शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

पिकविम्याचे ३८ कोटी शेतक-यांच्या खात्यावर, पावणेतीन महिन्यांपासून शेतक-यांची सुरू होती धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 20:40 IST

गेल्या पावणेतीन महिन्यांपासून जिल्ह्यातील २ लाख १० हजार शेतकरी पीकविम्यासाठी धावाधाव करीत होते. पीकविम्याच्या घोळाचा गुंता मात्र सुटत नव्हता. अखेर हा घोळ संपुष्टात आला असून, या शेतक-यांसाठी पीकविमा कंपनीने ३८ कोटी ४९ लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. ही रक्कम शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करणे सुरू झाले आहे.

 - हरी मोकाशे लातूर  - गेल्या पावणेतीन महिन्यांपासून जिल्ह्यातील २ लाख १० हजार शेतकरी पीकविम्यासाठी धावाधाव करीत होते. पीकविम्याच्या घोळाचा गुंता मात्र सुटत नव्हता. अखेर हा घोळ संपुष्टात आला असून, या शेतक-यांसाठी पीकविमा कंपनीने ३८ कोटी ४९ लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. ही रक्कम शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करणे सुरू झाले आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीस पावसाचा गुंगारा व त्यानंतर अतिवृष्टी झाली होती. दरम्यान, पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होत पिकांचा विमा हप्ता भरला होता. लातूरसह राज्यातील इतर जिल्ह्यांत मे अखेरीसपर्यंत पीकविमा मंजूर होऊन वाटपास सुरुवात झाली होती. परंतु, लातूर जिल्ह्यात मात्र पीकविम्याचा घोळ सुरू झाला होता. सुरुवातीस अडीचशे कोटी रुपये पीकविमा मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात वाटपास सुरुवात झाल्यानंतर १०० कोटींची तफावत निर्माण होऊन १५० कोटींचा पीकविमा वाटप झाला होता. पहिल्या टप्प्यात बहुतांश शेतकºयांनी पीकविम्याचा लाभ न मिळाल्याने या शेतकºयांची धावाधाव सुरू होती. दरम्यान, पीकविमा कंपनीने दुसरा टप्पा जाहीर करीत ५७ कोटी ८६ लाख रुपये उपलब्ध करून दिले होते. दोन टप्पे झाले असतानाही जिल्ह्यातील जवळपास ५० गावे पीकविम्यापासून वंचितच होती. त्यामुळे या गावातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यासह पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींकडे तक्रार करुन संताप व्यक्त केला होता. पीकविमा मिळावा म्हणून शेतकºयांची धावाधावही सुरू होती. दरम्यान, या संदर्भात वारंवार ‘लोकमत’मधून सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्याची दखल घेत तसेच लोकप्रतिनिधी, शेतकºयांच्या पाठपुराव्यामुळे तिसºया टप्प्यात लातूर जिल्ह्यास ३८ कोटी ४९ लाख रुपये पीकविमा कंपनीने उपलब्ध करून दिले आहेत. पीकविमा लाभार्थी शेतकºयांची यादी व रक्कम संबंधित बँकांकडे पाठविण्यात आली आहे. २ लाख १० हजार शेतकºयांना पीकविम्याचा लाभ... तिसºया टप्प्यात ३८ कोटी ४९ लाख रुपये उपलब्ध झाले असून, त्याचा लाभ २ लाख १० हजार शेतकºयांना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात ३ लाख ८ हजार ४७८ शेतकºयांसाठी १३४ कोटी तर दुस-या टप्प्यात २ लाख ७४ हजार ९०० शेतकºयांसाठी ५७ कोटी ८६ लाख रुपये उपलब्ध झाले होते. जिल्ह्यातीलएकूण ७ लाख ९३ हजार ३७८ शेतक-यांना २३० कोटी ३५ लाख रुपये मिळत आहेत. वंचित ५० गावांचा समावेश... तिसºया टप्प्यात पीकविम्यापासून वंचित असलेल्या जवळपास ५० गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता कुठलाही शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहणार नाही. विमा कंपनीने लाभार्थी शेतक-यांची यादी व पैसे बँकांकडे वर्ग केले आहेत, अशी माहिती नॅशनल इंशुरन्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक विजय पस्तापुरे यांनी दिली. जिल्हा बँकेकडे ४ कोटी वर्ग... लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पीकविम्यापोटी ४ कोटी ३३ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहे. ही रक्कम शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करणे सुरू आहे. लवकरच त्याचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे व्यवस्थापक एच.जे. जाधव यांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर