शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

कौतुकास्पद! कचरा व्यवस्थापनाचा 'लातूर पॅटर्न' देशात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 12:44 IST

राज्यातील ड वर्ग महापालिका असलेल्या लातूर मनपाने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात देशातील महापालिकांमध्ये अव्वल येण्याचा मान मिळवला आहे.

ठळक मुद्दे राज्यातील ड वर्ग महापालिका असलेल्या लातूर मनपाने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात देशातील महापालिकांमध्ये अव्वल येण्याचा मान मिळवला आहे.लातूरमध्ये जनाधार सेवाभावी संस्थेमार्फत शहरातील कचरा गोळा करण्याचं त्यासोबतच त्यावर प्रक्रिया करण्याचं काम सुरू आहे. नगरविकास खात्याने लातूर महापालिकेसाठी मोठी मशीन दिली आहे.  या यंत्राद्वारे वाळू, माती, प्लास्टिक हे वेगळे होते व उर्वरित कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती होते.

लातूर - घनकचऱ्याचे योग्य पध्दतीने व्यवस्थापन झाले की शहराचे सौंदर्य फुलते. मात्र हे व्यवस्थापन बिघडले की शहरवासीयांचे आरोग्य बिघडते. राज्यातील ड वर्ग महापालिका असलेल्या लातूर मनपाने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात देशातील महापालिकांमध्ये अव्वल येण्याचा मान मिळवला आहे.

लातूरमध्ये जनाधार सेवाभावी संस्थेमार्फत शहरातील कचरा गोळा करण्याचं त्यासोबतच त्यावर प्रक्रिया करण्याचं काम सुरू आहे. पंढरपूर, सासवड या नगरपालिकेने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रसामुग्री आणून केवळ तीन महिन्यांत कचरामुक्त शहर बनवण्याचा मान याआधी मिळविला होता. पण महापालिकेत अशा स्वरुपाचा प्रयोग झालेला नाही. भाजपाचे नगरसेवक अजित पाटील कव्हेकर आणि काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी यासाठी प्रामुख्याने पुढाकार घेतला.

कव्हेकर आणि गोजमगुंडे यांनी आपल्या प्रभागात कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यास सुरुवात केली. कचऱ्याचे वर्गीकरण करून उपलब्ध झालेले प्लास्टिक रस्त्याच्या डांबरीकरणासाठी वापरण्याचा प्रयोगही झाला. राष्ट्रीय पातळीपर्यंत त्यांच्या कामाची दखल घेण्यात आली. तसेच सुक्या कचऱ्यामधून पिशव्या, कापड, रबर, चामडे, कागद यासह अनेक गोष्टींचे वर्गीकरण शहरातील विवेकानंद चौक, कोंडवाडा व शासकीय कॉलनी येथे करण्यात येत आहे. 

हरित लवादाने कचऱ्यावर योग्य प्रक्रिया होत नसल्यामुळे गोखले इन्स्टिट्यूट पुणे येथील प्राध्यापिका प्रीती मस्तकार यांना तज्ज्ञ म्हणून विविध महापालिकेत नेमके कसे काम चालते आहे याची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल देण्यास सांगितले होते. त्यांनी नागपूर, परभणी, नांदेड, औरंगाबाद, सांगली अशा विविध ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून नगरविकास खात्याला याबाबतचा अहवाल सादर केला. जपाननंतर जगात  सुक्या कचऱ्याचे आठ प्रकारे वर्गीकरण केवळ लातूर महानगरपालिकेमध्येच केले जात असल्याची माहिती मस्तकार यांनी दिली.

लातूरमधील या उल्लेखनीय कामाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली. नगरविकास खात्याने लातूर महापालिकेसाठी मोठी मशीन दिली आहे.  या यंत्राद्वारे वाळू, माती, प्लास्टिक हे वेगळे होते व उर्वरित कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती होते. शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण करून दररोज जमा होणाऱ्या 150 टन कचऱ्यापैकी सुमारे 60 टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असताना उर्वरित 90 टन कचऱ्यावरही याच पद्धतीने प्रक्रिया व्हावी यासाठी अन्य प्रभागांत वर्गीकरण केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. कचऱ्याची विल्हेवाट ही शहरातच झाली पाहिजे यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :laturलातूरGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMaharashtraमहाराष्ट्र