शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

अख्ख्या दक्षिण भारतात शिजते लातूरची डाळ ! तीन हजार टन डाळीची दररोज होते निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 18:16 IST

डाळ आंध्र प्रदेशातील कर्नुलपासून तमिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत पाठवली जात आहे.

ठळक मुद्देलाल रंगाच्या तुरीचे आगर म्हणून ‘लातूर’ हे नाव पडलेमहाराष्ट्राबरोबरच तेलंगणा, कर्नाटकातून शेतमाल विक्रीसाठी येतो़ 

- हरी मोकाशे

लातूर : रेल्वेने पाणी आणावे लागलेल्या लातूर जिल्ह्यात पाण्याची टंचाई असली तरी, अख्ख्या दक्षिण भारताला इथल्या डाळीचा गोडवा लागला आहे. जिल्ह्यातील दीडशे डाळ मिलमधून दररोज सुमारे तीन हजार टन डाळ तयार होत असून ही डाळ आंध्र प्रदेशातील कर्नुलपासून तमिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत पाठवली जात आहे.

लातूर जिल्हा डाळीच्या पिकांसाठी ओळखला जातो. विशेषत: तूर, हरभरा, उडीद आणि मूग ही पिके घेतली जातात. लाल रंगाच्या तुरीचे आगर म्हणून ‘लातूर’ हे नाव पडले, असेही म्हटले जाते. शिवाय, शेजारच्या कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात तूर विक्रीसाठी लातूरला आणली जाते. येथील बाजार समितीत त्याच दिवशी माप होऊन शेतकऱ्यांना पैसे दिले जातात त्यामुळे राज्यातील इतर बाजारपेठांच्या तुलनेत चांगला दर मिळतो. त्यामुळे महाराष्ट्राबरोबरच तेलंगणा, कर्नाटकातून हा शेतमाल विक्रीसाठी येतो़ 

जिल्ह्यात डाळ निर्मितीचे १५० प्रकल्प असून ही संख्या मराठवाड्यात सर्वाधिक आहेत़ या प्रकल्पासाठी दररोज ४५ ते ५० हजार क्विंटल तुरीची खरेदी केली जाते़ त्यातून दररोज ३० हजार क्विंटल अर्थात ३ हजार टन डाळ तयार होते. येथील डाळीस महाराष्ट्राबरोबर दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांसह गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे़  

डाळीची गुणवत्ता कायम़़लातूरच्या तूर डाळीसह विजय, जॅकी, काबुली हरभरा डाळीस सर्वाधिक मागणी असते, असे उद्योजक नितीन कलंत्री यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना हमीभाव मिळायला हवा...सध्या तुरीस ५ हजारांपर्यंत तर हरभऱ्याला ३७०० रुपयांपर्यंत सर्वसाधारण दर मिळत आहे़ केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीपेक्षा हा दर कमी आहे़ त्यामुळे शेतकरी अडचणीत येऊन इतर पिकांकडे वळण्याची शक्यता असते. त्यामुळे शासनाने नाफेड अंतर्गत जास्तीत जास्त खरेदी केंद्र सुरु करुन शेतमाल खरेदी करणे आवश्यक आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले़

१५ हजार मजुरांना रोजगाऱ़ डाळ उद्योगातून दररोज १५ हजार मजुरांना रोजगार मिळतो़ त्यात बाजार समितीतील हमाल-मापाड्यांची संख्या वेगळी. सदर व्यवसायात कौशल्य असलेल्यांना आणखी चांगला वाव आहे़

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीlaturलातूर