शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
2
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
3
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
4
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
5
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
8
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
9
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
10
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
11
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
12
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
13
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
14
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
15
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
16
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
17
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
18
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
19
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
20
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप

लातूरमध्ये आरटीओची २० दिवसात ३३४ वाहनांवर कारवाई; २१ लाखांचा दंड केला वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 19:16 IST

अवैद्य प्रवासी वाहतूक, ओव्हरलोड रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने जुलैच्या पहिल्या दिवसापासूनच कारवाई मोहिम हाती घेतली़ आहे.

ठळक मुद्दे २० दिवसात जिल्हाभरात भरारी पथकाच्या माध्यमातून ३३४ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली यातून तब्बल २१ लाख ३४ हजार २१८ रूपये दंडही वसूल करण्यात आला आहे़

- आशपाक पठाण

लातूर :  अवैद्य प्रवासी वाहतूक, ओव्हरलोड रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने जुलैच्या पहिल्या दिवसापासूनच कारवाई मोहिम हाती घेतली़ त्यानुसार २० दिवसात जिल्हाभरात भरारी पथकाच्या माध्यमातून ३३४ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, तब्बल २१ लाख ३४ हजार २१८ रूपये दंडही वसूल करण्यात आला आहे़ दरम्यान, दंडात्मक कारवाई करणाऱ्या पथकाने दुचाकीच्या बुलेट फटाका (आवाज) याकडेही लक्ष देण्याची गरज आहे़ 

नविन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर आरटीओच्या पथकाने पहिल्यांदाच स्कूलबस कडेही विशेष लक्ष घातले़ क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी, स्कूलबसचा परवाना नसणे, शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार निर्मिती, यासह कागदपत्रांची तपासणी करून दोषी आढळलेल्या तब्बल ४२ स्कूलबसेसवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ३ लाख ४१ हजार ४१८ रूपये दंड वसूल करण्यात आला़ याशिवाय, अवैद्य प्रवासी वाहतूक करणारी वाहने भरारी पथकाच्या रडारवर  होती़ लातूर, अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर या मार्गांवर गेल्या अनेक दिवसांपासून अवैद्य प्रवासी वाहतूक बोकाळली आहे़ क्षमतपेक्षा अधिक प्रवासी घेवून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, ७९ वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली़ त्यांच्याकडून १ लाख ६५० रूपये दंडही वसूल झाला़ याचबरोबर यातील काही वाहनांचे दहा दिवसांसाठी निलंबनही करण्यात आले होते़ 

जुलै महिन्यात  प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाने वाहन तपासणीची मोहिम राबविली़ या मोहिमेत दोषी आढळलेल्या ३३४ वाहनांवर कारवाई झाली़ यात लाखोंचा दंड वसूल झाला असला तरी सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक त्रासदायक ठरणारी वाहने मात्र अद्यापही मोकाट आहेत़ गेल्या काही वर्षांपासून लातूर शहरात दुचाकीचे प्रमाण चांगलेच वाढत आहे़ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह तरूणांमध्ये दुचाकीच्या कर्णकर्कश हॉर्नची क्रेझ वाढत  चाललेली आहे़  सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी अनेकदा दुचाकीच्या फटाक्यांचे आवाज धोकादायक ठरत आहेत़  

सायलेन्सर आणि बल्बचा वाढला धोकाबाजारात नव्याने आलेल्या अनेक नामांकित कंपन्यांच्या दुचाकीची क्रेज तरूणांमध्ये वाढत आहे़ गल्ली बोळातही बुलेटचे फटाके फुटत असल्याने याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे़ अशा वाहनांवर ना वाहतूक शाखा कारवाई ते ना आरटीओचे पथक़ दुचाकीत वाहने रूबाबदार असल्याने बहुतांश वेळा याकडे जाणीवपूर्वक डोळझाक केली जाते़ रात्रीच्या वेळी हॅलोजन बल्बमुळे अनेक वाहन धारकांना त्रास होत आहे़ याकडेही मोहिम वळविल्यास सामान्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे़

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसlaturलातूर