शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

युद्धामुळे जलमार्ग बंद; लातूरच्या शेतकऱ्यांचा कोट्यवधीचा माल बंदरावरच, आर्थिक उलाढाल ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 17:54 IST

आखाती देशांचा जलमार्ग बंद झाल्याने शेतकरी हवालदिल; अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, दुबईची सागरी वाहतूक बंद

लातूर : अमेरिका, इस्त्रायल-इराण युद्धाचा परिणाम जागतिक व्यापारावर झाला आहे. लातुरातील निर्यातीलाही फटका बसला आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा चना, मका, सोयाबीन डीओसी दुबई आणि मुंबईच्या बंदरावर अडकून पडली आहे. जवळपास ९५० टन शेतमाल जागेवरच राहिल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे निर्यातदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लातूर जिल्ह्यातून कृषी उत्पादनांची जगाताील विविध देशांमध्ये निर्यात होते. मात्र, गत आठवड्यापासून अमेरिका, इस्त्रायल-इराण या देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. त्याचा मोठा परिणाम निर्यातीवर झाला आहे. २८ फेब्रुवारीपासून काबुली चना, मका, सोयाबीन डीओसी निर्यात बंद झाली आहे. अफगानिस्तान, उझबेकिस्तान, दुबईला सागरीमार्गाने होणारी शेतमालाची वाहतूक बंद असल्याने मुंबईतील बंदरावर जवळपास ८०० टन शेतमाल पडून आहे. याशिवाय, दुबईतील बंदरावर १५० टन कृषी उत्पादन अडकून पडले आहे. तेथील खरेदीदारांनी हा माल न उचलल्याने चिंता वाढली आहे.

लातुरातून २० देशांत कृषी उत्पादनेलातूर जिल्ह्यातून यूएसए, इटली, चीन, थायलंड, दुबई, कुवेत, अफगानिस्तान, उझबेकिस्तान अशा २० देशांत कृषी उत्पादनांची निर्यात होते, असे येथील निर्यातदार श्रीहरी काल्या यांनी सांगितले. त्यांच्याशिवाय आणखीन एक-दोन निर्यातदार जिल्ह्यात आहेत. इस्त्रायल-अमेरिका-इराण संघर्षामुळे आखातील देशातील व्यापार ठप्प झाला आहे. युरोपीय राष्ट्रांत निर्यात सुरू आहे.

चिंता वाढली विदेशात निर्यात होणाऱ्या कृषी उत्पादनांसाठीची काही अनामत रक्कम मिळाली आहे. उर्वरित रक्कम कृषी उत्पादन पोहोचल्यानंतर मिळणार आहे. मात्र, जलमार्ग बंद असल्याने माल पोहोचविता येत नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे.- श्रीहरी काल्या, निर्यातदार.

द्राक्ष निर्यातही थांबलीजिल्ह्यातून युरोप आणि आखाती देशांमध्ये द्राक्षाची दरवर्षी मोठ्या प्रमाणात निर्यात होते. दरवर्षी जवळपास ३०० ते ४०० टन द्राक्ष विदेशात जातात. सध्या द्राक्ष हंगामास सुरुवात झाली असून, तो एप्रिलअखेरपर्यंत असतो. आता जवळपास १० कंटेनर द्राक्ष निर्यात झाली आहे. मात्र, मंगळवारपासून मुंबईच्या बंदरातून इराण, दुबईकडे जाणारे जलमार्ग बंद झाले आहेत. परिणामी, द्राक्ष निर्यात थांबली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत.

शेतकऱ्यांना मोठा फटकाजिल्ह्यातील काही शेतकरी विदेशात द्राक्ष निर्यात करतात. मात्र, युद्धामुळे इराण, दुबईकडे होणारी द्राक्ष निर्यात थांबली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना धक्का बसला आहे.- राजाराम जाधव, संचालक, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ.

English
हिंदी सारांश
Web Title : War Closes Waterways: Latur Farmers' Goods Stranded, Economy Stalls

Web Summary : Latur's exports suffer as war halts waterways. Farmers' chickpeas, maize, and soybean DOC worth crores are stuck at ports, crippling trade. Grape exports are also impacted.
टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रlaturलातूरFarmerशेतकरी