शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोयाबीन संशोधन केंद्रासाठी लातूरचा आडत बाजार कडकडीत बंद

By हणमंत गायकवाड | Updated: September 22, 2023 17:17 IST

लातूर जिल्हा गेल्या दोन दशकांपासून सोयाबीन हब म्हणून ओळखला जातो.

लातूर : सोयाबीन संशोधन केंद्र लातूर येथे स्थापन करावे, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने गुरुवारी लातूर बाजार समिती मधील व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेना सहसंपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली लातूर बाजार समितीमधील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून निदर्शने करण्यात आली. आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लातूर जिल्हा गेल्या दोन दशकांपासून सोयाबीन हब म्हणून ओळखला जातो. लातूर येथे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना सोयाबीन परिषद झाली होती. त्यात तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे यांनी सोयाबीन संशोधन केंद्र लातूर येथे करण्याचे जाहीर केले होते. परंतु १६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परळी येथे सोयाबीन संशोधन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याच्या निषेधार्थ तसेच लातूर येथे सोयाबीन संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी पुनर्विचार करावा या मागणीसाठी गुरुवारी लातूर बाजार समितीचे सर्व व्यवहार बंद ठेवून विरोध नोंदवला. या आंदोलनास महाराष्ट्र राज्य बाजार समिती उपसभापती संतोष सोमवंशी, माजी जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, महानगर प्रमुख विष्णुपंत साठे, युवासेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, शहर प्रमुख रमेश माळी, संचालक बालाप्रसाद बिदादा, सुधीर गोजमगुंडे, शिवाजी कांबळे , आडत व्यापारी अध्यक्ष चंद्रकांत पाटील, गुमास्ता अध्यक्ष तुळशीराम गंभिरे , त्र्यंबक स्वामी , रमेश पाटील, शंकर रांजनकर, बसवराज मंगरूळे,शिवकुमार तोंडारे,श्रीराम कुलकर्णी, अनंत जगताप, विलास लंगर,अजित सोमवंशी,राहुल रोडे, भास्कर माने, तानाजी करपुरे, सिद्धेश्वर जाधव , सुधाकर कुलकर्णी, राजेंद्र कतारे, बालाजी जाधव, अंजीरराव धानुरे,अमर पवार व आडत, व्यापारी, गुमास्ता, हमाल, व गाडीवान, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी