शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

पिकविम्याचे ३८ कोटी शेतक-यांच्या खात्यावर, पावणेतीन महिन्यांपासून शेतक-यांची सुरू होती धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 20:40 IST

गेल्या पावणेतीन महिन्यांपासून जिल्ह्यातील २ लाख १० हजार शेतकरी पीकविम्यासाठी धावाधाव करीत होते. पीकविम्याच्या घोळाचा गुंता मात्र सुटत नव्हता. अखेर हा घोळ संपुष्टात आला असून, या शेतक-यांसाठी पीकविमा कंपनीने ३८ कोटी ४९ लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. ही रक्कम शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करणे सुरू झाले आहे.

 - हरी मोकाशे लातूर  - गेल्या पावणेतीन महिन्यांपासून जिल्ह्यातील २ लाख १० हजार शेतकरी पीकविम्यासाठी धावाधाव करीत होते. पीकविम्याच्या घोळाचा गुंता मात्र सुटत नव्हता. अखेर हा घोळ संपुष्टात आला असून, या शेतक-यांसाठी पीकविमा कंपनीने ३८ कोटी ४९ लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. ही रक्कम शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करणे सुरू झाले आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीस पावसाचा गुंगारा व त्यानंतर अतिवृष्टी झाली होती. दरम्यान, पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होत पिकांचा विमा हप्ता भरला होता. लातूरसह राज्यातील इतर जिल्ह्यांत मे अखेरीसपर्यंत पीकविमा मंजूर होऊन वाटपास सुरुवात झाली होती. परंतु, लातूर जिल्ह्यात मात्र पीकविम्याचा घोळ सुरू झाला होता. सुरुवातीस अडीचशे कोटी रुपये पीकविमा मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात वाटपास सुरुवात झाल्यानंतर १०० कोटींची तफावत निर्माण होऊन १५० कोटींचा पीकविमा वाटप झाला होता. पहिल्या टप्प्यात बहुतांश शेतकºयांनी पीकविम्याचा लाभ न मिळाल्याने या शेतकºयांची धावाधाव सुरू होती. दरम्यान, पीकविमा कंपनीने दुसरा टप्पा जाहीर करीत ५७ कोटी ८६ लाख रुपये उपलब्ध करून दिले होते. दोन टप्पे झाले असतानाही जिल्ह्यातील जवळपास ५० गावे पीकविम्यापासून वंचितच होती. त्यामुळे या गावातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यासह पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींकडे तक्रार करुन संताप व्यक्त केला होता. पीकविमा मिळावा म्हणून शेतकºयांची धावाधावही सुरू होती. दरम्यान, या संदर्भात वारंवार ‘लोकमत’मधून सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्याची दखल घेत तसेच लोकप्रतिनिधी, शेतकºयांच्या पाठपुराव्यामुळे तिसºया टप्प्यात लातूर जिल्ह्यास ३८ कोटी ४९ लाख रुपये पीकविमा कंपनीने उपलब्ध करून दिले आहेत. पीकविमा लाभार्थी शेतकºयांची यादी व रक्कम संबंधित बँकांकडे पाठविण्यात आली आहे. २ लाख १० हजार शेतकºयांना पीकविम्याचा लाभ... तिसºया टप्प्यात ३८ कोटी ४९ लाख रुपये उपलब्ध झाले असून, त्याचा लाभ २ लाख १० हजार शेतकºयांना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात ३ लाख ८ हजार ४७८ शेतकºयांसाठी १३४ कोटी तर दुस-या टप्प्यात २ लाख ७४ हजार ९०० शेतकºयांसाठी ५७ कोटी ८६ लाख रुपये उपलब्ध झाले होते. जिल्ह्यातीलएकूण ७ लाख ९३ हजार ३७८ शेतक-यांना २३० कोटी ३५ लाख रुपये मिळत आहेत. वंचित ५० गावांचा समावेश... तिसºया टप्प्यात पीकविम्यापासून वंचित असलेल्या जवळपास ५० गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता कुठलाही शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहणार नाही. विमा कंपनीने लाभार्थी शेतक-यांची यादी व पैसे बँकांकडे वर्ग केले आहेत, अशी माहिती नॅशनल इंशुरन्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक विजय पस्तापुरे यांनी दिली. जिल्हा बँकेकडे ४ कोटी वर्ग... लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पीकविम्यापोटी ४ कोटी ३३ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहे. ही रक्कम शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करणे सुरू आहे. लवकरच त्याचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे व्यवस्थापक एच.जे. जाधव यांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर