शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
5
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
6
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
7
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
9
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
10
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
11
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
12
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
13
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
14
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
15
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
16
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
17
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
18
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
19
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
20
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 

कृषीपंपाच्या वीजतोडणी विरोधात मनसे आक्रमक; तहसील कचेरीत केले ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 17:20 IST

तालुक्यातील २६ गावातील महावितरणने कोणतीही नोटीस न देता कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला आहे.

ठळक मुद्देमहावितरण व कृषी अधिकाऱ्यांना विचारला जाब

चाकूर : तालुक्यातील २६ गावातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे विद्युत पुरवठा खंडीत केला.वीजपुरवठा खंडीत करण्यापूर्वी कोणतीही रितसर नोटीस संबंधीत शेतकऱ्यांना दिली नाही. या प्रश्नी तहसील कार्यालयात गुरुवारी ठिय्या आंदोलन केले.

मनसेने शेतकऱ्यांची विजतोडणी व पीकविमा वाटप यावर जाब विचारण्यासाठी महावितरण अभियंता आणि कृषी अधिकारी यांना तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांच्यासमोर तहसील कार्यालयात बोलाविले होते. मनसे जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील २६ गावातील महावितरणने कोणतीही नोटीस न देता कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला आहे. नियमाने वीज तोडणी करण्याअगोदर पंधरा दिवस अगोदर संबंधित शेतकरी व वीज ग्राहकास नोटीस देणे हे बंधनकारक आहे. परंतु, महावितरणने कायदा मोडून महादादागिरी करत गावची गावे अंधारात ढकलत आहेत.असे डॉ.भिकाणे यांनी सांगितले.त्यामुळे चोरीच्या प्रमाण वाढ झालेली आहे.

यावर्षी रब्बीची पिके जोरात असताना विजतोडणी झाल्यामुळे पाणी कमी पडून पिके कोलमडते आहेत.त्यातच अनेक गावात ट्रान्सफॉर्मर जाळले आहे.ती सुद्धा ४८ तासाच्या आत देणे बंधनकारक असताना महावितरण वेळेवर देत नाही.तसेच अनेक ठिकाणी विद्युत तारा, ट्रान्सफॉर्मर, धोकादायकरित्या जमिनीवर व उघडे पडलेली आहेत. तिथे महावितरण साधे मेंटेनन्स करत नाही. यामुळे शेतकऱ्यांचा जीव जात आहे.ऊसाची शेते जळत आहेत.तसेच पीकविमा का जाहीर झाला नाही याचा ही जाब कृषि अधिकाऱ्यांना व विमाकंपनी अधिकाऱ्याला मनसेने विचारत तो लवकरात लवकर जाहीर नाही झाला तर अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा डॉ.भिकाणे यांनी यावेळी दिला. तहसीलदार डॉ शिवानंद बिडवे यांनी मध्यस्ती केली. त्यानंतर मनसेने ठिय्या आंदोलन थांबवले. 

जर महावितरणने परत विजतोडणी केली. तर त्यानंतर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून गावभर धिंड काढू असा सज्जड इशारा जिल्हाध्यक्ष डॉ.भिकाणे यांनी अभियंत्याला दिला. महावितरण यानंतर सूडबुद्धीने नाही तर सद्बुद्धीने वागावे असा सल्ला दिला. तसेच कालावधी उलटून गेला तरी पीकविमा का वाटप न होण्याचे कारण पीकविमा कंपनीचे खोटे पंचनामे असून कंपनीने शासनाने केलेले पंचनामे गृहीत धरून त्वरित पीकविमा वाटप करावे अशी मागणी केली. यावेळी कृषी तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे, तुळशीदास माने, मारोती पाटील, बाळू बाचपल्ले, धोंडीराम भंडारे, दगडू शेवाळे, बालाजी तोटावळे, जगन्नाथ चाटे, विलास शेवाळे, शंकर पाटील, नंदू सुडे, कृष्णा बेंबडे, हनुमंत तत्तापूरे, माधव कोबडे, विष्णू बोबडे आदी उपस्थित होते. ज्या गावात ट्रान्सफॉर्मरची गरज आहे.तेथे लवकर ट्रान्सफॉर्मर देण्यात येईल. वीजेची जास्तीची आलेली बिले कमी करून दिले जातील. शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील असे उपविभागीय अभियंता अभिजित अडगुबे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :MNSमनसेlaturलातूरagricultureशेती