शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

लातुरच्या रेणा मध्यम प्रकल्पात आठ दिवसात २१ टक्के पाणीसाठा वाढला

By आशपाक पठाण | Updated: June 18, 2024 19:38 IST

पावसाचा परिणाम; घनसरगाव, खरोळा, खरोळा, पोहरेगाव बॅरेजेसच्या पाण्यात वाढ

लातूर  : मागील आठ दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे रेणा मध्यम प्रकल्पात तब्बल २१ टक्के जलसाठ्यात वाढ झाली असून मध्यम प्रकल्पामध्ये २२.४९ जलसाठा झाला आहे. जलसाठा वाढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असून यांचा सिंचनासाठी फायदा होणार आहे. शिवाय, घनसरगाव, रेणापूर, खरोळा, पोहरेगाव सह इतर बॅरेजेस मध्ये जलसाठा झाला आहे.

रेणापूर तालुक्यातील अनेक गावांची तहान भागवणारा प्रकल्प म्हणून रेणा मध्यम प्रकल्पाची ओळख आहे. शिवाय, सिंचनासाठी हजारो शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी मदत होते. पाणीपुरवठा योजनेसाठी वरदान असलेल्या रेणा मध्यम प्रकल्पात ७ जूनपर्यंत केवळ १.५ टक्का जलसाठा होता. गतवर्षी संपूर्ण पावसाळ्यात तसेच परतीचा पाऊस पडला नाही. त्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा अत्यल्प होता. पाणी कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हे पाणी पिण्यासाठी आरक्षित केले होते. शिवाय, उन्हाळ्यात पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी उपसा झाल्याने या प्रकल्पात पाणीसाठा कमी झाला होता. मात्र, मागील आठ दिवसांपासून तालुक्यात दररोज पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी जलसाठे वाढले आहेत.

पावसामुळे वाढत गेला जलसाठा...

रेणा मध्यम प्रकल्प १० जून २ टक्के पाणीसाठा वाढल्याने ३.४० टक्के पाणी होता. ११ जून रोजी दिवसभर पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात राहिल्याने एक दिवसात तब्बल १६ टक्क्यांनी पाणी वाढले. परिणामी एकूण पाणीसाठा ५.१६८ द.लघमी इतका झाला. तर पाण्याची टक्केवारी १९.६५ झाली. १२ जून रोजी २ टक्के वाढ झाली असून त्यानंतर १८ जूनपर्यंत पाण्याची आवक कमी अधिक प्रमाणात सुरू होती. सध्या प्रकल्पात २२.४९ टक्के पाणीसाठा आहे. उपयुक्त पाणीसाठा ४.६२४ दलघमी तर मृत पाणीसाठा १.१२९ दलघमी झाला आहे.

प्रकल्प क्षेत्रात दमदार पाऊस...मागील ८ ते १० दिवसांमध्ये रेणा मध्यम प्रकल्पाच्या क्षेत्र परिसरात मोठा पाऊस पडल्यामुळे पाण्याची आवक वाढली आहे. सध्या प्रकल्पात २२.४९ टक्के पाणीसाठा आहे. जलसाठा वाढल्यामुळे शेतकरी व परिसरातील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांना वाढीव जलसाठ्याचा लाभ होणार असल्याचे रेणा प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगितले. 

टॅग्स :laturलातूरDamधरणRainपाऊस