शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

तुम्हाला काका-पुतण्या नातं धार्जिणं दिसतंय; लातूरमध्ये जयंत पाटलांचा खास शैलीत अजित पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 21:54 IST

जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

Jayant Patil ( Marathi News ) : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीही फुटली आणि एकसंध असणाऱ्या पवार कुटुंबातही उभी फूट पडली. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पक्षावर दावा सांगितल्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच मूळ पक्ष असल्याचा निकाल दिला. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्याशी राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राला काका-पुतण्या वादाचा नवा अंका पाहायला मिळत आहे. याचाच संदर्भ घेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील आज लातूर येथील कार्यक्रमात बोलताना अजित पवारांना टोला लगावला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण आज लातूर येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाला विलासराव देशमुखांचे बंधू दिलीपराव देशमुख हेदेखील उपस्थित होते. त्यांना उद्देशून जयंत पाटील यांनी मिश्किलपणे म्हटलं की, "तुम्हाला काका-पुतण्या नातं धार्जिणं दिसतंय. दिलीपराव देशमुख हे उत्तमपणे नेतृत्व करत आहेत. त्यांचे आणि अमितभैय्यांचे संबंध अतिशय मधुर आहेत. राजकारणात कोणी कसंही वागलं तरी चालतं, पण राजकारणासाठी व्यक्तिगत नातं तोडण्याची भूमिका कोणी घेता कामा नये. मात्र महाराष्ट्रात आता तेही होऊ लागलं आहे," असं म्हणत जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

"राजकारणाची पातळी घसरली आहे"

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "लोकं एखाद्या व्यक्तीला त्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे स्मरणात ठेवतात. विलासराव देशमुख साहेब यांनी मराठवाड्यासाठी आणि संपूर्ण राज्यासाठी विस्तृत काम केले आहे. आटपाडीच्या साखर कारखान्याच्या उद्घाटनप्रसंगी ते आले होते. तेव्हा त्यांचे भाषण पहिल्यांदा ऐकलं. राजकारण्याने कसे भाषण करावे हे विलासरावांकडून शिकले पाहिजे. मी त्यांच्या मंत्रिमंडळात अधिकतम काम केले आहे. त्यामुळे त्यांचे आणि माझे घनिष्ट ऋणानुबंध होते. त्याकाळी फार वेगळे राजकीय संस्कार आम्ही अनुभवले. म्हणून महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेऊ शकलो. आज विलासराव देशमुख साहेब असते तर काँग्रेसच्या संकटाच्या काळात उभे ठाकले असते. आज राज्यातील काँग्रेस भक्कम पाय रोवून उभी आहे ती विलासराव देशमुख साहेबांमुळे. आता राजकारणाचा काळ फार बदलला आहे. भाषा, कृत्य सर्वच स्तरावर पातळी घसरली आहे. राजकारणात गुंडगिरी वाढली आहे. मंत्रिमंडळात सुसंवाद नाही. सर्वच बाबतीत राज्याचा आलेख उतरता आहे. लातूरकरांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती टिकवण्यासाठी पुढाकार घ्यावा," असं आवाहन यावेळी जयंत पाटील यांनी देशमुख बंधूंना केलं आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवारlaturलातूर