शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला काका-पुतण्या नातं धार्जिणं दिसतंय; लातूरमध्ये जयंत पाटलांचा खास शैलीत अजित पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 21:54 IST

जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

Jayant Patil ( Marathi News ) : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीही फुटली आणि एकसंध असणाऱ्या पवार कुटुंबातही उभी फूट पडली. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पक्षावर दावा सांगितल्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच मूळ पक्ष असल्याचा निकाल दिला. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्याशी राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राला काका-पुतण्या वादाचा नवा अंका पाहायला मिळत आहे. याचाच संदर्भ घेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील आज लातूर येथील कार्यक्रमात बोलताना अजित पवारांना टोला लगावला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण आज लातूर येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाला विलासराव देशमुखांचे बंधू दिलीपराव देशमुख हेदेखील उपस्थित होते. त्यांना उद्देशून जयंत पाटील यांनी मिश्किलपणे म्हटलं की, "तुम्हाला काका-पुतण्या नातं धार्जिणं दिसतंय. दिलीपराव देशमुख हे उत्तमपणे नेतृत्व करत आहेत. त्यांचे आणि अमितभैय्यांचे संबंध अतिशय मधुर आहेत. राजकारणात कोणी कसंही वागलं तरी चालतं, पण राजकारणासाठी व्यक्तिगत नातं तोडण्याची भूमिका कोणी घेता कामा नये. मात्र महाराष्ट्रात आता तेही होऊ लागलं आहे," असं म्हणत जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

"राजकारणाची पातळी घसरली आहे"

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "लोकं एखाद्या व्यक्तीला त्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे स्मरणात ठेवतात. विलासराव देशमुख साहेब यांनी मराठवाड्यासाठी आणि संपूर्ण राज्यासाठी विस्तृत काम केले आहे. आटपाडीच्या साखर कारखान्याच्या उद्घाटनप्रसंगी ते आले होते. तेव्हा त्यांचे भाषण पहिल्यांदा ऐकलं. राजकारण्याने कसे भाषण करावे हे विलासरावांकडून शिकले पाहिजे. मी त्यांच्या मंत्रिमंडळात अधिकतम काम केले आहे. त्यामुळे त्यांचे आणि माझे घनिष्ट ऋणानुबंध होते. त्याकाळी फार वेगळे राजकीय संस्कार आम्ही अनुभवले. म्हणून महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेऊ शकलो. आज विलासराव देशमुख साहेब असते तर काँग्रेसच्या संकटाच्या काळात उभे ठाकले असते. आज राज्यातील काँग्रेस भक्कम पाय रोवून उभी आहे ती विलासराव देशमुख साहेबांमुळे. आता राजकारणाचा काळ फार बदलला आहे. भाषा, कृत्य सर्वच स्तरावर पातळी घसरली आहे. राजकारणात गुंडगिरी वाढली आहे. मंत्रिमंडळात सुसंवाद नाही. सर्वच बाबतीत राज्याचा आलेख उतरता आहे. लातूरकरांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती टिकवण्यासाठी पुढाकार घ्यावा," असं आवाहन यावेळी जयंत पाटील यांनी देशमुख बंधूंना केलं आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवारlaturलातूर