शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

महा- ई- सेवा केंद्र, आपले सरकारचे सर्व्हर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 18:39 IST

पीकविमा भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहेत़ दरम्यान, महा- ई- सेवा केंद्र आणि आपले सरकारचे दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन झाल्याने शेतकऱ्यांना पीकविमा भरता येईनासा झाला आहे

- बालाजी कटकेरेणापूर (लातूर ) : पीकविमा भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहेत़ दरम्यान, महा- ई- सेवा केंद्र आणि आपले सरकारचे दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन झाल्याने शेतकऱ्यांना पीकविमा भरता येईनासा झाला आहे तर शहरातील दोन राष्ट्रीयकृत बँका बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा पीकविमा भरुन घेण्यास नकार देत आहेत़ त्यामुळे अनेक बिगर कर्जदार शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे़

रेणापूर शहरात महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक आॅफ इंडिया, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकांसह लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे़ यातील महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि बँक आॅफ इंडिया या दोन बँका वगळता अन्य दोन्ही राष्ट्रीयकृत बँकांकडून बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा पीकविमा भरुन घेत नाहीत़ याउलट महा- ई- सेवा केंद्र आणि आपले सरकारवर आॅनलाईन पीकविमा भरा, असा सल्ला देत आहेत़ आमच्याकडे पुरेसी यंत्रणा नसल्याचे सांगून हात वर करीत आहेत़

त्यातच महा-ई- सेवा केंद्र आणि आपले सरकारचे दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन झाले आहे़ त्यामुळे बिगर कर्जदार शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे़ पीकविमा भरण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक असल्याने पीकविमा कुठे भरावा, असा सवाल बिगर कर्जदार शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे़ त्यामुळे शासनाने पीकविम्यासाठी मुदतवाढ द्यावी तसेच सर्व बँकांनी विमा भरुन घ्यावा, अशी मागणी होत आहे़

सोसायटीचे दीड हजार थकबाकीदाऱ़़रेणापूर सेवा सहकारी सोसायटीचे १ हजार ५०० शेतकरी थकबाकीदार आहेत़ मात्र या सोसायटीची दत्तक बँक थकबाकीदार शेतकऱ्यांचा पीकविमा भरुन घेत नाही़ या शेतकऱ्यांनी आॅनलाईन पीकविमा भरावा, असा सल्ला देत आहे़ सोसायटीचे सभासद असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्यासाठी सोसायटी प्रशासनाकडून कोणतेही व्यवस्था करण्यात आली नसल्याने हे दीड हजार शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत़

सोसायटीस परवडणारे नाही़सोसायटीचे चेअरमन देविदास कातळे म्हणाले, या शेतकऱ्यांनी पीकविमा भरावा, यासाठी सोसायटीने व्यवस्था करणे अवघड आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी आॅनलाईन पीकविमा भरावा, असे म्हणाले़

पुरेशा यंत्रणेचा अभावस्टेट बँक आॅफ इंडियाचे शाखाधिकारी दिनेश मोहरिया म्हणाले, बँकेकडे मनुष्यबळाची पुरेशी यंत्रणा नाही़ त्यामुळे बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा पीकविमा घेतला जात नाही़ यंत्रणा उपलब्ध झाल्यानंतर पीकविमा घेतला जाईल, असे सांगितले़ दररोजचे व्यवहार तसेच पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे व कर्जदारांची संख्या जास्त असल्याने बिगर कर्जदारांचा पीकविमा घेतला जात नाही़ त्यांचाही पीकविमा लवकरच भरुन घेतला जाईल, असे सेंट्रल बँकेचे मुख्य प्रबंधक उल्हास शिवदेव यांनी सांगितले़

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाdigitalडिजिटलFarmerशेतकरी