शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

जनसामान्यांचे हित जोपासणे महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:17 IST

लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा लातूर : मातोश्री कलावती प्रतिष्ठान संचालित लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा व लोकमान्य टिळक ...

लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा

लातूर : मातोश्री कलावती प्रतिष्ठान संचालित लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा व लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्या दुर्गा भताने, समन्वयक रौफ शेख उपस्थित होते. विद्यार्थ्यांना महापुरुषांची ओळख व्हावी, या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षिका रुपाली कोकाटे यांनी लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन शिक्षिका नम्रता झांबरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

निखिल शिवाजी गायकवाड यांना ‘समाजभूषण पुरस्कार’

लातूर : कोरोनाच्या काळात सामान्य नागरिकांचे, हातावर पोट असलेल्या कामगारांचे हाल होत होते. अशा अडचणीच्या प्रसंगी निखिल गायकवाड यांनी हडको प्रभागातील लोकांच्या घरोघर जाऊन दैनंदिन भाजीपाल्याचे मोफत वाटप केले. रमाई अन्नसेवा योजनेच्या माध्यमातून दररोज पाचशेहून अधिक डबे रुग्णांच्या नातेवाईकांना पुरवले. या कार्याबद्दल त्यांचा ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, माजी आमदार वैजनाथ शिंदे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, रत्नराज जवळगेकर, पूजा निचळे, आकाश गडगडे, विशाल सावंत, गजू गुगळे उपस्थित होते.

लातूर शहरात अभिवादन कार्यक्रम

लातूर : येथील लोकमान्य टिळक चौकात लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, बाळासाहेब देशपांडे, संजय निलेगावकर, हरिराम कुलकर्णी, पंडित रघुत्तम आचार्य जोशी, डॉ. श्रीनिवास संदीकर आदींसह नागरिक उपस्थित होते.

दुभाजकात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले

लातूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजकात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे संबधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असून, दुभाजकातील कचरा वाऱ्यामुळे रस्त्यावर येत असल्याने वाहनधारकांसह नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शहरातील बार्शी रोड, अंबाजोगाई रोड, औसा रोड आदी मुख्य मार्गातील दुभाजकात कचरा टाकला जात आहे. याकडे मनपाच्या स्वच्छता विभागाने लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.

विजेच्या लपंडावामुळे नागरिकांची गैरसोय

लातूर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस होता. या काळात विजेचा लंपडाव सुरु होता. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे होऊनही विजेची समस्या कायम असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. नियमित वीजबिलांचा भरणा करुनही विजेची समस्या कायम असल्याने याकडे महावितरणने लक्ष देऊन गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.