शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

Latur: बसच्या धडकेत भाजी विक्रेता शेतकरी जागीच ठार, औसा टी-पाँईटवर अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 18:08 IST

औसा टी-पाँईंटवर सर्व्हिस रोड नसल्याने दररोज अपघात होत आहेत.

- संदीप शिंदे

औसा ( लातूर) : शहरातील टी-पाँईटवर गुरुवारी सकाळी ६.४० वाजता बसस्थानकाकडे वळण घेत असलेल्या एसटी बसला भरधाव वेगातील ट्रकने जोराची धडक दिली. यात एसटी बस रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजी विक्रेता शेतकऱ्याच्या अंगावर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तुकाराम बाजीराव जाधव (वय ५५ रा. करजगाव, ता. औसा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

लातूरहून मेढा (जि. सातारा) आगाराची बस (एमएच १४ एल.एक्स. ५७३४) ही साताऱ्याकडे निघाली होती. गुरुवारी सकाळी ६.४० वाजता बस औसा टी-पाँईंटवर आली असता गावातील बसस्थानकाकडे वळाली. यावेळी तुळजापूर मोडवरुन भरधाव येणाऱ्या ट्रकने बसच्या मागील बाजूला जोराची धडक दिली. यात एसटी बस रस्त्याच्या कडेला भाजीविक्रीसाठी बसलेले शेतकरी तुकाराम जाधव यांच्या अंगावर गेली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डाॅक्टरांनी मयत घोषित केले. औसा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाल्याने त्याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

बसमधील प्रवासी सुखरूप...दररोज सकाळी ६ वाजता लातूरहून औसामार्गे सातारा येथे बस जाते. गुरुवारी अपघात झालेल्या बसमध्ये १३ प्रवासी होते. बसचा वेग कमी असल्याने सर्व प्रवासी सुखरूप आहेत. त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करुन दिल्याचे औशाचे आगारप्रमुख शंकर स्वामी यांनी सांगितले.

उड्डाणपूलाचा विरोध ठरतोय जीवघेणा...रत्नागिरी-नागपूर आणि लातूर-उमरगा या दोन महामार्गावर येणाऱ्या औसा टी-पाँईंटवर नियोजित उड्डाणपूल होता. मात्र, काही लोकांनी त्यास विरोध केल्याने उड्डाणपूल वगळून महामार्गाचे काम पुर्ण झाले. औसा टी-पाँईंटवर सर्व्हिस रोड नसल्याने दररोज अपघात होत आहेत. आतापर्यंत ४० पेक्षा जास्त अपघात झाले असून, यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर