शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
3
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
4
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
5
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
6
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
7
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
8
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
9
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
10
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
11
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
12
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
13
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
14
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
15
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
16
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
17
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
18
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
19
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
20
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?

तुम्हाला काका-पुतण्या नातं धार्जिणं दिसतंय; लातूरमध्ये जयंत पाटलांचा खास शैलीत अजित पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 21:54 IST

जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

Jayant Patil ( Marathi News ) : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीही फुटली आणि एकसंध असणाऱ्या पवार कुटुंबातही उभी फूट पडली. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पक्षावर दावा सांगितल्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच मूळ पक्ष असल्याचा निकाल दिला. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्याशी राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राला काका-पुतण्या वादाचा नवा अंका पाहायला मिळत आहे. याचाच संदर्भ घेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील आज लातूर येथील कार्यक्रमात बोलताना अजित पवारांना टोला लगावला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण आज लातूर येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाला विलासराव देशमुखांचे बंधू दिलीपराव देशमुख हेदेखील उपस्थित होते. त्यांना उद्देशून जयंत पाटील यांनी मिश्किलपणे म्हटलं की, "तुम्हाला काका-पुतण्या नातं धार्जिणं दिसतंय. दिलीपराव देशमुख हे उत्तमपणे नेतृत्व करत आहेत. त्यांचे आणि अमितभैय्यांचे संबंध अतिशय मधुर आहेत. राजकारणात कोणी कसंही वागलं तरी चालतं, पण राजकारणासाठी व्यक्तिगत नातं तोडण्याची भूमिका कोणी घेता कामा नये. मात्र महाराष्ट्रात आता तेही होऊ लागलं आहे," असं म्हणत जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

"राजकारणाची पातळी घसरली आहे"

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "लोकं एखाद्या व्यक्तीला त्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे स्मरणात ठेवतात. विलासराव देशमुख साहेब यांनी मराठवाड्यासाठी आणि संपूर्ण राज्यासाठी विस्तृत काम केले आहे. आटपाडीच्या साखर कारखान्याच्या उद्घाटनप्रसंगी ते आले होते. तेव्हा त्यांचे भाषण पहिल्यांदा ऐकलं. राजकारण्याने कसे भाषण करावे हे विलासरावांकडून शिकले पाहिजे. मी त्यांच्या मंत्रिमंडळात अधिकतम काम केले आहे. त्यामुळे त्यांचे आणि माझे घनिष्ट ऋणानुबंध होते. त्याकाळी फार वेगळे राजकीय संस्कार आम्ही अनुभवले. म्हणून महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेऊ शकलो. आज विलासराव देशमुख साहेब असते तर काँग्रेसच्या संकटाच्या काळात उभे ठाकले असते. आज राज्यातील काँग्रेस भक्कम पाय रोवून उभी आहे ती विलासराव देशमुख साहेबांमुळे. आता राजकारणाचा काळ फार बदलला आहे. भाषा, कृत्य सर्वच स्तरावर पातळी घसरली आहे. राजकारणात गुंडगिरी वाढली आहे. मंत्रिमंडळात सुसंवाद नाही. सर्वच बाबतीत राज्याचा आलेख उतरता आहे. लातूरकरांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती टिकवण्यासाठी पुढाकार घ्यावा," असं आवाहन यावेळी जयंत पाटील यांनी देशमुख बंधूंना केलं आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवारlaturलातूर