शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
5
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
6
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
7
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
8
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
9
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
10
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
11
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
12
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
13
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
14
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
15
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
16
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
17
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
18
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
19
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
20
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!

लम्पीने दावणीचे पशुधन दगावले; चौकशी झाली पण मदतच नाही!

By हरी मोकाशे | Updated: May 24, 2023 17:22 IST

लातूर जिल्ह्यात ९ महिन्यांच्या कालावधीत ६ हजार ५८१ पशुधनास लम्पीचर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला.

लातूर : जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी आतापर्यंत एकूण ५७१ जनावरे दगावली आहेत. या पशुधनाच्या नुकसानीपोटी शासनाने मार्चअखेरपर्यंत जवळपास ४१३ पशुधनाच्या ३६६ पालकांना मदत दिली आहे. त्यानंतर मात्र, नुकसानभरपाई देण्यासंदर्भात शासनाकडून कुठलेही आदेश आले नाहीत. परिणामी, जिल्ह्यातील १५८ पशूपालक हतबल झाले आहेत. शासन मदतीचा आदेश कधी काढणार असा सवाल व्यक्त होत आहे.

शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी पशूपालनाकडे वळावे म्हणून शासन व प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. अनुदानावर दुधाळ जनावरांचे वाटपही करण्यात येत आहे. त्यामुळे पशुपालकांची संख्या वाढत असल्याचे काही प्रमाणात दिसून येते. जिल्ह्यात गत ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. राजस्थानहून आलेल्या एका पशुधनामुळे जिल्ह्यात लम्पीचा संसर्ग सुरु झाला. हा रोग प्रामुख्याने गाय आणि बैलांमध्ये दिसून येत आहे. लम्पीचा संसर्ग वाढू नये म्हणून पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषदेच्या वतीने लसीकरणावर भर देण्यात आला. तसेच जनावरांचे बाजार, शर्यती, प्रदर्शने, वाहतुकीवर बंदी, कीटकनाशक फवारण मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून येत आहे.

३० हजारांपर्यंत आर्थिक मदत...लम्पीच्या प्रादुर्भावामुळे पशुधन दगावल्यास त्या पशुपालकास शासनाकडून मदत निश्चित करण्यात आली. गाय अथवा म्हशीस ३० हजार, बैलास २५ हजार तर वासरास १६ हजारांची नुकसान भरपाई देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

६ हजार ५८१ जनावरांना प्रादुर्भाव...जिल्ह्यात गाय वर्गीय पशुधन २ लाख ५५ हजार तर म्हैस वर्गीय पशुधन २ लाख ५७ हजार आहे. जिल्ह्यात ९ महिन्यांच्या कालावधीत ६ हजार ५८१ पशुधनास लम्पीचर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला. उपचारानंतर ६ हजार १० पशुधन चांगले झाले. मात्र, ५७१ पशुधन दगावले आहेत.

७६ लाखांची मिळाली मदत...जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७१ पशुधन दगावले आहेत. मार्चअखेरपर्यंत जवळपास ४१३ पशुधनाच्या नुकसानीपोटी ३६६ पशुपालकांना ७६ लाख २६ हजार रुपयांची मदत शासनामार्फत देण्यात आली आहे.

ना आदेश, ना मदत...मार्च अखेरपर्यंत मृत्यमुखी पडलेल्या पशुधनास मदत देण्यात आली. एप्रिल ते २३ मे या कालावधीत जवळपास १५८ पशुधन दगावले आहेत. त्यांच्या नोंदी पशुसंवर्धन, जिल्हा पशु सर्वचिकित्सालय कार्यालयाकडे करण्यात आल्या. मात्र, शासनाकडून मदतीसंदर्भात कुठलेही आदेश अन् निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे हे पशुपालक हतबल झाले आहेत.

शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा...लम्पीमुळे ५७१ पशुधन दगावले असून ३६६ पशुपालकांना ७६ लाख २६ हजारांची मदत देण्यात आली आहे. एप्रिलपासून मयत पशुधनाच्या मदतीसंदर्भात राज्य शासनाकडून अद्याप आदेश प्राप्त झाले नाहीत. शासनाच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.- डॉ. सूर्यकांत नागरगोजे, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन.

टॅग्स :laturलातूर