शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या एका फोनवर सहकारमंत्री चाकूर कृषी कार्यालयात आले; अधिकाऱ्यांची झाडाझडती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 16:26 IST

३६ पायऱ्या चढून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पोहोचले चाकूरच्या कृषी कार्यालयात; शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे दिले आदेश

- संदीप अंकलकोटेचाकूर (लातूर): चाकूर तालुक्यातील कृषी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनियमिततेमुळे हैराण झालेल्या एका शेतकऱ्याने थेट सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर पाटील यांनी तातडीने कृषी कार्यालयाला भेट देऊन गैरहजर कर्मचाऱ्यांचा पंचनामा केला आणि त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

तालुक्यातील आनंदवाडी येथील एका शेतकऱ्याने आपल्या केळी पिकाच्या नुकसानीची मदत मिळवण्यासाठी अनेक दिवसांपासून कृषी कार्यालयाच्या चकरा मारल्या होत्या. मात्र, त्यांची दखल घेतली जात नव्हती. गुरुवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता तो पुन्हा कार्यालयात गेला असता, संबंधित अधिकारी जागेवर नसल्याने तो संतप्त झाला. त्याने थेट सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली.

मंत्री ३६ पायऱ्या चढून पोहोचले कार्यालयातशेतकऱ्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत सहकार मंत्री पाटील यांनी तात्काळ चाकूर कृषी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झालेले असतानाही, कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या तब्बल ३६ पायऱ्या चढून ते कार्यालयात दाखल झाले. मंत्री कार्यालयात पोहोचले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. कार्यालयातील एकूण १० कर्मचाऱ्यांपैकी केवळ ३ कर्मचारी हजर होते. इतर अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर होते आणि जे हजर होते तेही उडवाउडवीची उत्तरे देत होते.

कारवाईचे थेट जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलणेपाटील यांनी तात्काळ जिल्हा कृषी अधिकारी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा मोबाईल बंद होता. अखेर, त्यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याशी संपर्क साधून कार्यालयातील समस्यांबाबत माहिती दिली आणि गैरहजर कर्मचाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची सूचना केली. तसेच, शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे सक्तीचे असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.

हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाहीया भेटीदरम्यान, एका शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी ३६ पायऱ्या चढणे किती कठीण आहे, हे स्वतः अनुभवल्याने पाटील यांनी कार्यालय तात्काळ दुसऱ्या ठिकाणी हलवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. यापुढे कोणत्याही शेतकऱ्याच्या कामात हलगर्जीपणा झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रlaturलातूर