शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

Killari Earthquake : अख्खं कुटुंब गडप झाल्याची सल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 12:24 IST

डोळ्यासमोर काका-काकू आपल्या मुलांसह भिंतीत गाडल्या गेले... रत्नमाला अजय यादव बोलत होत्या. 

- निशिकांत मायी लातूर : सर्वत्र मृतदेहांचा सडा... उद्ध्वस्त झालेली घरे...कुठं आहे माझं घर... थांग लागत नाही... निव्वळ आक्रोश... काळोख... भूकंपाचे आज नाव जरी काढले तरी अंगावर काटा उभा राहतो... नकळत डोळ्यात अश्रू गर्दी करू लागतात... होय! साक्षीदार आहे मी या काळ्या घटनेची... डोळ्यासमोर काका-काकू आपल्या मुलांसह भिंतीत गाडल्या गेले... रत्नमाला अजय यादव बोलत होत्या. 

काय करावं, कुणाला सांगावं...? कारण प्रत्येकाचीच ही रडकहाणी होती... किल्लारीच्या माहेरवाशीण असलेल्या पद्मा धनराज भोसले आज लातूरच्या यादव कुटुंबाच्या सूनबाई झाल्या आहेत. रत्नमाला यादव सांगतात, दु:ख आजही आहे. २५ वर्षे झाली, पण या घटनेची आठवण जरी झाली तरी रडून मोकळी होते. 

त्या म्हणाल्या,  पहाटे ३ वाजताच्या सुमारास काळाचा प्रघात झाला. वडील धनराज प्रल्हादराव भोसले व काका विद्याधर प्रल्हादराव भोसले... सोबत आजी-आजोबा आणि सर्व भावंडे. एकत्र कुटुंब सुखासमाधानानं राहात होतं. रत्नमालाचा कंठ दाटून आला. पाण्याचा घोट घेत बोलत्या झाल्या... आम्ही आईसोबत बाहेर अंगणात झोपलो. घराच्या आतल्या पडवीत काका, काकू, त्यांची दोन मुलं झोपली होती. डोळ्याला डोळा लागत नाही, तोच बॉम्ब फुटल्यागत मोठ्ठा आवाज झाला. 

आई खडबडून उठली. काकांना जोऱ्याने आवाज दिला. दार बडवून बडवून त्यांना उठवलं. ते दाराची कुंडी काढण्यास आले... दार उघडले गेले... तेव्हाच पाठीमागील भिंत कोसळली. क्षणात मोठ्ठा धूर झाला... अंधार झाला... काहीच दिसेना... त्या भिंतीखाली काकू आपल्या मुुलांसह गडप झाली होती. दरम्यान, काकांनी दार उघडले खरे, पण तेही त्याच भिंतीखाली आले होते, कळलेच नाही कुणाला. दोन एकत्र कुटुंबातले एक कुटुंब या भूकंपाने उद्ध्वस्त झाले होते. 

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपFamilyपरिवारDeathमृत्यू