शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

लातुरच्या रेणा मध्यम प्रकल्पात आठ दिवसात २१ टक्के पाणीसाठा वाढला

By आशपाक पठाण | Updated: June 18, 2024 19:38 IST

पावसाचा परिणाम; घनसरगाव, खरोळा, खरोळा, पोहरेगाव बॅरेजेसच्या पाण्यात वाढ

लातूर  : मागील आठ दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे रेणा मध्यम प्रकल्पात तब्बल २१ टक्के जलसाठ्यात वाढ झाली असून मध्यम प्रकल्पामध्ये २२.४९ जलसाठा झाला आहे. जलसाठा वाढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असून यांचा सिंचनासाठी फायदा होणार आहे. शिवाय, घनसरगाव, रेणापूर, खरोळा, पोहरेगाव सह इतर बॅरेजेस मध्ये जलसाठा झाला आहे.

रेणापूर तालुक्यातील अनेक गावांची तहान भागवणारा प्रकल्प म्हणून रेणा मध्यम प्रकल्पाची ओळख आहे. शिवाय, सिंचनासाठी हजारो शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी मदत होते. पाणीपुरवठा योजनेसाठी वरदान असलेल्या रेणा मध्यम प्रकल्पात ७ जूनपर्यंत केवळ १.५ टक्का जलसाठा होता. गतवर्षी संपूर्ण पावसाळ्यात तसेच परतीचा पाऊस पडला नाही. त्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा अत्यल्प होता. पाणी कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हे पाणी पिण्यासाठी आरक्षित केले होते. शिवाय, उन्हाळ्यात पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी उपसा झाल्याने या प्रकल्पात पाणीसाठा कमी झाला होता. मात्र, मागील आठ दिवसांपासून तालुक्यात दररोज पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी जलसाठे वाढले आहेत.

पावसामुळे वाढत गेला जलसाठा...

रेणा मध्यम प्रकल्प १० जून २ टक्के पाणीसाठा वाढल्याने ३.४० टक्के पाणी होता. ११ जून रोजी दिवसभर पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात राहिल्याने एक दिवसात तब्बल १६ टक्क्यांनी पाणी वाढले. परिणामी एकूण पाणीसाठा ५.१६८ द.लघमी इतका झाला. तर पाण्याची टक्केवारी १९.६५ झाली. १२ जून रोजी २ टक्के वाढ झाली असून त्यानंतर १८ जूनपर्यंत पाण्याची आवक कमी अधिक प्रमाणात सुरू होती. सध्या प्रकल्पात २२.४९ टक्के पाणीसाठा आहे. उपयुक्त पाणीसाठा ४.६२४ दलघमी तर मृत पाणीसाठा १.१२९ दलघमी झाला आहे.

प्रकल्प क्षेत्रात दमदार पाऊस...मागील ८ ते १० दिवसांमध्ये रेणा मध्यम प्रकल्पाच्या क्षेत्र परिसरात मोठा पाऊस पडल्यामुळे पाण्याची आवक वाढली आहे. सध्या प्रकल्पात २२.४९ टक्के पाणीसाठा आहे. जलसाठा वाढल्यामुळे शेतकरी व परिसरातील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांना वाढीव जलसाठ्याचा लाभ होणार असल्याचे रेणा प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगितले. 

टॅग्स :laturलातूरDamधरणRainपाऊस