लातूर, रेणापूर, औशात चार लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:24 IST2021-09-15T04:24:53+5:302021-09-15T04:24:53+5:30
पाेलिसांनी सांगितले की, फिर्यादी संताेष गुलाब शिंदे (४२, रा. म्हाडा काॅलनी, लातूर) यांच्या घराचा कडी-काेयंडा ताेडून अज्ञात चाेरट्यांनी साेमवारी ...

लातूर, रेणापूर, औशात चार लाखांचा ऐवज लंपास
पाेलिसांनी सांगितले की, फिर्यादी संताेष गुलाब शिंदे (४२, रा. म्हाडा काॅलनी, लातूर) यांच्या घराचा कडी-काेयंडा ताेडून अज्ञात चाेरट्यांनी साेमवारी रात्री घरात प्रवेश केला व लाेखंडी कपाट ताेडून साेन्याची बाेरमाळ, मणीमंगळसूत्र असा ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत फिर्यादी अभिमन्यू संदिपान शिंदे (२९, रा. नवीन आदर्श काॅलनी, औसा राेड, लातूर) यांच्या घराचे किचनच्या पाठीमागील दार उघडे हाेते. या दारातून अज्ञात चाेरट्यांनी घरात प्रवेश केला व घरातील साेन्याचे दागिने, चांदीचे माेठे ताट, तीन चांदीच्या वाट्या, एक ग्लास, एक नाणे आणि राेख रक्कम असा एकूण १ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना १३ सप्टेंबरच्या रात्री घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात अज्ञाताविराेधात साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या घटनेत फिर्यादी साहेबराव धाेंडिबा चव्हाण (५३, रा. साेनचिंचाेली, ता. औसा) हे १३ सप्टेंबरराेजी रात्री झाेपले असता, अज्ञात चाेरट्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील दाराची कडी काढून आत प्रवेश केला. घरात ठेवलेली ७० जुनी चांदीची नाणी, दीड ताेळ्याचे साेन्याचे दागिने, दहा साड्या असा एकूण ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत भादा पाेलीस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेणापूर येथे तीन घरे फाेडली...
एकाच रात्री रेणापूर येथील तीन घरे फाेडल्याची घटना घडली. यामध्ये जवळपास ७१ हजारांचा मुद्देमाल चाेरट्यांनी लंपास केला आहे. रेणापूर येथील सानेगुरुजी भागात काही जण सणानिमित्त आपल्या गावाकडे गेले हाेते. दरम्यान, शहाजी काळे, मुकुंद गाेविंद झंपलवाड आणि श्रीमंत व्यंकटराव पवार यांच्या घरात अज्ञात चाेरट्यांनी प्रवेश केला. यावेळी साेन्याच्या दागिन्यांसह राेख रक्कम असा एकूण ७१ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चाेरट्यांनी पळविला. घटनास्थळी पाेलिसांनी भेट देऊन पंचानामा केला आहे. शिवाय, श्वानपथक, ठसेतज्ज्ञांनीही पाहणी केली आहे. श्वानाने रेणापूर पिंपळफाटा राेडपर्यंत माग काढला. चाेरट्यांनी चारचाकी वाहनातून पलायन केले असावे, अशी शक्यता पाेलिसांनी वर्तविली आहे.