शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मांजरा प्रकल्प: अवकाळीमुळे पाच दलघमी पाण्याची बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 20:22 IST

तीन दिवस अगोदर रोटेशन थांबविले.

लातूर :लातूर शहरासह जिल्ह्यात तीन-चार दिवसांपासून अवकाळी पावसामुळे फळबागांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले असले तरी मांजरा प्रकल्पातील पाच दलघमी पाण्याची बचत झाली आहे. प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी थांबविले आहे. यामुळे उजव्या कालव्यातील अडीच दलघमी आणि डाव्या कालव्यातील अडीच दलघमी असे मिळून पाच दलघमी पाण्याची बचत झाली आहे.

मांजरा प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून ११ एप्रिल पासून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले होते. मात्र मध्येच २० एप्रिल नंतर प्रकल्प आणि पाणलोट क्षेत्रात अवकाळी पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांकडून मागणी बंद झाली आहे. त्यामुळे पाटबंधारे प्रशासनाने कालव्यातून सोडलेली पाणी बंद केले आहे. रोटेशन संपण्यापूर्वी तीन दिवस अगोदर कॅनॉल मधून सोडण्यात येणारे पाणी बंद झाल्यामुळे पाच दलघमी पाण्याची बचत झाली आहे. आता शेवटची पाळी ११ ते ३० मे दरम्यान नियोजित आहे. तोपर्यंत उजव्या-डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाणार नाही. उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी सोडण्यात येणारे रोटेशन हे शेवटचे असणार आहे.

उन्हाळी हंगामात साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली.....

मांजरा प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून एकूण साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र उन्हाळी हंगामात भिजवले जाते. त्यात उजव्या कालव्याअंतर्गत ३ हजार हेक्टर तर डाव्या कालव्या अंतर्गत साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. कालव्यात पाणी सोडल्यामुळे विहिरी व नदीलाही पाणी वाढते. यामुळेही सिंचन क्षेत्रात वाढ होते. डाव्या आणि उजव्या कालव्यातून उन्हाळी हंगामात पाणी सोडल्यामुळे दहा ते बारा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते, अशी माहिती प्रकल्पावरील अधिकारी सुरज निकम यांनी दिली.

मांजरा प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ नाही....मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस मांजरा प्रकल्प क्षेत्रात झाला असला तरी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. उन्हाळ्यात कितीही अवकाळी पाऊस मोठा झाला तरी मोठ्या प्रकल्पात पाण्याची वाढ होऊ शकत नाही, असा आज वरचा अनुभव आहे. फायदा एवढाच उजव्या आणि डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी बंद करावे लागले. त्यामुळे पाच दलघमी पाण्याची बचत झाली.

प्रकल्पात ४४.४५ टक्के पाणीसाठा...

मांजरा प्रकल्पात सद्यस्थितीत ४४.४५ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. सध्या धरणात १२५.७८७ दलघमी एकूण पाणीसाठा आहे. त्यापैकी ७८.६५७ जिवंत पाणीसाठा आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी नियोजन आहे. त्यानुसार शेवटचे रोटेशन ११ ते ३० मे दरम्यान असेल.

टॅग्स :laturलातूर