शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Killari Earthquake : अख्खं कुटुंब गडप झाल्याची सल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 12:24 IST

डोळ्यासमोर काका-काकू आपल्या मुलांसह भिंतीत गाडल्या गेले... रत्नमाला अजय यादव बोलत होत्या. 

- निशिकांत मायी लातूर : सर्वत्र मृतदेहांचा सडा... उद्ध्वस्त झालेली घरे...कुठं आहे माझं घर... थांग लागत नाही... निव्वळ आक्रोश... काळोख... भूकंपाचे आज नाव जरी काढले तरी अंगावर काटा उभा राहतो... नकळत डोळ्यात अश्रू गर्दी करू लागतात... होय! साक्षीदार आहे मी या काळ्या घटनेची... डोळ्यासमोर काका-काकू आपल्या मुलांसह भिंतीत गाडल्या गेले... रत्नमाला अजय यादव बोलत होत्या. 

काय करावं, कुणाला सांगावं...? कारण प्रत्येकाचीच ही रडकहाणी होती... किल्लारीच्या माहेरवाशीण असलेल्या पद्मा धनराज भोसले आज लातूरच्या यादव कुटुंबाच्या सूनबाई झाल्या आहेत. रत्नमाला यादव सांगतात, दु:ख आजही आहे. २५ वर्षे झाली, पण या घटनेची आठवण जरी झाली तरी रडून मोकळी होते. 

त्या म्हणाल्या,  पहाटे ३ वाजताच्या सुमारास काळाचा प्रघात झाला. वडील धनराज प्रल्हादराव भोसले व काका विद्याधर प्रल्हादराव भोसले... सोबत आजी-आजोबा आणि सर्व भावंडे. एकत्र कुटुंब सुखासमाधानानं राहात होतं. रत्नमालाचा कंठ दाटून आला. पाण्याचा घोट घेत बोलत्या झाल्या... आम्ही आईसोबत बाहेर अंगणात झोपलो. घराच्या आतल्या पडवीत काका, काकू, त्यांची दोन मुलं झोपली होती. डोळ्याला डोळा लागत नाही, तोच बॉम्ब फुटल्यागत मोठ्ठा आवाज झाला. 

आई खडबडून उठली. काकांना जोऱ्याने आवाज दिला. दार बडवून बडवून त्यांना उठवलं. ते दाराची कुंडी काढण्यास आले... दार उघडले गेले... तेव्हाच पाठीमागील भिंत कोसळली. क्षणात मोठ्ठा धूर झाला... अंधार झाला... काहीच दिसेना... त्या भिंतीखाली काकू आपल्या मुुलांसह गडप झाली होती. दरम्यान, काकांनी दार उघडले खरे, पण तेही त्याच भिंतीखाली आले होते, कळलेच नाही कुणाला. दोन एकत्र कुटुंबातले एक कुटुंब या भूकंपाने उद्ध्वस्त झाले होते. 

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपFamilyपरिवारDeathमृत्यू