शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

कृषीपंपाच्या वीजतोडणी विरोधात मनसे आक्रमक; तहसील कचेरीत केले ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 17:20 IST

तालुक्यातील २६ गावातील महावितरणने कोणतीही नोटीस न देता कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला आहे.

ठळक मुद्देमहावितरण व कृषी अधिकाऱ्यांना विचारला जाब

चाकूर : तालुक्यातील २६ गावातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे विद्युत पुरवठा खंडीत केला.वीजपुरवठा खंडीत करण्यापूर्वी कोणतीही रितसर नोटीस संबंधीत शेतकऱ्यांना दिली नाही. या प्रश्नी तहसील कार्यालयात गुरुवारी ठिय्या आंदोलन केले.

मनसेने शेतकऱ्यांची विजतोडणी व पीकविमा वाटप यावर जाब विचारण्यासाठी महावितरण अभियंता आणि कृषी अधिकारी यांना तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांच्यासमोर तहसील कार्यालयात बोलाविले होते. मनसे जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील २६ गावातील महावितरणने कोणतीही नोटीस न देता कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला आहे. नियमाने वीज तोडणी करण्याअगोदर पंधरा दिवस अगोदर संबंधित शेतकरी व वीज ग्राहकास नोटीस देणे हे बंधनकारक आहे. परंतु, महावितरणने कायदा मोडून महादादागिरी करत गावची गावे अंधारात ढकलत आहेत.असे डॉ.भिकाणे यांनी सांगितले.त्यामुळे चोरीच्या प्रमाण वाढ झालेली आहे.

यावर्षी रब्बीची पिके जोरात असताना विजतोडणी झाल्यामुळे पाणी कमी पडून पिके कोलमडते आहेत.त्यातच अनेक गावात ट्रान्सफॉर्मर जाळले आहे.ती सुद्धा ४८ तासाच्या आत देणे बंधनकारक असताना महावितरण वेळेवर देत नाही.तसेच अनेक ठिकाणी विद्युत तारा, ट्रान्सफॉर्मर, धोकादायकरित्या जमिनीवर व उघडे पडलेली आहेत. तिथे महावितरण साधे मेंटेनन्स करत नाही. यामुळे शेतकऱ्यांचा जीव जात आहे.ऊसाची शेते जळत आहेत.तसेच पीकविमा का जाहीर झाला नाही याचा ही जाब कृषि अधिकाऱ्यांना व विमाकंपनी अधिकाऱ्याला मनसेने विचारत तो लवकरात लवकर जाहीर नाही झाला तर अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा डॉ.भिकाणे यांनी यावेळी दिला. तहसीलदार डॉ शिवानंद बिडवे यांनी मध्यस्ती केली. त्यानंतर मनसेने ठिय्या आंदोलन थांबवले. 

जर महावितरणने परत विजतोडणी केली. तर त्यानंतर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून गावभर धिंड काढू असा सज्जड इशारा जिल्हाध्यक्ष डॉ.भिकाणे यांनी अभियंत्याला दिला. महावितरण यानंतर सूडबुद्धीने नाही तर सद्बुद्धीने वागावे असा सल्ला दिला. तसेच कालावधी उलटून गेला तरी पीकविमा का वाटप न होण्याचे कारण पीकविमा कंपनीचे खोटे पंचनामे असून कंपनीने शासनाने केलेले पंचनामे गृहीत धरून त्वरित पीकविमा वाटप करावे अशी मागणी केली. यावेळी कृषी तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे, तुळशीदास माने, मारोती पाटील, बाळू बाचपल्ले, धोंडीराम भंडारे, दगडू शेवाळे, बालाजी तोटावळे, जगन्नाथ चाटे, विलास शेवाळे, शंकर पाटील, नंदू सुडे, कृष्णा बेंबडे, हनुमंत तत्तापूरे, माधव कोबडे, विष्णू बोबडे आदी उपस्थित होते. ज्या गावात ट्रान्सफॉर्मरची गरज आहे.तेथे लवकर ट्रान्सफॉर्मर देण्यात येईल. वीजेची जास्तीची आलेली बिले कमी करून दिले जातील. शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील असे उपविभागीय अभियंता अभिजित अडगुबे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :MNSमनसेlaturलातूरagricultureशेती