शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

लातूरला अवकाळी पावसाने झोडपले; टरबूज, पपई, भाजीपाल्याची प्रचंड नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 16:23 IST

लातूर तालुक्यातील सारसा शिवारात वादळी वारा, गारांचा पाऊस

ठळक मुद्देबहरात आलेले पीक गेलेपंचनामा करण्याची शेतकऱ्यांची मागणी

लातूर : लॉकडाउनमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाच्याही लहरीपणाचा फटका सहन करावा लागत आहे. मुलांप्रमाणे सांभाळ केलेला भाजीपाला, टरबूज, पपई आदी पिके एका रात्रीत होत्याची नव्हती झाली. वादळी वारा वरून गारांचा मार बसल्याने झाडांची पानेही गळून पडली. त्यामुळे लातूर तालुक्यातील सारसा शिवारातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

लातूर तालुक्यातील तांदुळजा गादवड टाकळगाव सारसा वांजरखेडा शिवारात रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आंब्याच्या बनीमीही उडून गेले आहेत शिवाय अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असतानाही कमी पाण्यावर का होईना जोपासलेला भाजीपाला, टरबूज, पपई आदी फळांची नासाडी झाली आहे. रात्रीच्या वेळी झालेल्या वादळी वारा व गारांच्या झपाट्यात उसाची पाने गळून पडली. टरबूजावर गारांचा मारा बसल्याने अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मोठी झाडेही उन्मळून पडली आहेत. पहिल्यांदाच एवढे मोठे वादळ आणि गारा पडल्याचे शेतकरी परमेश्वर भिसे, श्रीधर पवार, फक्रोद्दीन सय्यद,जमाल पठाण, महादेव भिसे, सुशील पवार यांनी सांगितले. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली. रात्री झालेल्या वादळात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना मिळताच त्यांनी तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तहसीलदार स्वप्नील पवार यांच्या सूचनेनुसार तलाठी व कृषी सहाय्यक यांनी थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामा सुरू केला असल्याचे मंडळ अधिकारी निजामुद्दीन शेख यांनी सांगितले. 

भाजीपाला, फळांचे 5 लाखांचे नुकसान... सारसा येथील प्रगतशील शेतकरी परमेश्वर भिसे म्हणाले, जवळपास पाच एकर क्षेत्रात पपई, टरबूज, काकडी, वांगे, भेंडी आदी फळे आणि भाजीपाल्याची लागवड केली होती. अगोदरच लॉकडॉउनमुळे लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले होते. रविवारी रात्री झालेल्या पावसाने होत्याचे नव्हते झाले. यातून किमान 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

बहरात आलेल्या टरबूजाचा चिखल... मांजरा नदीकाठी महिनाभरापूर्वी जमाल पठाण, आफसाना शेख यांनी जवळपास दोन एकर क्षेत्रात टरबूज लागवड केली. आणखीन 10 ते 15 दिवसात ते तोडणीला आले असते. लागवड व मशागतीचा आतापर्यंत 70 हजार रुपये खर्च झाला.गारपिटीने रात्रीत सर्वच नुकसान झाले. आता फड मोडल्याशिवाय पर्याय नाही. गारामुळे सर्व टरबूज फुटली आहेत. किमान दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे. 

साहेब आमचाही पंचनामा करा... शिवारात पंचनामा करण्यासाठी गेलेल्या तलाठी, कृषी सहायक यांनी नुकसानीची पाहणी करीत पंचनामा केला. गारपीटीत उसाचेही मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही पंचनाम्यासाठी महसुलाच्या कर्मचाऱ्यांना विनवणी केली. शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरFarmerशेतकरी