शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

शेतकऱ्यांच्या एका फोनवर सहकारमंत्री चाकूर कृषी कार्यालयात आले; अधिकाऱ्यांची झाडाझडती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 16:26 IST

३६ पायऱ्या चढून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पोहोचले चाकूरच्या कृषी कार्यालयात; शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे दिले आदेश

- संदीप अंकलकोटेचाकूर (लातूर): चाकूर तालुक्यातील कृषी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनियमिततेमुळे हैराण झालेल्या एका शेतकऱ्याने थेट सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर पाटील यांनी तातडीने कृषी कार्यालयाला भेट देऊन गैरहजर कर्मचाऱ्यांचा पंचनामा केला आणि त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

तालुक्यातील आनंदवाडी येथील एका शेतकऱ्याने आपल्या केळी पिकाच्या नुकसानीची मदत मिळवण्यासाठी अनेक दिवसांपासून कृषी कार्यालयाच्या चकरा मारल्या होत्या. मात्र, त्यांची दखल घेतली जात नव्हती. गुरुवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता तो पुन्हा कार्यालयात गेला असता, संबंधित अधिकारी जागेवर नसल्याने तो संतप्त झाला. त्याने थेट सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली.

मंत्री ३६ पायऱ्या चढून पोहोचले कार्यालयातशेतकऱ्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत सहकार मंत्री पाटील यांनी तात्काळ चाकूर कृषी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झालेले असतानाही, कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या तब्बल ३६ पायऱ्या चढून ते कार्यालयात दाखल झाले. मंत्री कार्यालयात पोहोचले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. कार्यालयातील एकूण १० कर्मचाऱ्यांपैकी केवळ ३ कर्मचारी हजर होते. इतर अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर होते आणि जे हजर होते तेही उडवाउडवीची उत्तरे देत होते.

कारवाईचे थेट जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलणेपाटील यांनी तात्काळ जिल्हा कृषी अधिकारी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा मोबाईल बंद होता. अखेर, त्यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याशी संपर्क साधून कार्यालयातील समस्यांबाबत माहिती दिली आणि गैरहजर कर्मचाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची सूचना केली. तसेच, शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे सक्तीचे असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.

हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाहीया भेटीदरम्यान, एका शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी ३६ पायऱ्या चढणे किती कठीण आहे, हे स्वतः अनुभवल्याने पाटील यांनी कार्यालय तात्काळ दुसऱ्या ठिकाणी हलवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. यापुढे कोणत्याही शेतकऱ्याच्या कामात हलगर्जीपणा झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रlaturलातूर