडले. शहरातील पेट्रोलपंपाजवळ पाईपलाईनमधून पाण्याचे फवारे उडतात. तिथेच गटाराचे पाणी तुंबलेले आहे. याच दुषित पाण्याचा शहराला पुरवठा होतो. याचा प्रभारी मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांच्याकडून प्रथम स्पॉट पंचनामा करून घेण्यात आला. त्यानंतर रस्त्यावरील पेव्हारब्लॉकच्या कामाचा निकृष्ट दर्जा मुख्याधिकारी शिंदे यांना दाखवून पंचनामा करण्यात आला. तसेच पिण्याच्या पाण्याच्या मुख्य टाकीवर जाऊन तेथील अस्वछतेचा देखील मुख्याधिकाऱ्यांनी पंचनामा केला. निकृष्ट कामे करणाऱ्या सबंधित सर्वांवर कारवाईची हमी दिल्यानंतर मनसेने हल्लाबोल आंदोलन थांबवले. आंदोलनात शहराध्यक्ष अजय धनेश्वर, कृषि तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे, अजित घंटेवाड, अॅड ओंकार शेटे, महिला तालुकाध्यक्षा सरस्वती नवरखेले, राम कसबे, दत्ता सूर्यवंशी, तुळशीदास माने, विठ्ठल प्रसाद झांबरे, गणेश चौहान,कृष्णा गिरी,सुरज लोंढे आदींचा सहभाग होता.

कर कशासाठी भरायचानगरपंचायतीला पाच वर्षात तीन मुख्याधिकारी लाभले. परंतु, एकही मुख्यालयी राहत नसल्याने त्यांना समस्यांची जाण नाही. मुख्याधिकाऱ्यांनी प्रथम मुख्यालयी राहवे, दर्जेदार रस्ते, निर्जंतुक पाणी व गटारांची स्वच्छता हे प्राधान्याने करावे. सर्व नागरिकांचा तो हक्क आहे. कर भरूनही निकृष्ट रस्ते, तुंबलेल्या गटारी व दूषित पाणी मिळत असेल तर नगरपंचायतचे कार्य काय ?असा सवाल जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी केला. यानंतरही प्रश्न मार्गी लागला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :MNSमनसेlaturलातूर