शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

लिंबोटीचे पाणी अहमदपूरसाठी ठरतेय मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:17 IST

अहमदपूर : लिंबोटी प्रकल्पातून अहमदपूर शहराला जलवाहिनीद्वारे १४ किमी पाणी येण्यासाठी तब्बल १२ दिवसांचा कालावधी लागला आहे. त्यामुळे लिंबोटीचे ...

अहमदपूर : लिंबोटी प्रकल्पातून अहमदपूर शहराला जलवाहिनीद्वारे १४ किमी पाणी येण्यासाठी तब्बल १२ दिवसांचा कालावधी लागला आहे. त्यामुळे लिंबोटीचे पाणी अजूनही अहमदपूरकरांना मृगजळ ठरत आहे. तांत्रिक अडचणींमुळे ही स्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे.

लिंबोटी प्रकल्पावरून अहमदपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे विद्युत पंप ५ जानेवारी रोजी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यान्वित करण्यात आले होते. हे पाणी येण्यासाठी १० तासांचा कालावधी लागणार असल्याचे अभियंत्यांनी सांगितले होते. शहरातील फिल्टर प्लान्टमध्ये जेव्हा पाणी येईल, तेव्हापासून शहराच्या प्रत्येक भागात दहा दिवसाला पाणी येणार, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले होते; मात्र शहरात अजूनही पाणीच आले नसल्यामुळे लिंबोटीचे पाणी शहरवासीयांसाठी मृगजळ ठरत आहे.

लिंबोटीच्या जलवाहिनीच्या कामात अनेक त्रुटी आढळून येत आहेत, तसेच अनेक ठिकाणी गळती होत आहे. त्यातील सर्वात मोठी गळती वरवटी व सिंदगी या गावादरम्यान असून, त्याठिकाणी गळती थांबविण्याचे काम करण्यात येत आहे, तसेच बसविण्यात आलेल्या एअर वॉलसुद्धा तांत्रिकदृष्ट्या निकामी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अधिक दाबाने पाणी फिल्टर प्लाॅन्टकडे येत नाही. सदर पाणी गुगदळ एमआयडीसीजवळ आले असून, त्यापुढे चढ भाग असल्यामुळे पाणी वर चढत नाही. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने सर्व गळती थांबविल्याशिवाय पाणी पुढे चालणार नसल्याचे सांगितले, तसेच चालू असलेला एक पंप ३०० एचपीचा असून, १६८ मीटर उंचीपर्यंत पाणी बाहेर टाकण्याची क्षमता आहे. हा पंप पूर्णपणे कार्यान्वित केल्यानंतर पाणी पुढे येणार असून, तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास मध्येच जलवाहिनी फुटू शकते. सध्या कमी दाबाने मोटार चालविली जात आहे. त्यामुळे पाणी वर चढत नाही. शहरात अजून पाणी आले नाही. सदर कामात मोठ्या प्रमाणावर तांत्रिक दोष असून ते काढण्यासाठी तांत्रिक सल्लागार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंते काम करीत आहेत. परिणामी, अहमदपूरकरांना लवकरात लवकर पाणी मिळण्याच्या आशेवरही पाणी फिरले आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

तांत्रिक अडचणींमुळे विलंब...

१९ किमीच्या पाणी पुरवठा जलवाहिनीमध्ये दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गळती असून, अनेक एअरवॉल सध्या काम करीत नाहीत. त्रुटी काढल्यानंतर आणखीन चार दिवसांनी पूर्ण दाबाने शहरात पाणी येईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता विकास बडे यांनी सांगितले.

याबाबत तांत्रिक मार्गदर्शक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच नगर परिषदेचे अभियंते हे परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, येत्या काही दिवसांत पूर्ण क्षमतेने पंप चालू होऊन शहरात पाणी येईल, असे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले.